राष्ट्रवादीचे तीन मोठे नेते भाजपच्या इशार्यावर चालतात, कारण त्यांच्या फाईली इडीकडे आहेत बच्चू कडूच्या दाव्याने खळबळ!
- Navnath Yewale
- 2 days ago
- 3 min read

अजित दादांच्या दुर्दैवी निधनानंतर अस्थिवित्सर्जन झाल्यानंतर अवघ्या काही तासांत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीपूर्वी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका, हालचालींबाबत आता बच्चू कडूंनी ‘प्रहार’ केला आहे. “ राष्ट्रवादीचे तीन मोठे नेते भाजपच्या इशर्यावर चालत असल्याचा दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
अजित पवार यांचे बारामती विमानतळावर विमान अपघातात (दि.28 जानेवारी) दुर्दैवी निधन झाले. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचा नवा उपमुख्यमंत्री कोण? असा काहीसा प्रश्न निर्माण होत असतानाच अंत्यसंस्काराच्या दिवशीच राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. दुसर्या दिवशी सकाळी राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनतर अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी बारामती गाठून सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप दिला.
राष्ट्रवादीमधील या घडामोडी ठरवून शरद पवार यांच्यासह कुटुंबीयांना अनभिज्ञ ठेवण्यात आले. शरद पवार यांनी स्वत: पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत आपल्याला कल्पना नसल्याचे सांगितले, आमदार रोहित पवार यांनीही सुनेत्रा काकुंच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत आम्हाला काहीच माहिती नसल्याचे सांगितले. शिवाय, शपथविधीबाबत सुप्रिया सुळेही आम्हाला माहिती नसल्याचे म्हणाल्या. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत अजित पवार यांनी बैठकीत चर्चा केली होती, दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण हीच अजित पवार यांची शेवटची ईच्छा असल्याचे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख नेत्यांसह पवार कुटुंबीयांचे अत्यंत विश्वासू किरण गुजर म्हणाले.
प्रत्यक्षात दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण समोर ठेवूनच होवू घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुका घड्याळ चिन्हावर लढवत आहोत, अजित पवार येत्या 12 जानेवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाची घोषणा करणार होते असंही शरद पवार गटातील नेत्यांचं म्हणणं आहे. आमदार जयंत पाटील आणि अजित पवार यांचं विलिनीकरणाबाबत बोलनं सुरु होतं असं शरद पवार पक्षाचे नेत्यांनी वारंवार स्पष्ट केलं आहे.
मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “ अजित पवार आणि मी घटनेच्या एक दिवस अगोदर दोन चर्चा करत बसलो होतो, तसं काही असतं तर ते माझ्याशी बोलले असते” असं म्हणत दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबतचा विषय फेटाळून लावला.
दरम्यान, अजित पवार यांच्या अस्थिवित्सर्जनाच्या दिवशी सकाळी माध्यमांसमोर “आमच्या पक्षावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, तुर्तास आम्ही काही प्रतिक्रिया देण्याच्या मनस्थित नाहीत, नंतर बोलू” असे म्हणारे सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्रीशपथविधी नंतर अवघ्या काही वेळात माध्यमांसमोर येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरात सूर मिसळत ज्यांना आमच्यात यायचं आहे त्यांनी यावं आम्हाला एनडीए सोबत राहायचं आहे ” अशी प्रतिक्रिया दिली. म्हणजेच एकप्रकारे दोन्ही राष्ट्रवादी विलीनिकरणावर पडदा टाकला.
अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासात उपमुख्यमंत्रीपदाबात निर्णय घेवून भाजपने अजित पवार यांच्याबद्दलची सहानुभूतीच संपवली, राष्ट्रवादीच्या मोजके प्रमुख नेते जे तनाने राष्ट्रवादीचे आणि मनाने मात्र भाजपचे आहेत. (बच्चू कडू यांच्या भाषेत) यांना हाताशी धरुन हा डाव साधल्याचे बोलले जात आहे.
उपमुख्यमंत्रीपद घटनात्मक नाही तर ते राजकीय सोयीचे आहे, सरकार बहुमतात असताना उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी घाई का? असा प्रश्न सामान्यजनतेला पडला आहे. दुसरीकडे
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्या राजकीय हालचाली बाबत राज्यभरात संताप व्यक्त होत आहे.
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरण होवूच नये यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातील प्रमुख नेते अजित पवार यांच्या निधनानंतर काही क्षणात कामाला लागल्याचा आरोपही राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षातील पदाधिकारी दबक्या आवाजात करताना दिसत आहेत. त्यातच आज बच्चू कडूंनीही जोरदार हल्लाबोल करत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातील तीन नेते राष्ट्रवादीत असले तरी ते बीजेपीच्या इशार्यावर चालतात. कारण त्यांच्या फाईली तिकडे अटकलेल्या आहेत. सामान्य माणसाला विचारलं तर घाइने शपथविधी व्हायला नको होता. कही जरी झालं तरी आम्ही पाहातोय का दु:खाचं सावट सगळीकडेच आहे.
अशी काही वेळ काळ असली तरच तो निर्णय घ्यायला हावा होता. तरच लोकांनी सहन केला असता, पण राष्ट्रवादीतल्या तीन मोठ्या नेत्यांनी हा सगळा... कारण त्यांच्या इडीच्या फाईली तयार आहेत. आणि त्यांनी हा अंदरुन केलेला कार्यक्रम आहे. त्यामुळं काय झालं जी दादाबद्दलची सहानुभूती ती सुद्धा या कार्यक्रमामुळे मागे पडली दिसते आणि बीजेपीने मोठा डाव खेळलेला दिसतोय असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले. दरम्यान, अजित दादा यांच्या मृत्यूनंतरच्या राजकीय घडामोडीवर बच्चू कडू यांनी जोरदार ‘प्रहार’ केला आहे.



Comments