top of page


देशाची लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे वाटचाल; डि. लिमिटेशन बीलासाठी भाजपचा खटाटोप, संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू- पृथ्वीराज चव्हाण
सातारा: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी बुधवारी (17 जून) दिल्लीपर्यंत पोहोचल्या.उद्धवसेनेचे सहा खासदार फुटणार, या वृत्तानेच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ होणार ही चर्चा सुरू झाली. महाराष्ट्रात राजकारण सुरू असलेल्या खासदार फुटीच्या प्रकरणावर बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली. हे सगळे मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी सुरू असल्याचे ते म्हणाले. कराड येथे माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले “ भाजप पक्ष फोडत आहे. उद्धवसेनेतील सहा खासदारांना ल
2d1 min read


शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या बंडखोर खासदारांना Y+ सुरक्षा
दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी ‘ ऑपरेशन टायगर’ ची स्क्रिप्ट लिहिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यानंतर ऑपरेशन अंतर्गत ठाकरे जय महाराष्ट्र करत सहा खासदारांनी ठाकरेंची साथ सोडल्यातच जमा आहे. यासर्व खासदारांबाबत नवी अपडेट समोर येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहे ठाकरे) पक्षाच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत स्वतंत्र गट स्थापन केल्याच
2d2 min read


ठकारेंचे बंडखोर खासदार उद्या शिंदेच्या मंचावर नाहीत, सहा पैकी चार खासदार राजस्थानमध्येच!
मुंबई : शिंदेचे ऑपरेशन टायगर जरी यशस्वी झालं असलं तरी बंडखोर सहा खासदारांच्या संबंधी एक मोठी माहिती समोर येत आहे. हे सर्व खासदार 19 जून रोजी होणार्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिंदेच्या मंचावर दिसतील अशी चर्चा सुरू होती. मात्र या खासदारांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त आता बदलण्यात आल्याची माहिती आहे. 21 किंवा 22 जून रोजी हे सर्व खासदार महाराष्ट्रात परत येणार असून त्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरेंच्या सहा खासदारांनी बंडखोरी
2d2 min read


ओमराजे निंबाळकर यांच्या बंडाचे मतदारसंघात पडसाद; सोशल मीडियावर ओराजे निंबाळकर ट्रोल!
शिवसेना उद्धाव बाळासाहेब ठकारे पक्षाच्यसा सहा खासदारांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. या सहा खासदारांमध्ये धाराशिवचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यसांचाही समावेश आहे. शिवसेनेत 2022 मध्ये फूट पडली त्यावेळी ओम राजे खंबीरपणे ठाकरेंच्या मागे उभे राहिले होते. आता मात्र त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. याचे पडसाद त्यांच्या मतदारसंघातही उमटू लागले आहे. कुणीही फुटले तरी ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे ठाकरेंशी एकनिष्ठ राहतील, असे धाराशिवमधील सेनेचे कार्यकर्ते ठाकपे
3d1 min read


बंडखोर खासदारांचे मतदारसंघात फिरण्याचे वांधे?; संगमनेरमध्ये शिवसैनिक आक्रमक खासदार वाकचौरेंच्या पुतळ्याचे दहन
शिवसेनेचे बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात संगमनेरमध्ये आक्रमक आंदोलन करण्यात आलं. आंदोलक शिवसैनिकांनी वाकचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. शिवसेना (ठाकरे) पक्षातील एकूण 9 पैकी 6 खासदारांनी बंड केले आहे. बंडखोर खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन होणार असल्याची माहिती आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर नाराज होवून य
3d2 min read


जगात जर्मनी, भारतात परभणी: शिवसेनेच्या बंडोबा खासदारांना परभणीकरांनी कायमचाच धडा शिकवला; 38 वर्षाचा रंजक इतिहास
परभणी : जगात जर्मनी, भारतात परभणी अशी वेगळी ओळख निर्माण करणार्या परभणीचा राजकीय पॅटर्नही काहीसा वेगळाच आहे. 1989 पासून परभणी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पहिला तर या ठिकाणचा एक वेळेसचा अपवार वगळता सलग सात वेळा शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे. त्याशिवाय परभणी मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येऊन गद्दारी करणार्या खासदारांची संख्या काही कमी नाही. पण परभणीतल्या शिवसैनिकांनी गेल्या 38 वर्षात पक्ष सोडणार्या प्रत्येक खासदाराला असा धडा शिकवला आहे की, पक्ष सोडताना प्रत्ये जण
3d3 min read


अखेर ‘ऑपरेशन टायगर’ फेल, गेम फिरला शिंदे गटाला मोठा धक्का
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सहा खासदारांनी बंड केला आहे. या बंडखोर आमदारांनी आता नवा गट स्थापन केल्याचे सांगितले जात आहे. लवकरच बंडखोर खासदारांचा हा नवा गट एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होण्याची शक्यता व्यक केली जात आहे. पक्षातील हीच फूट लक्षात घेता ठाकरे यांच्या संसदीय पक्षाने व्हीप जारी केला आहे. आता ठाकरेंच्या सर्वच खासदारांना या व्हीपचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे नेमकं काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असतानाच मोठी माहिती समोर आली आहे.
3d1 min read


ठाकरेंच्या खासदारांनंतर आता काँग्रेसचेही नेते थेट दिल्लीत, चर्चेला उधान
राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. प्राप्त माहितीनुसार लवकरच शिवसेना (ठाकरे) पक्षाचे काही खासदार बंडखोरी करणार आहेत. हे खासदार लवकरच आपला वेगळा गट तयार करण्याची शक्यता आहे. त्यासाठी दिल्लीत मोठ्या हालचाली सुरू आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय देशमुख यांनी शिंदे गटाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतली आहे. बंडखोर खासदार लवकरच लोकसभा अध्यक्षांना वेगळ्या गटाबाबत पत्र देणार असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, शिवसेना (
5d1 min read


शिवसेना (ठाकरे) पक्षाचे 16 आमदार आणि 7 खासदारां सोबत अंतिम बोलणी झाली; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा
राज्यात सद्यस्थितीत कुठल्याही निवडणुका नसताना ठाकरेंच्या शिवसेना पक्षात वेगळा गट स्थापन होत असल्याची चर्चा सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील 7 खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार असून एकनाथ शिंदेंच्या ‘ ऑपरेशन टायगर’ची चर्चा होत आहे. एकीकडे ही चर्चा सुरू असताना दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 16 आमदार आणि 7 खासदार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अंतिम बोलणी झाल्याचा दावा केल्याने गेल्या काही द
5d2 min read


रोहित पवारांचे पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन
पुढरपूर: राज्यातील शेतकर्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी आणि सरकारने जाहीर केलेल्यवा कर्जमाफीतील जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यसांनी शुक्रवारी पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ‘शिवतीर्थ’ येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. शेतकर्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. आंदोलनापूर्वी पंढरपूर पोलिसांनी वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेच्या
Jun 122 min read


पश्चिम बंगालमध्ये भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ फेल , टीएमसी खासदाराने जाहीपणे सांगितलं, ममता बॅनर्जींचा दिल्लीत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठकांचा धडाका
पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू आहेत. अनेक खासदारांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडली आहे. तब्बल 58 आमदरांनी वेगळा गट स्थापन केला आहे. या सगळ्याच्या मागे पडद्यामागून भाजप ऑपरेशन लोटस राबवत असल्याचा अरोप होत आहे. ममता बॅनर्जींचे एक एक खासदार फुटत असल्याचे सांगितले जात आहे. टीएमसीची लोकसभेतील खासदारांची संख्या 28 आहे. मात्र, जर मोठा गट फूटून बाहेर पडला तरी त्याच्या मान्यतेसाठी ती संख्या दोन तृतीयांश असली पाहिजे. म्हणून जर 28 पैकी 19 खासदार फूटले तरच फुटीर गटाला मान
Jun 111 min read


राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तीन आमदार थेट भाजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला
विधानपरिषद निवडणधुकीची रणधुमाळी सुरु असताना अमरावतीच्या राजकारणातून खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. अनेक ठिकाणी नेत्यांनी जागेवरुन नाराजी व्यक्त केली असून मविआ तसेच महायुती दोघांमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली आहे. आता आणखी एक महत्वाची अपडेट सोलापूरातून आली आहे. सोलापूरातील जागेवरून मविआमध्ये पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा होत्या. अशात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील नेते उत्तम जानकर हे नाराज असल्याचं सांगितलं जात होतं. आधी त्यांची विश्वासू नेता असूनही जागा न
Jun 111 min read


बंडखोरांनी ‘ टीएमसी’ पक्ष फोडला, ममता बॅनर्जींसाठी संकटकाळात हा बडा नेता ढाल बनला
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींना सत्ता गमवावी लागली. हा धक्का सहनकरत नाही, तोच तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी राजकीय फूट पडली आहे. टीएमसीचे जवळपास 58 आमदार आणि 20 खासदार फुटले आहेत. आमदारांच्या बंडखोरीनंतर खासदारांनीही वेगळा गट स्थापन करत एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पण एकीकडे हे धक्के सहन करणार्या माजी मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. एकेकाळी पश्चिम बंगालसारख्या राज्याची 15 वर्षे सत्
Jun 91 min read


दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक, पाच मुद्यांवर एकमत
नवीदिल्ली: इंडिया आघाडीची नवीदिल्लीत सोमवारी (दि.8) महत्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीस देशभरातील 25 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. बैठकीत देशातील विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. महागाई, बेरोजगारी आणि घाटेळ्यांसह एसआयआर, नीट पेपरफुटीवर विरोधकांनी चिता व्यक्त करत पाच मुद्यांवर एकमत झाल्याचे बैठकीनंतर आयोजीत पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहिर केले. नवीदिल्ली येथे आयोजीत इंडिया आघाडीच्या बैठकीस देशभरातील 25 विरोधी पक्षांच्या प्रमुख नेल्यांनी उ
Jun 81 min read


उद्धव ठाकरेंना पक्षात बंडखोरीची भीती, जळगावातील नेत्याला मुंबईला बोलावले
राज्यात विधान परिषदेची रणधुमाळी सुरू आहे. आज निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणपत्र बंडखोर झाल्याचं पहायला मिळालं. पंरतु शेवटच्या क्षणी ही बंडखोेरी मोडून काढण्यात महायुतीला मोठं यश मिळालं आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला दोन जागांवर मात्र मोठा धक्का बसला आहे. ऐनवेळी उमेदवारांनी पक्ष नेतृत्वाला विश्वासात न घेताच निवडणुकीतून माघार घेतला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटानं बाळ
Jun 41 min read


विधानपरिषद निवडणुक: मतदानापूर्वीच महायुतीला 17 पैकी 6 जागांवर यश
राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे विधान परिषदेसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. पण मतदानाआधीच मोठा खेळ झाल्याचे पहायला मिळत आहे. महायुतीचे तब्बल सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यात 17 जागांवर निवडणुक होणार असून आज अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत होती. अनेक ठिकाणी बंडखोरीही झाली होती. महायुतीला बंडखोरी रोखण्यात यश आले असून महाविकास आघाडीला आठ ठिकाणी झटका बसला आहे. महायुतीला 17 पैकी 6 जागांवर निर्विवाद बिनविरोध यश मिळवले आहे. यामध्ये ठाणे मतदारसंघ
Jun 42 min read


विधानपरिषद निवडणुक: तटकरेंचा मोठा डाव, पुत्र अनिकेत तटकरे होणार आमदार!
विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी होणार्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस, त्यामुळे बंडखोर नेत्यांची मनधरणीची पराकाष्टा करण्यात येत आहे. नाशिक विधानपरिषदेची निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या जागेवरुन गोकुळ गीते आणि गणेश गीते यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, एकीकडे महायुतीत काही जागांवर बंडखोर नि
Jun 41 min read


एकनाथ शिंदे पुन्हा करिष्मा! दुसरी जागाही बिनविरोध यवतमाळची आमदारकी फिक्स
यवतमाळ : राज्यातील विधानपरिषदेच्या 17 जागेसाठी निवडणुक होत आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातून कोण-कोण माघार घेणार याची उत्सुकता लागली होती. त्याचवेळी ठाण्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने शिंदे यांच्या शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध निवडून आले आहेत. तर आता यवतमाळ विधानपरिषद मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दृष्यंत चतुर्वेदी बिनविरोध निवडून आले आहेत. यवतमाळ विधान
Jun 42 min read


तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट; 51 आमदारांच्या गटाला मंजूरी
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये उभी भूट पडली आहे. टीएमसीतून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांनी 58 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांना सोपवलं आहे. त्यानंतर पश्चिम बंगालच्या विधानसभा अध्यक्षांनी तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाला अधिकृत मंजुरी दिली आहे. तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. टीएमसीतून हकालपट्टी करण्यात आलेल्या आमदरांनी ऋतब्रज बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली आहे.
Jun 32 min read


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ वक्तव्यावर ठाम, चुकीचा शब्द वापरला नाही!
मुंबई : कांद्याला हामी भावासह शेतकर्यांच्या इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतिने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.26) चांदवडमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यता आले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर अश्लाघ्य भाषेत टीका केल्याने भाजपकडून माफी मागणी करण्यात आली. शेतकर्यांच्या विविध प्रश्नांसह काद्याला हामी भावाच्या मागणीसाठी आयोजित मोर्चात काल चांदवडमध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
May 281 min read
bottom of page