top of page


सातारा जिल्हा परिषदेत राडा, पालकमंत्री शंभुराज देसाई जखमी; भाजप कार्यकर्त्यांवर धक्काबुक्कीचा आरोप
सातारा: जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रिया आज पार पडली. भाजपने मोठा विजय पहिल्यांदाच सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. आजच्या निवड प्रक्रियेला हिंसक वळण लागले. या निवडीदरम्यान झालेल्या प्रचंड गोंधळात पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या डाव्या हाताला जखम झाली असून त्यांना भाजप कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे सातार्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू असताना
18 hours ago1 min read


अखेर रुपाली चाकणकर यांचा महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या नावे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केला सुपूर्द; राजीनामा स्विकारण्याची विनंती
मुंबई: कॅप्टन अशोक खरात प्रकरणी वादात सापडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी अखेर राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर यांनी महिला अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत अधिकृतपणे राजीनामा दिला आहे. राज्य महिला अयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या महिला आयोग अ
18 hours ago2 min read


अखेर कॅप्टन खरात प्रकरणी रुपाली चाकणकरचा राजीनामा? राष्ट्रवादी उद्याच घेणार निर्णय; बोलावली तातडीची बैठक
राज्यात सध्या कॅप्टन खरात प्रकरण गाजत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला अयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अडचणीत येताना दिसत आहेत. रुपाली चाकणकरांचे अशोक खरात यांच्यासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यामुळे विरोधकांनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे हे प्रकरण रुपाली चाकणकर यांना भोवण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भोंदूबाबा खरात प्रकरण रुपाली चाकणकर यांना भोवणार असं दिसत आहे. राष्ट्रवादी
19 hours ago2 min read


मुख्यमंत्री फडणवीसांचे रुपाली चाकणकरांना राजीनाम्याचे आदेश
चाकणकर तंत्र-मंत्र विद्या करतात, सोमवती अमावस्येला स्वत:ची अनामिका कापली - सुषमा अंधारे अंजली दमानियांचा संताप; पाताळातून शोधून काढा कारवाई करा मुंबई/ पुणे : आज दिवसभर कॅप्टन अशोक खरात याचे वेगवेगळे कांड समोर आल्याने विरोधकांसह सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादीनेही चकाणकर यांना माध्यमांसमोर सुनावले. त्यातच दुपारी रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया समारे आली ‘ मी मुंबईत आहे, पोलिस महासंचालकांची भेट घेणार आहे. सोमवारी पत्रकार परिषदेत म्हणनं मांडणार आहे ’ या प्रतिक्रियेनंतर अवघ्या काही
19 hours ago3 min read


(व्हिडिओ): महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरच्या नव्या व्हिडिओने खळबळ; महाराष्ट्रात राजकीय भूकंप, सह आरोपी करण्याची मागणी
नाशिक : नाशिक येथील वदग्रस्त बाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन याच्यावरील गंभर गैरवर्तणूक आणि लैंगिक अत्याच्याराच्या आरोपांमुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. यसा प्रकरणाचे धागेदोरे अनेक मातब्बर राजकीय व्यक्तींशी जोडले जात असल्याची चर्चा असतानाच, आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत झाला आहे. या नव्या व्हिडिओमुळे त्यांच्यावरील अडचणीत मोठी भर पडली असून राजकीय वर्तुळातून त्
1 day ago3 min read


महाराष्ट्रभर ड्रग्ज विकतायत, इराणने आपल्याला साथ दिली केंद्राने मोठी चूक केली - राज ठाकरे
मुंबई: मनेसेचा गुढीपाडावा मेळावा शिवतीर्थावर पार पडला. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घणाघात केला. राज ठाकरे यांनी यावेळी राज्यातील अनेक सामाजीक प्रश्न उपस्थित केले. राज्यातील तरुण-तरुणी ड्रग्जच्या आहारी गेल्याचे म्हणत सध्या सुरू असलेल्या अमेरिका, इस्त्रायल आणि इराण युद्धावरही राज ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. राज ठाकरे म्हणाले की, गेल्या काही वर्षामध्ये राज्यावरील कर्जात मोठी वाढ झाली आहे. 2014 पूर्वी राज्यावर 2 लाख कोटी कर्ज होते
2 days ago2 min read


काँग्रेसचा भाजपाला धक्का; राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावरच अनेक नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
काँग्रेसने राज्यातील सत्ताधारी भाजपा, शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का दिला आहे. भाजप आणि शिवसेना इतर पक्षातील नेत्यांना फोडून आपल्या पक्षाची ताकद वाढवत असायचे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्यावेळी तर महाविकास आघाडीच्या पक्षातील स्थानिक पातळीवरील नेत्यांना प्रवेश देत आपल्या पक्षाची ताकद वाढवली. काँग्रेसने भाजपला आणि शिवसेनेला जबर धक्का दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन येथे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी
5 days ago2 min read


बारामती, राहुरी विधानसभेची पोटनिवडणुक जाहीर दोन्ही जागां बिनविरोध निवडून येण्याची आशा धुसर!; ..तर आम्ही निवडणुक लढण्यास तयार - मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : निवडणूक आयोग रविवारी (दि.15) दुपारी चार वाजाता नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रातील विधानसभेच्या बारामती, राहुरी या दोन रिक्त जागेंच्या पोटनिवडणुकांचीही घोषणा करण्यात आली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची व दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदार सं
6 days ago2 min read


निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या दीड तास आधीच, ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या दीड तास आधी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुजारी आणि मुएझिन (प्रार्थनेसाठी अजान देणारे) यांच्या मानधनात 500 रुपये ने वाढ केली. आता त्यांना दरमहा 2000 रुपये मिळतील. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी दुपारी एका पोस्टमध्ये लिहिले की, “ समुदायांचे आध्यात्मिक आणि सामाजिक जीवन राखण्यात पुजारी आणि मुएझिन महत्वाची भूमिका बाजावतात. सरकारने मानधन योजनेअंतर्गत पुजारी आणि मुएझिनसाठी सर्व नवीन अर्जांना मान्यता दिली आहे. ममता बॅनर्
6 days ago2 min read


विजय थालापतीला भाजपची मोठी ऑफर, 80 जागा आणि उपमुख्यमंत्रीपद
चेन्नई: तामिळनाडूच्या राजकारणात सध्या एक नवीन चर्चा वगेाने पसरत आहे. 2026 च्या विधानसभा निवडणुकका जवळ येत असताना, राज्यातील राजकीय समीकरणे बदलत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी, सर्वात चर्चेचा विषय अभिनेता राजकारणी थालापती विजय आणि त्यांचा पक्ष तमिळगा वेत्री कझगम (टीव्हीके) आहे. माहितीनुसार, भारतीय जनता पक्ष (भाजप) विजयला त्यांच्या युतीमध्ये सामील करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांना एक मोठी ऑफर दिली आहे. भाजपने विजय यांच्या पक्षाला सुमारे 80 जागा देऊ केल्याची माहिती आहे. शिवा
6 days ago2 min read


विलिनिकरणाबाबत अजित पवारांसोबत झालेल्या बैठकांसदर्भात जयंत पाटलांचा मोठा दावा
मुंबई: 17 जानेवारीची बैठक विलिनीकरणाची तारीख ठरवणे आणि तो निर्णय शरद पवारांना सांगणं यासाठीच होती असा दावा जयंत पाटलांनी केला आहे. अजितदादांनी विलिनीकरणाची सगळी रुपरेषा ठरवली होती. फक्त झालेला निर्णय शरद पवारांना सांगणे शिल्लक होतं असं जयंत पाटील म्हणाले. राष्ट्रवादी विलिनिकरणावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, 17 जानेवारीच्या आधी 16 जानेवारीला आपल्या घरीही या संदर्भात बैठक झाल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं. विलिनिकरणाच्या सगळ्या बैठका जयंत पाटलांनी आपल्याच घरी झाल्याचवा दावा
7 days ago1 min read


अभिंयत्यांच्या बदली प्रक्रियेवरुन राजकारण तापलं; बृहन्मुबई महापालिकेच्या महापौराकडून स्पष्टीकरण
मुंबई : बृहन्मुबई महानगरपालिकेतील सहाय्यक अभियंता आणि दुय्यम अभियंता पदावरील अधिकार्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासक काळात झालेल्या या बदल्यांमध्ये अनियमितता असल्याच्या तक्रारी आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बदल्यांच्या अंमलबजावणीसाठी महापौर रितू तावडेंनी प्रशासनाला कार्यवाहीचे पत्र लिहिल्याने संभ्रम निर्माण झाला. तर मुख्यमंत्र्यांचा स्टे असतानाही बदल्यांच्या कार्यवाहीमुळे प्रश्न उपस्थित होताच, महापौर रितू तावडे यांच्याकडून स
Mar 111 min read


राहुल गांधींचा तो इशारा, ट्रम्पनी काढले फर्मान अन् मोदी सरकारची अशी झाली कोंडी
इराण आणि इस्त्राईल युद्धाचा भडका उडालेला असतानाच भारताबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. या यद्धामुळे जगातील अनेक देशांना गॅस आणि इंधनाचा तुटवडा जाणवण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामध्ये भारतही आहे. त्यावर अमेरिकेकडून भारतासाठी एक फर्मान काढण्यात आले आहे. त्याच्या काही दिवस आधीच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलर्ट केले होते. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच लोकसभेत बोलताना आपल्याला तेल कुठून, कुणाकडून खरेदी करायचे, यासाठी अमेरिकेकडून परवानगी घ्यावी लागू शकते
Mar 62 min read


महाराष्ट्राचा 7 लाख 69 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडला अर्थसंकल्प; दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या स्मृतींना अर्थसंकल्प समर्पीत, शेतकर्यांना कर्जमाफीची घोषणा
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्याचा अर्थसंकल्प 2026-27 सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. शेतकर्यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची देण्यात आली आहे. तसेच गावांमध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवणार, लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांसाठी विशेष करमुक्त आल्या आहेत. हा अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी राहिलेल्या दिव
Mar 64 min read


राज्यसभेच्या सातही जागा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा
मुंबई: महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होत आहे . ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपकडून , शिवसेना शिंदे गटाकडून एक, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून एक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या सात जागांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवले, माया चिंतामण ईवनाते, रामराव वडकुते यांचे तर महाविकास आघाडीकडून शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पार्थ
Mar 51 min read


विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा राजीनामा; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा केंद्रीय गृहमंत्र्यांवर निशाना
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी राजीनामा दिला आहे. पश्चिम बंगालाच्या लोकभवनच्या अधिकार्यांनी यासंदर्भात ही माहिती दिली आहे. राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांच्या अचानक राजीनाम्याने देशभरात खळबळ उडाली आहे. बोस जवळपास साडेतीन वर्षे पश्चिम बंगालाचे राज्यापाल होते. बोस यांनी दिल्ली येथे राजीनामा दिल्याची माहिती आहे. सी.व्ही. आनंद बोस यांनी 17 नोव्हेंबर 2022 ला पश्चिम बंगालचं राज्यपाल पद स्वीकारलं होतं. पटीआय सोबत बोलताना त्यांनी राजी
Mar 51 min read


महादवे मुंडेंची हत्या धनंजय मुंडेनीच घडवून आणली, ब्रेन मॅपिंग अहवाल जाहीर करा; तुम्हा कोणी संपवत नाही, तुम्हीच परळीतल्या दहा लोकांना संपवलं- राजाभाऊ फड
बीड: परळीतील व्यापारी महादेव मुंडे प्रकरणात एसआटीने पाच जणांची ब्रेन मॅपिंग व काहींची नार्कोटेस्ट केल्याची माहिती एसआयटीकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात अद्याप आरोपी निष्पन्न नसून कोणालाही अटक झाली नाही. त्यातच आज राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते राजाभाऊ फड यांनी पत्रकार परिषदेत धक्कादायक दावे करत महादवे मुंडे यांची हत्या धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच झाली असून ब्रेन मॅपिंगचा अहवाल जाहिर करण्याची मागणी केल्याने बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महादवे मुंडे यांच्
Mar 54 min read


मविआकडून शरद पवारच राज्यसभेचे उमेदवार, सुप्रिया सुळेंकडून घोषणा
मुुंबई: उमेदवारीसाठी अर्ज भरण्यास उद्या स्वत: शरद पवार येण्याची शक्यता कमी असून विधिमंडळातील अधिकारीच सिल्व्हर ओक निवास्थानी जाणार असल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या नावाला अखेर महाविकास आघडीने पाठिंबा दिला असून काँग्रेसकडून ते जाहीर करण्यात आलं आहे. तर, संजय राऊत यांनीही ट्विट करून महाविकास आघाडी एक राहिल, असे म्हणत शरद पवारांच्या नावास पाठिंबा असल्याचे सुचवले आहे. त्यामुळे शरद पवार हेच महाविकास आघडीचे राज्यसभेचे उमेदवार असणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
Mar 42 min read


भाजपकडून राज्यसभेचे उमेदवार जाहीर, अनेक हायप्रोफाइल चेहर्यांना डच्चू; आठवले कम बॅक, विनोद तावडेंना संधी, दोन उमेदवारांचे धक्कातंत्र
मुुंबई : भाजपकडून महाराष्ट्रातील राज्यसभेत 4 जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, नागपूरच्या माजी महापौर माया ईवनाते आणि माजी आमदार रामराव वडकुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यातील आठवले आणि तावडे यांना उमेदवारी अपेक्षीत होती. पण इवनाते आणि वडकुते यांच्या उमेदवार्या धक्कातंत्र मानले जात आहे. भाजपकडून राज्यसभेसाठी 25 नावांची यादी कोअर कमिटीच्या बैठकीत अंतिम करण्यात आली होती. स्वत: प्रदेशाध्यक्ष रवी
Mar 42 min read


शरद पवार राज्यसभेवर जाणारच!,दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
मुंबई : राज्यसभेची निवडणूक जाहिर झाली असून याच महिन्यातील 16 तारखेला मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील 7 जागांसाठी ही निवडणूक होत असून महायुतीकडे 6 आणि महाविकास आघाडीकडे 1 जागा आहे. त्यामध्ये, भाजपला 4 आणि शिंदेच्या शिवसेनेला 1 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाणार आहे. त्यामध्ये, राष्ट्रवादीकडून पार्थ पवार याचं नाव निश्चित झालं आहे. तर, भाजप आणि शिंदेच्या शिवसेना उमेदवारांची प्रतिक्षा आहे. दुसरीकउे महाविकास आघाडीकडून तिन्ही पक्ष आग्रही असल्याचे पाहायला मिळालं. त्यात, संख्या
Mar 32 min read
bottom of page