top of page


ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
पश्चिम बंगालमध्ये भाजपचवा मोठा विजय झाला आणि टीएमसीचा दारुण पराभव झाला आहे. यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या विजयावर शंका उपस्थित करत केंद्रीय संस्थांसह न्यायव्यस्थेच्या मदतीने 100 जागा पळवल्याचा आरोप केला आहे. ‘ आम्ही निवडणुक हरलेलो नाही, त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच नाही. आम्ही विधानसभा निवडणुका नैतिकदृष्ट्या जिंकल्या आहेत. मी लोकभवनात जाऊन राजीनामा देणार नाही असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. पराभूत पक्षाच्य
16 hours ago2 min read


भाजपने निवडणुक अयोगाच्या मदतीने आसाम आणि बंगालची निवडणुक चोरली - राहुल गांधी
पाच राज्यात झालेल्या निवडणुकांत भाजपचा तीन राज्यात अभूतपूर्व विजय झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये तर भाजपाने तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचा अभेद्य किल्ला नष्ट केला आहे. आसाम आणि पद्दुचेरीतही भाजचे सरकार येत आहे. आसामध्ये भाजपाने तिसर्यांदा विजय मिळवत हॅट्रीक साधली आहे. दरम्यान, भाजपाच्या या विजयावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाने पश्चिम बंगाल येथील गेल्या अनेक वर्षांचे ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीचे सरकार उलथवून लावत बहुमत मिळवले आहे. भाज
2 days ago1 min read


5 राज्याच्या निकालात भाजपची मुसंडी: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीला धक्का, तामिळनाडूत थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला बहूमत; केरळमध्ये डाव्यांचा गड ढासळला
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे आणि महाराष्ट्रातील 2 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाचही राज्यांमध्ये मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल आणि असाममध्ये ऐतिहासिक कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर दुसरीकडे, तामिळनाडू आणि केरळमध्ये प्रस्थापित सत्ताधार्यांना मतदारांनी नाकारून मोठा राजकीय बदल घडवून आणला आहे. पश
2 days ago2 min read


एक्झिटपोल भाजपच्या बाजूने, पण ममता बॅनर्जींचा टीएमसी कार्यकर्त्यांना महत्वाचा मॅसेज 200 जागा जिंकण्याचा दावा; शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका
पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुक निकालास अवघे काही तास उरले आहेत.पश्चिम बंगालमध्ये विविध एक्झिट पोल्सनी भाजला आघाडी दर्शवली असली तरी, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विजयाचा मोठा दावा केला आहे. “ आपण 200 पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेत येत आहोत अश्वस्त रहा” अशा शब्दांत ममता दीदींनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला आहे. तसेच मतमोजणी केंद्रावर शेवटपर्यंत तैनात राहण्याचे कडक निर्देशही त्यांनी दिले आहेत. दरम्यान, काल संध्याकाळी
3 days ago1 min read


मुंबईसह महाराष्ट्रातील रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्तीसाठी राज ठाकरे आक्रमक, मुदतीवरुन सरकारवर हल्लाबोल; थेट लायसन्स रद्द करण्याची मागणी
पुणे : मुंबईसह महाराष्ट्रातील रिक्षा चालकांना मराठी भाषेची सक्ती करण्यात आली, यावरून चांगलच वातावरण तापलेलं आहे. अखेर सरकारने सध्या कारवाई होणार नसल्याचं जाहीर केलं असलं तरी आता राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केल्याने रिक्षाचालकांच्या मराठी भाषेच्या सक्तीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुण्यातील टिळक मंदिर सीागृहात वसंत व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात ‘ माझ्या मनातला महाराष्ट्र, मराठी अस्मिता’ या विषयावर आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं व्याख्
6 days ago1 min read


बच्चू कडूंंनी हाती घेतला शिवसेनेचा धणुष्यबाण, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश; विधानपरिषद उमेदवारीचीही घोषणाआता शिवसेनेतच राहणार- बच्चू कडू
महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून चाललेल्या राजकीच चर्चांवर अखेर प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी पडदा टाकला आहे. आपण शिवसेनेचा धनुष्यबाण पुन्हा हाती घेत आहेत, असं बच्चू कडू माध्यमांशी बोलताना म्हणाले. त्यांना एकदनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळणार असल्याच्या जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात रंगू लागल्या होत्या. यासाठी बच्चू कडून प्रहार संघटनादेखील शिवसेनेत विलीन करणार असल्याचं बोल
6 days ago2 min read


सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांच्या पॅनेलमध्ये न्यायामूर्ती स्वर्ण कांतांची दोन्ही मुलं ; तेच न्यायमूर्ती निष्पक्ष निकाल देतील? - केजरीवाल यांचा सवाल
नवी दिल्ली : माझ्या विरोधात सीबीआय म्हणजेच केंद्र सरकार आहे आणि समोर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे वकील आहेत. न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांची दोन्ही मुले केंद्र सरकारच्या वकिलांच्या पॅनेलमध्ये काम करतात. त्यांच्या मुलांना कोणते आणि किती खटले द्यायचे, हे तुषार मेहता ठरवतात. 2023 ते 2025 दरम्यान न्यायमूर्तींच्या मुलाला तब्बल 5904 खटले मिळाले, ज्यातून त्याला कोट्यवधी रुपयांची फी मिळाली. जेव्हा न्यायाधीशांच्या मुलांचे भविष्य आणि कमाई समोर उभ्या असलेल्या वकिलावर अवलंबून असते, त
Apr 272 min read


बांग्लादेशी घुसखोरांना बंगालमधून हाकलून देऊ, ममता बॅनर्जी त्यांना वाचवू शकणार नाहीत- पंतप्रधान मोदी
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला. बनगाव येथील सभेत बोलताना त्यांनी घुसखोरांना थेट इशारा देत ‘ 29एप्रिलपूर्वी बंगाल सोडा, अन्यथा 4 मे नंतर कारवाई होईल’ असा स्पष्ट इशारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या सभेनंतर भाजप आणि तृणमूल काँग्रेस यसांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर घुसखोरांना आश्रय दिल्याचा आरोप केला. भाजप सत्तेत आ
Apr 261 min read


राघव चढ्डा यांच्यासह 7 जणांची खासदारकी धोक्यात, ‘आप’ ने आखला प्लॅन
दोन दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीच्या 7 राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशातच आता आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांनी या सर्व बंडखोर खासदारांची राज्यसभा सदस्यता रद्द होणार असल्याचा दावा केला आहे. आता आम आदमी पार्टी बंडखोर खासदारांना अपात्र घोषित करण्याची मागणी करणार असल्याचेही समोर आले आहे. पीटीआय -भाषाच्या वृत्तानुसार संजय सिंह यांनी राज्यसभा सभापती सीपी राधाकृष्णन यांना पत्र पाठवून राघव चढ्डा यांच्यासह राज्यसभेतील त्या 7 खासदारांना अपात्र घोषित करण्याची विनंती
Apr 261 min read


‘आप’ मधील फुटीनंतर अण्णा हजारे संतापले, थेट नव्या कायद्याची मागणी
आहिल्यानगर : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा फटका बसला आहे. राघव चड्डा यांच्यासह पक्षातील सात राज्यसभा खासदारांनी पक्षाला रामराम करत भाजपची वाट धरली आहे. त्यामुळे दिल्ली आणि पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. खासदार फुटल्यानंतर आम आदमी पक्षाने भाजपवर सडकून टीका केली आहे. तसेच विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. अरविंद केजरीवाल यांचे एकेकाळचे सहकारी आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजार ेयांनी राजकीय घडामोडीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अण्णा हजारे
Apr 241 min read


आम आदमी पार्टीत उभी फूट, राघव चढ्डांचा भाजप प्रवेश अरविंद केजरिवाल यांचा एका वाक्यात भाजपवर हल्ला; आपचे 7 खासदार भाजप अध्यक्षांच्या भेटीला
नवी दिल्ली: आम आदमी पक्षात मोठी फूट पडली आहे. खासदार राघव चढ्डा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सोबतच आप पक्षाच्या इतरही खासदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर आपच्या त्या सातही खासरदारांनी भाजप कार्यालयात जाऊन अध्यक्षांची भेट घेतली आहे. आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्डा यांनी थेट भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासह अशोक मित्तल, संदीप पाठक तसेच एकूण सात खासदारांनी भाजपमध्ये सामील होण्याचं ठरवलं आहे. थेट पत्रकार परिषद घेऊन र
Apr 242 min read


सायंकाळपर्यंत बारामतीत 59.27 टक्के, राहुरीत 56.72 टक्के मतदान
बारामती/राहुरी: पश्चिम बंगालसह पाच राज्यातील निवडणुकीसोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन ठिकाणी पोटनिवडणुका होत आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने बारामतीची पोट निवडणुक लागली, तर राहुरीचे आमदार शिवाजी कर्डीले यांच्या दुखद निधनाने राहुरीमध्ये निवडणुक होत आहे. आयोगाने अधिकृत आकडेवारीनुसार सायंकाळी 6 वाजेपर्यंत बारामतीमध्ये 59 टक्के तर राहुरीमध्ये 56.72 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. पुण्यातील बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी या दोन मतदारसंघांच्
Apr 231 min read


खासदाराचे राजकीय महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; आयोगाने पाठवली नोटीस, कारवाईची टांगती तलवार , खासदारकीही धोक्यात
पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून त्यांच्यावर कारवाईची टांकती तलवार आहे. अलीकडचे पप्पू यादव यांनीराजकारणात काम करणार्या महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांनी,90 टक्के महिलां नेत्यांच्या खोलीत गेल्याशिवाय राजकारण करू शकत नाहीत,असे म्हटले होते, आत या वक्तव्यावरुन खळबळ उडाली असून बिहार राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. आयोगाने पप्पू यादव यांना याबाबत मंगळवार दि.21 एप्रिल 2026 रोजी नोटीस बजावली असून उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत
Apr 212 min read


भाजपमध्ये उभी फूट!, मोदींना हटवण्यासाठी षडयंत्र; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
मुंबई: लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पंतप्रधान मोदींनी विधेयक नामंजूर होण्यावरुन काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. तर काँग्रेसकडूनही टीकेला प्रत्युत्तर दिले जात आहे. महाराष्ट्रात महायुतीनेही विरोधकांच्या भूमिकेवरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. महायुतीकडून राज्यात एका कोटी महिलांच्या स्वाक्षर्या गोळा करण्यात येणार आहे. तसेच राज्यभरात मेळावे आयोजित केले जाणार आहेत. महिला आरक्षण विधेयक नामंजूर
Apr 212 min read


महिला आरक्षण विधेयकाची भ्रूण हत्या केली, हत्यारे विरोधक; 2029 महिला आरक्षण विधेयक लागू होईल- मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : देशातील समाजिक आणि आर्थिक बाबतीत महत्वाचा देश ठरेल, अशी 17 एप्रिलला अपेक्षा होती. महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर होणार होतं. सर्वजण मदत करतील याला अपेक्षा होती. मात्र, डीएमके, एनसीपी शप, समाजवादी, उबाठा, काँग्रेस यांनी महिला मानसिकतेचे प्रदर्शन केले, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. लोकसभेत महिला आरक्षण विधेयक रद्द झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या खासदार ज्योती वाघमारे, शिवसेना शिंदे गटाच्या
Apr 203 min read


विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केंद्रीय निवडणुक अयोगाची घोषणा; 12 मे रोजी मतदान
नवी दिल्ली: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. भारत अयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्चया 9 जागांसाठी 12 मे रोजी सकाळी 9 :00 वाजल्यापासून दुपारी 4:00 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विधान परिषदेच्या निवडणूक प्रोगामनुसार निवडणूक अधिसूचना जारी करणे: 23 एप्रील 2026, उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस : 30 एप्रिल 2026, उमेदवारी अर्ज
Apr 161 min read


उमरखाडीत शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे लोकार्पण
उमरखाडीत समूह पुनर्विकास योजना राबवणार - खासदार देवरा मुंबई : नळबाजार येथील एसबीयुटी प्रकल्प आणि कामाठीपुराच्या समूह पुनर्विकास धर्तीवर डोंगरी उमरखाडी येथील म्हाडाचा ११ इमारतींचा समूह पुनर्विकास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बोलणी करून लवकरात लवकर राबवणार असल्याची घोषणा शनिवारी माजी केंद्रीय मंत्री व खासदार मिलिंद देवरा यांनी केली आहे. देवरा उमरखाडी येथे शिवछत्रपती पुतळ्याच्या लोकरपणासाठी आले असताना त्यांनी ही घोषणा केली. माझ्या प्रयत्नांमुळे आज दक्षिण मुंबईतील उमरखाडी
Apr 141 min read


कट्टर राजकीय विरोध एकाच व्यासपीठावर; शेजारी बसले, गप्पाही मारल्या!
बीड: जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावर आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर शेजारी शेजारी दिसून आलं. दोघांचा एमेकांशी मनमोकळा संवाद साधतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. आता, याप्रकरणी आमदार सुरेश धस म्हणाले की, धस -मुंडे संघर्ष अजून संपलेला नाही. संघर्ष सुरू राहील पण बाकीच्या ठिकाणी, हे अध्यात्माचे स्टेज आहे. इथे नो राजकारण , इथून रोडवर गेल्यावर राजकारण सुरू होईल असंही धस म्हणाले.श्री गहिनिथ गडाच्या नारळी सप्ताह निमित्त आमदारा धनंजय मुंडे यांनी देखील आपल्या भाषणात सुरेश
Apr 92 min read


काँग्रेस नंतर संजय राऊतांनीही पार्थ पवारांना सुनावले
मुंबई : बारामतीच्या पोटनिवडणुकीत विनंती करूनही काँग्रेस पक्षाने सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार रिंगणात उतरवल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काहीशी नाराजी व्यक्त होत आहे. या मुद्यावरून पार्थ पवार यांनी काँग्रेसविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने उमेदवार उतरवणे म्हणजे काँग्रेसच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात आहे, असे त्यांनी म्हटले. यानंतर शरद पवार यांनी पार्थ पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला. “ राजकारणात महत्वाच्या निर्णयानंतर म
Apr 73 min read


बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांचा मोठ्या शक्तीप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनाने आज सोमवारी (दि.6) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, चंद्रशेखर बावनकुळे, धनंजय मुंडे,चेतन तुपे, अनिल पाटील, सना मलिक आदींसह महायुतीचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज सोमवार (दि.6) शेवटचा दिवस. महाविक
Apr 62 min read
bottom of page