top of page


राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी घेतली मोदी, शाहची भेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिल्लीचं निमंत्रण!
नवी दिल्ली: अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनतर आता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण याबाबत चर्चांना उधान आले आहे. वेगवेगळ्या नेत्यांच्या नावांची चर्चा होत आहे. खासदार प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष असतील असा दावा केला जात होता, मात्र आता पटेल यांनी हे वृत्त खोटे असा दावा केला आहे. आपण राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे पटेल म्हणाले. त्यांनतर आता पटेल यांनी
9 hours ago2 min read


पुणे, बीडच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारच; अजित दादानंतर जबाबदारी , परिपत्रक जारी
मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत जबाबदारी स्वीकारली. अजित पवारांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी राजभवन येथे त्यांचा शपविधी संपन्न झाला. सुनेत्रा पवार यांचा शपविधी घाईघाईत झाल्याने त्यांच्यावर टीकाही करण्यात आली. तर, अनेकांनी त्यांचे समर्थनही केले, यासंदर्भात आज राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पवार कुटुंबाने तिसर्याच दिवशी सर्व दशक्रिया विधी उरकल्या
12 hours ago2 min read


राष्ट्रवादीचे तीन मोठे नेते भाजपच्या इशार्यावर चालतात, कारण त्यांच्या फाईली इडीकडे आहेत बच्चू कडूच्या दाव्याने खळबळ!
अजित दादांच्या दुर्दैवी निधनानंतर अस्थिवित्सर्जन झाल्यानंतर अवघ्या काही तासांत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीपूर्वी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका, हालचालींबाबत आता बच्चू कडूंनी ‘प्रहार’ केला आहे. “ राष्ट्रवादीचे तीन मोठे नेते भाजपच्या इशर्यावर चालत असल्याचा दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांचे बारामती विमानतळावर विमान अपघातात (दि.28 जानेवारी) दुर्दैवी निधन झाले. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचा नवा उपमुख्यम
2 days ago3 min read


नाशिकच्या पालकमंत्र्यांना प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेबांचा विसर! भाषणात नाव न घेतल्याने वनकर्मचारी महिलेचा संताप, अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाईची मागणी; मंत्री गिरीश महाजनांकडून दिलगिरी
नाशिक: प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्त नाशिकमध्ये आयोजित शासकीय ध्वजारोहण सभारंभात आज एक अनपेक्षित आणि खळबळजनक घटना घडली. जिल्हाचे पालमंत्री गिरीश महाजन यांचे भाषण सुरू असताना. वनविभागातील एका महिला कर्मचार्याने थेट त्यांना जाब विचारात भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख का केला नाही, असा सवाल उपस्थित केला. या प्रकारामुळे काही काळ कार्यक्रमस्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता. माधवी जाधव असे या महिला कर्मचार्याचे नाव असून त्या वनविभागात कार्यरत आहेत. पालकमंत्र्यांचे भ
Jan 262 min read


झेडपीलाही महायुतीचा बिनविरोध पॅटर्न जोमात: जिल्हा परिषदेत 5 आणि पंचायत समितीत 6 उमेदवार बिनविरोध
सिंधुदूर्ग: महापालिका निवडणुकानंतर आता जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजप महायुतीचा बिनविरोध पॅटर्न पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप महायुतीचे तब्बल 11 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यामध्ये भाजपचे 10 आणि शिंदेंच्या शिवसेनेचा 1 उमेदवार बिनविरोध आहे. जिल्हा परिषद गटातून 5 उमेदवार बिनविरोध असून उमेदवार पंचायत समिती गणातून बिनविरोध आहेत. त्यामुळे महायुतीने महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही बिनविरोध पॅटर्न
Jan 242 min read


पुणे महापालिकेला जानेवारीमध्ये तर मुंबईला फेब्रूवारीत मिळणार महापौर
पुणे : राज्यातील सर्व महापालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यासाठी राज्य सरकारने कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, महापालिकांकडून महापौर-उपमहापौर निवड आणि नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली सभा घेण्याची तांत्रिक तयारी सुरू झाली आहे. महापालिकेच्या विभागाकडून शुक्रवारी (दि.23) विभागीय आयुक्तांना यासंदर्भात पत्र पाठविले गेले. विभागीय आयुक्तांकडून दोन दिवसांत पहिल्या सभेची तारीख आणि पीठासीन अधिकार्याची नियुक्तीची माहिती महापालिकेला कळविली जा
Jan 241 min read


भाजपने सत्तागणित जुळवले, काँग्रेसच्या हातून महापालिका गेली;प्रकाश आंबेडकरांनाही धक्का!
अकोला: आकोला महापालिकेत काँग्रेस विरोधी पक्षांनासोबत घेऊन सत्ता स्थापन करेल, अशी शक्यता होती. प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलून आपला सत्तेत वाटा नको मात्र भाजपला सत्ता स्थापनेपासून रोखू अशी चर्चा झाली. त्यासाठी आंबेडकर यांच्या निवास्थानी बैठक देखील झाली होती. त्यामुळे भाजप सत्तेपासून दूर रहाणार अशा चर्चा होत्या. मात्र,भाजपने गेम फिरवत मित्र पक्षांना सोबत घेत ‘शहर सुधार आघाडी’ स्थापन करून सत्ता आपल्याकडे राहिल, अशी खेळी केली आहे. अकोला महानगरपालिकेतील सत्तास्थापनेचे गणित जुळले अस
Jan 242 min read


राज्याच्या राजकारणात मोठा भुकंप?: मुंबईत शिवसेनेचं ‘ऑपरेशन टायगर’ , ठाकरे गटाचे दोन अंकी नगरसेवक नॉट रिचेबल; शिंदे गटाच्या संपर्कात!
मुंबई: महानगरपालीकेच्या निकालानंतर महापौरपदाचा संस्पेन्स कायम असताना एकनाथ शिंदे यांनी आपले विजयी नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले आहेत. एकनाथ शिंदेना ‘ऑपरेशन लोटस’ की ‘मातोश्री’ची भीती अशा चर्चा होत असतानाच आता पुन्हा मोठ्या राजकीय उलथापालथची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना शिंदे गट ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात येत असल्याची चर्चा आहे. ठाकरे सेनेचे दोन अंकी नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान विरोधी बाकावर बसण्यास उदासिन असलेले नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात असल्या
Jan 181 min read


जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगूल वाजले, दोन टप्यात निवडणुकां पहिल्या टप्प्यात 12 जिल्हापरिषदा 125 पंचायतसमित्यांचा समावेश
मुंबई: महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक अयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची घोषणा केली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी येत्या 5 फेब्रूवारी रेाजी मतदान होऊन 7 फेब्रूवारी रोजी निकाल लागणार आहे. गेल्या महिन्यातच (डिसेंबर 2025) महाराष्ट्रात विविध नगरपालिकांसाठी मतदान होऊन निवडणुका झाल्या. आता दोनच दिवसात राज्यातील महानगरपालिकांतील मतदान होत आहे. त्यामुळे या निव
Jan 132 min read


..तर अशी आमदारकी मला नकोच, मी तिचा त्याग करेन सोलापूरात भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यासमोरच प्रतिज्ञा
सोलापूर : सोलापूर शहराला पाण्याचा दिवस म्हणजे शाप आहे, हे मी अनेकदा बोललो आहे. मी जबाबदारीने सांगतो की, सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा केल्याशिवाय मी आमदारकीच्या निवडणुकीत मतं मागायला तुमच्या दारात येणार नाही. हा शब्द मी तुम्हाला सिद्धरामेश्वरांच्या साक्षीने देतो. मी माझ्या लोकांना दररोज पाणी देऊ शकत नसेल, तर मला अशी आमदारमी नको. मी माझ्या आमदारकीचा त्याग करेन, अशी प्रतिज्ञा भाजपचे आमदार दवेंद्र कोठे यांनी आज सोलापुरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केली. सोलापूर महापालिका निव
Jan 102 min read


डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान मोदींचे अपहरण करणा काय? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे वदग्रस्त वक्तव्य
मुंबई: जानेवारी 2026 च्या सुरुवातील एका राजकीय वादान भारतीय राजकारणाला हादरवून सोडले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अमेरिकेतील अटकेचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. चव्हाण यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतीय पंतप्रधानांचे अपहरण करू शकतात का? असा प्रश्न विचारला आहे. भाजपने या विधानावर तीव्र आक्षेप घेत याला “ भारविरोधी मानसिकता” म्हटले आहे.
Jan 82 min read


लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, रविंद्र चव्हाणांचे वादग्रस्त वक्तव्य
लातूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. लातुरमध्ये कार्यकर्ता मेळाव्यास संबोधीत करताना रविंद्र चव्हाण यांनी स्व. विलासराव देशमुख यांच्या बाबत वक्तव्य केल्याने मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करताना दिसून येत आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार, आणि आता स्व. विलासराव देशमुख यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. लातुरमध्ये आज क
Jan 51 min read


मुंबईकर उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवणार नाहीत- मंत्री बावनकुळे
मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संयुक्त वचननामा प्रकाशित केला. महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील महापौर मराठीच होणार, असा निर्धार त्यांनी केला. ठाकरे बंधूंच्या वचननामावर भाजपने पहिली प्रतिक्रीया दिली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.“ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकासाचे मॉडेल उद्धव ठाकरे कधीच पुढे नेऊ शकत नाहीत. फडणवीस यांनी मुंबईचे 2047 चे व्हिजन तयार के
Jan 41 min read


राज्यात भाजप सरकारमुळेच लोकशाहीला गालबोट; निवडणुकीत गुंडगिरी, धमक्या, ब्लॅकमेलिंगचा असुरी प्रयोग- संजय राऊत
मुंबई : राज्यात भाजप सरकारमुळे लोशाहीला गालबोट लागत आहे, तर राज्यातील महापालिका निवडणुकांत व मुंबईतील निवडणुकांत धमक्या, ब्लॅकमेलिंग दहशतीचे गैरप्रकार सुरूच आहेत. कल्याण- डोंबिवलीत मोठा गोंधळ झाल्याचा गंभीर आरोप करत खासदार संजय राऊत यांनी बिनविरोध मिरवणूकां विषयी त्यांनी सरकावर तीव्र टीका केली आहे. म्हणाले. राज्यातील 29 महापालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना पक्षाचे एकून 66 नगरसेवक बिनविरोध घोषीत झाले आहेत. शिवाय राष्ट्रवादी ( अजित पवार) पक्षाचेही दोन नगरसेवक बिनविरोध घोषीत झाले
Jan 32 min read


बिनविरोध आलेले नगरसेवक आयोगाच्या रडावर! निवडणूक आयुक्तांच्या निवडणूक निर्णय अधिकार्यांना सूचना
मुंबई: राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रक्रियेत संशयास्पद बाबी घडल्याचा आरोप करत विरोधकांनी जोरदार टीका केल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. छाननीनंतर अर्ज वैध ठरल्यापासून राज्यभरातून सत्ताधारी नेत्यांकडून तसेच यंत्रणांकडून अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हाधिकार्यांकडे करण्यात येत आहेत. त्या पार्श्
Jan 32 min read


महापालिकां निवडणुक: बंडखोर कोणाचा खेळ बिघडवणार?
मुंबई: महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. सर्व राजकीय पक्षांमध्ये तिकीट न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी उफाळून आल्याचे दिसून आले. यात भाजपमधल्या नाराजांची संख्या अधिक होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नाराज कार्यकर्त्यांना फोन करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, यातल्या बहुतेकांनी त्यांचे उमेदवारी अर्ज घेतले. पण काही ठिकाणी नाराज मागे हटले नाहीत, त्यामुळे आता निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. मुंबईमध्ये आध
Jan 21 min read


नांदेड महापालिका निवडणुक: भाजप उमेदवारीसाठी अशोक चव्हाणांनी 50 लाख घेतले- भानुसिंग रावत ; शिवसेना (शिंदे) गटाचे दोन अधिकृत उमेदवार पळवल्याचा आमदार कल्याणकरांचा आरोप
नांदेड : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आयाराम-गयारामांची संख्या वाढली असून बाहेरून आलेल्या लोकांना तिकिट दिलं जात असल्याचा आरोप सर्वच पक्षातून होत आहे. नांदेडमध्येही तशीच काहीशी स्थिती आहे. दरम्यान भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर उमेदवारीसाठी 50 लाख रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप त्यांचे जुने सहकारी माजी नगरसेवक भानुसिंह रावत यांनी केला आहे. या आरोपमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे भानूसिंग रावत यांनी निष्ठावंत कार
Jan 21 min read


काँग्रेसचे नेते राहुल गांधी शंभर टक्के पंतप्रधान होणार!
नवीदिल्ली: माहाराष्ट्रात सध्या राजकीय धुराळा उडालेला आहे. नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचे विधानसभा निवडणुकीसारखे निकाल लागले आहेत. भाजपचा वरचष्मा आहे तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपची मजबूत पकड, मगरमिठ्ठी विविध राजकीय संस्थांना पडत असल्याचे चित्र आहे. त्यातच नवीन वर्ष आले की भविष्यात काय होणार, याची चर्चा होतेच. अशीच एक चर्चा सध्या देशाचं लक्ष वेधून घेत आहे. काँग्रेसचे नेते आणि सध्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे 100 टक्के पंतप्रधान असा दावा एका ज्योतिषाने केला आहे
Dec 23, 20252 min read


नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीत महायुतीची मुसंडी
राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचयातीच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. विधानसभेनंतर पुन्हा एकदा नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीनं जोरदार मुसंडी मारत बाजी मारली आहे. तर महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी काही ठिकाणी विजय मिळवला आहे. समोर आलेल्या निकालात सध्यातरी महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचाच बोलबाला दिसून येत आहे. एकीकडे या विजयानंतर महायुतीकडून जल्लोष साजरा केला जात असताना माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र हा पक
Dec 21, 20255 min read


नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदारांना डांबून ठेवले, अंबरनाथमध्ये गोळीबार
नांदेड/ अंबरनाथ : नगरपरिषद निवडणुक मतदान प्रक्रियेसाठी चक्क मतदारांना अमिष दाखवून शहरातील एका मंगलकार्यालया डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे उघडकीस आला आहे. भाजप आमदाराच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना पैशाचे प्रलोभन देवून मंगलकार्यालयात डांबून ठेवले होते. वेळीच काही पत्रकार घटनास्थळावर पोहोचल्याने हा प्रकार उघडकीस आल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अंबरनाथमध्ये भाजप-शिवसेना (शिंदेगट) पक्षात पैसे वाटपाच्या आरोपांवरून गोळीबाराची घटना समोर आली आहे.
Dec 20, 20251 min read
bottom of page