top of page


मुंबई विमानतळावर दोन विमानांचे पंख एकमेकांवर आदळले सुदैवाने हानी टळली; लँडिंगच्यावेळी घडली घटना
मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो एअरइंडियाच्या विमानांचे पंख एकमेकांना धडकल्याची माहिती आहे.लँडिंगच्या वेळी ही घटना घडल्याचे समोर आले आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो आणि एअरइंडियाच्या विमानांचे पंख एकमेकांना धडले. हैदराबादवरून मुंबईला आलेले एअर इंडियाच्या विमानाचे पंख मुंबईवरून कोइंबतूरला जाणार्या एअरइंडियाच्या विमानाच्या पंखांना धडकले. या घटनेवेळी दोन्ही विमानात प्रवासी होते अशी माहिती आहे. त्यामुळे
7h1 min read


राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी घेतली मोदी, शाहची भेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिल्लीचं निमंत्रण!
नवी दिल्ली: अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनतर आता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण याबाबत चर्चांना उधान आले आहे. वेगवेगळ्या नेत्यांच्या नावांची चर्चा होत आहे. खासदार प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष असतील असा दावा केला जात होता, मात्र आता पटेल यांनी हे वृत्त खोटे असा दावा केला आहे. आपण राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे पटेल म्हणाले. त्यांनतर आता पटेल यांनी
8h2 min read


लोकसभेत प्रचंड गदारोळ: आठ खासदार निलंबी , महाराष्ट्रातील एकाचा समावेश, अध्यक्षांनी राहुल गांधींना रोखले...
नवी दिल्ली: संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंगळवारी लोकसभेत जोरदार हंगामा झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या एका अप्रकाशित पुस्तकाचा संदर्भ देत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. पण नियमांवर बोट ठेवत अध्यक्षांनी त्यांना रोखले. त्याचा प्रत्यय आजही लोकसभेत आला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहुल गांधी यांनी आज पुन्हा चीनच्या घुसखोरीवरून पंतप्रधानांवर निशा
8h1 min read


25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्या प्रकरणी 31 सरकारी बाबुंना पोलिसांनी ठोकल्या बेड्या , जालन्यात मोठी कारवाई; 22 तलाठी 5 महसूल अधिाकर्यांचा समावेश, महसूल विभागात खळबळ
जलना/ अंबड/ घनसांगवी: नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यातून मसोर आला आहे. अतिवृष्टी अनुदानाच्या नावाखाली तब्बल 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांचा डल्ला मारणार्या सरकारी बाबूंना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींमध्ये 22 तलाठी, 5 महसूल अधकिरी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचार्याचा समावेश आहे. जलना जिल्हाउद शासनाच्या अतिवृष्टी अनुदानाच्या 25 कोटी रुपयांच्या घोटाळ्याने हादरला आहे. या प्रकरणात च
9h2 min read


उसणे दिलेले पैसे परत मागितल्याचा राग: मित्रानेच केला मित्राचा घात रायमोहातील खुनाचे गुड उलगडले; स्थानिक गुन्हे शाखेने काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या
बीड: जिल्ह्यातील रायमोहा (ता. शिरुर कासार) जवळील दगडवाडी शिवारात सोमवारी (दि.2) राजुरी नवगन -चिंचपूर मार्गावर बाजूच्या खड्यात चाँद अल्हाहुद्दीन तांबोळी वय 30 रा. रायमोहा याचा मृतदेह अढळून आला होता. व्यवसायाने पेंटर असलेल्या चाँदच्या हत्येने जिल्हाभरात खळबळ उडाली होती. पोलिसांसमोर खुनाच्या तपासाचे मोठे अव्हान होते मात्र, पोलीस अधिक्षक नवनित कॉवत यांच्या आदेशाने पोलिस निरिक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याची प्रक्रिया पूर्ण होताच
9h2 min read


पुणे, बीडच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारच; अजित दादानंतर जबाबदारी , परिपत्रक जारी
मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत जबाबदारी स्वीकारली. अजित पवारांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी राजभवन येथे त्यांचा शपविधी संपन्न झाला. सुनेत्रा पवार यांचा शपविधी घाईघाईत झाल्याने त्यांच्यावर टीकाही करण्यात आली. तर, अनेकांनी त्यांचे समर्थनही केले, यासंदर्भात आज राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पवार कुटुंबाने तिसर्याच दिवशी सर्व दशक्रिया विधी उरकल्या
11h2 min read


पर्यावरण मंत्री पंकजा मुडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; मोठी दुर्घटना टळली !
छत्रपती संभाजीनगर: राज्याच्या पर्यावरण पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील उड्डाण घेण्यापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड आढल्याने उड्डाण रद्द करण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ आवश्यक खबरदारी घेण्यात आली. पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे जात होत्या. त्या जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी दौर्यावर होत्या. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे नियोजित सभा पुढे ढकण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर व
13h1 min read


अमोल खुणेंचे जरांगे पाटलांवर गंभीर आरोप सगळं माहिती आहे दोन दिवसात बोलतो ; कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार, अब्रूनुकसाणीचा दावा दाखल करणार !
अंबड: आमदार धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांची सुपारी देवून घातपाताचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता. कथित व्हायरल ऑडिओ क्लिप आणि शिष्टमंडळाच्या तक्रारीवरुन जरांगे पाटील यांचे जुने सहाकारी अमोल खुणे, दादा गरड यांना जालना पोलिसांनी अटक केली. नुकतेच जामिनावर बाहेर आलेले अमोल खुणे यांनी जरांगे पाटील यांच्यासह शिष्टमंडळावर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची दोन कोटी रुपयांना सुपारी देवून घातपाताचा आरोप करण्यात आला होता. आमदार धनं
20h2 min read


राज ठाकरेच्या समोरच मनसे शिलेदारांचे ठाकरेंच्या सेनेबद्दल गंभीर आरोप; कामाला लागण्याचे राज ठाकरेंच्या सूचना
मुुंबई : मराठी भाषेच्या मुद्याच्या एकत्र आलेल्या ठकारे बंधूंनी मुंबई महापालिका निवडणुक एकत्र लढवली. सगळे मतभेद बाजूला ठेवून ठकारे बंधूंनी पालिका निवडणुक गाजवली. सत्ता आली नसली तरी ठकारे ब्रँड जिवंत असल्याचं दाखवून दिलं आहे. पण, पालिका निवडणुकीमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये कुरुबुरी आता चव्हाट्यावर आल्या आहेत. मनसेच्या शिलेदारांनी शिवसेनेनं आपल्याला मतद केली नाही, असा पाढाच राज ठाकरेंपुढे वाचला आहे. पण, राज ठाकरेंना आता कामाला लागा, असे आदेश दिले आहेत. महापालिका निवडणुक
1d2 min read


दोन्ही पक्षांच्या विलिणीकरणा विरोधात कट शिजला, विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्यात शोककळा पसरली आहे. अजित पवार मुंबईहून बारामतीला निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमान अपघातात अजित पवार गंभीर जखमी आहे, असे सुरुवातील सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर थेट अजित पवारांच्या निधनाची बातमी आली. अजित पवार यांचा तेरावा होण्यापूर्वीच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावरून आता राजकारण रंगताना दिसत आहे. दुसरीकडे शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल आपल्याला कोणतीही कल्
1d2 min read


भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल...! अजित पवारांचा घातपात.. राऊतांचा ‘जस्टीस लोया कनेक्शन’ बॉम्ब ; संसदेत भाजपसरकारवर गंभीर आरोप
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर अन् संशय व्यक्त करणारे मुद्दे उपस्थित केले. याच मुद्यांचा संदर्भ घेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी, भाजपच्या घोटाळ्याची फाइल, असल्याचा अजितदादांनी केलेला उल्लेख अन् त्यांचा विमान अपघाती मृत्यू! रहस्यमय रित्या मृत्यू झालेल्या ‘ जस्टीस लोया’ प्रकरणाचा दाखल देत, अजित पवार यांच्या विमानाचा उपघात की घातपात, असा प्रश्न उपस्थित करत त्य
1d2 min read


पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौरपदाच्या निवडीत गोंधळ!
पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी राखीव सुटल्याने महापौरपदासाठी मोठी रस्सीखेच पहायला मिळाली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. महापौर आणि उपमहापौर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. नावांची घोशणा झाल्यावर उपमहापौरपदाच्या उमेदवाराने महापालिका भवन सोडले. यामुळे एकच गोंधळ उडाला. पिंपरी चिंचवडमध्ये सलग दुसर्यांदा भाजपची सत्ता आली आहे. भाजपचा दुसर्या टर्म मधील पहिला महापौर होण्याचा म
1d1 min read


महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध लागू करण्याची मागणी महसूल संघटनेचे मंत्री बावनकुळे यांना निवदेन
नांदेड: महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध लागू करण्याच्या मागणीसाठी महसूल कर्मचारी संघटनेने आक्रमक पाऊल उचलले आहे. मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या मागणीबाबत अद्याप ठोस निर्णय न झाल्याने संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात सोमवारी नांदेड दौर्यावर आलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना संघटनेच्या वतीने निवेदन देऊन शासन निर्णय तातडीने निर्गमित करण्याची मागणी करण्यात आली. महसूल विभागाचा आकृतीबंध लागू करण्यासाठी ‘ दांगट समिती’ ने आपला अहवाल शासनास साद
1d1 min read


मुंबईत अलर्ट: 36 तासांत 12 अल्पवयीन मुले बेपत्ता 8 अल्पवयीन मुलींचा समावेश, मानवी तस्करी करणारी टोळी सक्रिय ?
मुंबई: मुंबईतील विविध भागातून 36 तासांत 12 अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेपत्ता मुलांमध्ये आठ अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईपोलिसांनी अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. पोलिसांनी बेपत्ता मुलांच्या शोधासाठी तपासाची चक्रे फिरवली असून माणवी तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतील 7 विविध पोलिस ठाण्यातील तक्रारीनुसार 36 तासांत 12 अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहे
1d2 min read


बीड हादरलं: रायमोहात दगडाने ठेचून तरुणाचा खून पेंटींग काम करणार्या तरुणाची निर्घुन हत्या, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली
बीड : डोके दगडाने ठेचून युवकाचा निर्घुन खून केल्याची घटना रायमोहा (ता. शिरुर कासार) येथे सोमवारी (दि.2) उघडकीस आली. चांद अल्हाहुद्दीन तांबोळी वय 30 वर्षे रा. रायमोहा असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो पेंटीग व्यवसाय करत असल्याची माहिती आहे. पाटोदा पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, रायमोहा येथील चांद अल्हाहुद्दीन तांबोळी हा पेंटींग व्यवसाय करत होता. रविवारी (दि.1 फेब्रूवारी) सकाळी बीडला जातो
1d2 min read


राष्ट्रवादीचे तीन मोठे नेते भाजपच्या इशार्यावर चालतात, कारण त्यांच्या फाईली इडीकडे आहेत बच्चू कडूच्या दाव्याने खळबळ!
अजित दादांच्या दुर्दैवी निधनानंतर अस्थिवित्सर्जन झाल्यानंतर अवघ्या काही तासांत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीपूर्वी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका, हालचालींबाबत आता बच्चू कडूंनी ‘प्रहार’ केला आहे. “ राष्ट्रवादीचे तीन मोठे नेते भाजपच्या इशर्यावर चालत असल्याचा दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांचे बारामती विमानतळावर विमान अपघातात (दि.28 जानेवारी) दुर्दैवी निधन झाले. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचा नवा उपमुख्यम
1d3 min read


समाजाच्या वेदना मुकनायकायकातून प्रकट झाल्या- प्रा. श्रीराम जाधव बीडच्या शिरुरकासार तालुक्यात प्रथमच मुकनायकदिन साजरा
बीड : समाजाच्या वेदना आणि विद्रोह प्रकट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक सुरू केले होते, असे मत प्रा. श्रीराम जाधव व्यक्त केले. ते शिरूर कासार तालुक्यात प्रथमच साजऱ्या होत असलेल्या मुकनायक दिनानिमित्त बोलत होते. शिरूर कासार तालुक्यातील राक्षसभुवन (तांबा) येथे मुकनायक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विचार पिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप मिसाळ, प्रमुख पाहुणे युवराज सोनवणे, माजी प्राचार्य सुधाकर खोले, समीर पठाण, आरती वक्ते, नंदकिशोर उपरे, कचरू महाडिक,
2d1 min read


शपविधीबाबत आम्हाला कोणालाही माहिती नव्हती , तेरावा होईपर्यंत राजकीय भाष्य करणार नाही- आमदार रोहित पवार
अजित दादांची बातमी आपण ऐकली, बातमी खरी आहे का स्वत्न आहे हे आम्हालाही कळत नाही. आजपर्यंत आम्ही त्या दु:खात आहोत, त्या विमानात आणखी जे होते त्यांचाही परिवार दु:खात होता. काही दिवसांपूर्वी कळले की, दिंडोरी तालुक्यातील सुदाम बोडके हे अजित दादांचे आणि साहेबांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. जेव्हा त्यांना अजित दादांच्या निधनाची बातमी कळली, तेव्हा अस्वस्थ झाले नंतर ते हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. आज पवार परिवार आणि हा परिवार दु:खात आहे. त्यामुळे मी बोडके कुटुंबीयांची भेट घ
2d2 min read


आम्हाला राजकारण करायचं नाही, अन्यथा मी खूप गोष्टी सांगू शकतो; राष्ट्रवादीने विलिकरणापूर्वी भाजपशी चर्चा करावी - मुख्यमंत्री फडणवीस अजित दादांच्या अपघातावर तर्क लावणार्यांना मुख्यमंत्र्यांनी सुनावलं
अजित पवारांच्या निधनानंतर सुरू झालेल्या राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विमान अपघाताबाबत तर्क वितर्क लावणार्यांनाही मुख्यमंत्र्यांनी सुनावलं आहे. अजित पवार भाजपशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा निर्णय करतील का? असा प्रश्न फडणवीसांनी विचारला. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची तारीख ठरली असती तर आम्हाला सांगितलं असतं असही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच राष्ट्रवादीने विलिनीकरणाचा निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी असंही देव
2d2 min read


केंद्रीय अर्थसंकल्प 2026 : चीनशी स्पर्धा करण्यासाठी भारताचे सेमीकंडक्टर आणि रेअर अर्थ क्षेत्रात पाऊल
केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सेमीकंडक्टर आणि रेअर अर्थ खनिज क्षेत्रासाठी अनेक प्रमुख उपक्रमांची घोषणा केल्याने शेअर बाजारात प्रचंड उत्साह दिूसन आला. गुंतवणूकदारांनी या घोषणांना भारताच्या भविष्याकडे एक मोठे पाऊल म्हणून पाहिले, ज्याचा थेट परिणाम बाजारावर झाला. अर्थसंकल्पानंतर लगेचच चिप उत्पादक कंपन्यांचे शेअर्स वाढले. डिक्सन टेक्नॉलॉजीज आणि सीजी पॉवर सारख्या प्रमुख कंपन्यांचे शेअर्स 6% ने वाढले, जे सरकारच्या धोरणाबद्दल गुंतवणूकदारांच्या सकारात्मक भावना
2d2 min read
bottom of page