top of page


जरांगे पाटीलांना बदनाम करण्याचं षडयंत्र- आमदार अब्दुल सत्तार
छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील यांना मी पंचवीस वर्षापासून ओळखतो, त्यांच्यावर केले जाणारे आरोप हे त्यांना बदनाम करण्यासाठी केले जात आहेत. ते कितीही कोटी दिले तरी विकले जाणार नाहीत हे लक्षात आल्यामुळे त्यांच्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले गेले आहेत, असं या सगळ्या आरोपावरून स्पष्ट होत आहे. माझ्यावर जरांगे पाटील यांना सहा कोटी रुपये दिल्याचा आरोप करणार्याला आपण कायदेशीर धडा शिकवू, असा इशाराही शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिला. मनोज जरांगूे पाटील यांनी आंदोलनच करू नय
11 minutes ago2 min read


मंत्री विखे पाटीलांनी घेतली मनोज जरांगेची भेट संभाजीनगरच्या गॅलॅक्सी हॉस्पीटलमध्ये जरांगे पाटलांच्या प्रकृतीची विचारपूस
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या पाटोदा येथे उपोषण स्थगित केले. प्रकृती खालवल्याने त्यांच्यावर संभाजीनगरच्या गॅलॅक्सी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहे.पाटोदा येथे चर्चेनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज शनिवारी (दि.19) हॉस्पीटलमध्ये जरांगे पाटलांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी जरांगे पाटील आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी मुंबईकडे कूच केली होती. आंतरवाली सराटी येथून मंगळवारी (दि.15) शहागड (ता. आंबड), गेवाराई (जि.बीड), बीड, मा
43 minutes ago1 min read


विलास घुले हत्या प्रकरणाचे सीआयडीकडून न्यायालयात दोषारोपत्र सादर खासदार पुत्राचा हत्याकांडात सहभाग नाही, न्यायालयीन प्रक्रियेला सुरुवात!
बीड: बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यवसायिक विलास घुले याची हत्या करण्यात आली होती. भांडण मिटवण्यासाठी गेल्यानंतर विलास घुलेची हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात सुरूवातीपासून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव फिर्यादीपक्षाकडून पुढं येत आहे. अशातच आता या प्रकरणात सीआयडी तपासानंतर मोठी घडमोड समोर आली आहे. विलास घुले हत्याप्रकरणात सीआयडीकडून मोठी अपडेट समोर आली आहे. यसा प्रकरणात दहा आरोपिविरोधात केज न्यायालयात 200 पनी दोषारोपपत्र सादर करण्यात आल्य
1 hour ago1 min read


दुष्काळ आढावा बैठकीत काजू-बदाम घटनेचे पडसाद; हिंगोलीत शेतकर्यांनी कृषीमंत्र्यांचा ताफा आडवला
हिंगोली: नांदेडमध्ये मराठवाड्याच्या दुष्काळी आढावा बैठकीत मंत्री, खासदारांनी काजू- बदामांवार ताव मारल्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. आढवा बैठक आटोपून हिंगोली जिल्ह्यात दुष्काळाची पाहाणी करण्यासाठी आलेल्या कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना शेतकर्यांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. टाकळगाव येथे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा आडवून संतप्त शेतकर्यांनी मंत्री भरणे यांच्यासमोर काजू-बदाम ठेवून नांदेडमधील बैठकीत घडलेल्या प्रकाराचा निषेध केला. मराठवाड्यासह राज्यभरात पावसाने
2 hours ago2 min read


दुष्काळाच्या आढावा बैठकीत मंत्री, खासदारांचा काजू-बदामांवर ताव नांदेडमधील संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल; खासदार संजय जाधव यांच्यावर टिकेची झोड
नांदेड: राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाअभावी शेती संकट आली असून शेतकरी पिकांच्यास नुकसानीमुळे चिंतेत असताना नोंदडमध्ये झालेल्या दुष्काळ आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या दुष्काळी बैठकीत संतापजनक प्रकार समोर आला. दुष्काळासारख्या संवेदनशील मुद्यावर लोकप्रतिनिधी आणि अधिकार्यांनी चर्चा करण्या आधी चक्क काजू-बदामांवर ताव मारला. बैठकीत काजू-बदामावर ताव मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने बैठकीतील काजू- बदामांच्या प्लेट हटवल्या. शेतकर्यांप्रती दाखवल
3 hours ago2 min read


मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांपेक्षा मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या अधिक - उद्धव ठाकरे
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याचे प्रश्न ऐनवेळेस टपकलेले नाहीत, अनेक काळापासून ते चालत आलेले आहेत. मराठवाडा लढणारा आहे निजामाबरोबर लढणारा मराठवाडा आहे. लढण्याची पार्श्वभूमि असणारा हा मराठवाडा रडणारा कधी झाला. रजाकाराबरोबर लढताना जो संघर्ष झाला. रक्तरंजीत संघर्ष, तो रक्तपात होता. त्यामध्ये मराठवाड्याने किती आत्माहूती दिली आणि मराठवाडा आपल्या देशात आल्यानंतर गेल्या 75 वर्षात किती शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. आकडे काढले तर कदाचीत हुतात्म्यांपेक्षा शेतकरी आत्महत्या जास्त असतील अ
2 days ago2 min read


बीड-पुणे रेल्वे शुभारंभ कार्यक्रमास मुंडे बंधू-भगिणींची दांडी!; चर्चांना उधान
बीड: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून बीड- हडपसर (पुणे) या नवीन रेल्वे सेवेचा बीड स्थानकावरून थाटात शुभारंभ करण्यात आला . राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेता पवार यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मात्र, या अत्यंत महत्वकांक्षी आणि बहुप्रतिक्षित प्रकल्पाच्या उद्घाटनाला जिल्ह्याचे प्रमुख नेते मंत्री पंकजा मुंडे आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे या दोघांचीही अनुपस्थिती राहिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. बीडच्या रेल्वे स्
2 days ago1 min read


बीड-पुणे रेल्वेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी रेल संख्या “झिरो वन फोर झिरो वन” प्रस्थान के लिए तयार है हा आवाज परिसरात घुमला !
बीड : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत बीडकरांसाठी आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक व आनंददायी ठरला आहे. अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या 'बीड-पुणे' थेट रेल्वेसेवेचा आज राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शानदार शुभारंभ करण्यात आला. याच भरगच्च कार्यक्रमात बीडच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासाला मोठी चालना देणाऱ्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे आणि धानोरा रस्त्यावरील 'पंढरी' येथील विज्ञान उद
2 days ago2 min read


जरांगे पाटलांनी उपोषण सोडले; आंदोल मात्र सुरूच राहणार!पाटोद्यात शिष्टमंडळाची मध्यस्थि, मागण्या मान्य, सरकारला 90 दिवसांची मुदत
बीड: मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आज 20 व्या दिवशी आपले उपोषण सोडले. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून बीडमधील पाटोदा येथे झालेल्यसा चर्चेत सरकारला जरांगे यांची मनधरणी करण्यात यश आले. सरकारने शब्द दिल्यानंतर जरांगे यांनी उपोषण सोडलं, मात्र आंदोलन सुरूच राहणार आसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागण्यांच्या आंमलबजावणीसाठी सरकारने जरांगे पाटील 90 दिवसांचे अश्वासन देण्यात आले आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 20 वा दिवस होता. कालच त्य
2 days ago3 min read


जरांगे पाटीलांचा उद्या दुपारी मुंबईला निघण्याच इशारा
बीड: मराठा आंदोलक जरांगे पाटील उपोषण सुरू असतानाच आहे त्या स्थितीमध्ये मंगळवारी (दि.15) मुंबईकडे रवाना झाले आहेत. नियोजीत मुक्काम ठिकाणांहून ते दि. 19 सप्टेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल होणार आहेत. मात्र, प्रकृती खालवल्याने त्यांच्यावर पाटोदा, जि.बीड (मुक्काम ठिकाण)उपचार करण्यात आले. उपचारानंतर सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माझी प्रकृती ठिक नाही त्यामुळे मला इथून मार्गस्थ होता आलं नाही. पण मी मागे हटणार नाही, उद्या दुपारी 1:00 वाजेपर्यंत मी मुंबईकडे निघणार
3 days ago1 min read


आदिवासी वसतीगृहाचा करार फाडला; अभिजीत दिकपे आक्रमक एमपीएससी अध्यक्ष फडणवीस यांचे मित्र म्हणून राजीनामा होत नाही का?
नागपूर: अदिवासी विकास विभागाने लक्ष्मण मानकर ट्रस्टसोबत केलेला 490 आदिवासी वसतीगृहांच्या व्यवस्थापनाचा करार रद्द करावा अशी मागणी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केली. कराराची प्रत फाडून त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर, नागपूर येथे विदर्भातील विविध जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांशी दिपके यांनी बुधवारी (दि.16) संवाद साधला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढताना मोजक्यवा आणि ठोस मागण्या नि
3 days ago2 min read


जरांगे पाटलांची प्रकृती खालवली;आंदोलनावर ठाम,महंत शिवाजी बाबा महाराज यांचा उपचाराचा अग्रह, जरांगे पाटलांवर पाटोद्यात उपचार
बीड: मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर ही आंदोलनावर ठाम जरांगे पाटील बुधवारी (दि.15) अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले. अंतरवाली सराटी पासून पाटोदा (जि. बीड) पर्यंत लाखो समाजबांधवांनी जरांगे पाटलांची अभूतपूर्व स्वागत केले. त्यामुळे जरांगे पाटील यांना मुक्काम ठिकाणी पाटोदा पोहोचण्यास मध्यरात्रीचे 2:00 वाजले. उपस्थितीतांना मार्गदर्शन करताना जरांगे पाटील यांना आरोग्याचा त्रास जानवत होता. मात्र त्यांनी आरोग्य समस्याची तमा न बाळगता उपस्थ
3 days ago3 min read


महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचालींना वेग, अमित शाह यांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसापासून मुुंबई दौर्यावर होते. त्यांनी एनडीए सत्ता असलेल्या 21 राज्यांमध्ये 2029 पूर्वी समान नागरी कायदा लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात समान नागरी कायदा लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि.14) पत्रकार परिषदेत मोठे विधान केले. समान नागरी कायदा तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आधीच सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सरकार पुढील प्रक्रिय
5 days ago1 min read


पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारताच,जरांगे पाटलांनी डाव टाकला
अंतरवली: मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर मनेाज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाच्या रणनितीत बदल करत मोठा डाव टाकला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आता संपूर्ण मराठाव आंदोलकांची फौज सोबत घेऊन न जाता एकट्यानेच मुंबईला जाण्याची घोषणा केली आहे. गणेशोत्सवाच्यसा काळात लाखो मराठा आंदोलक मुंबईत आल्स कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे कारण पोलिसांनी दिले होते. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मी एकटाच मुंबईला येतो अशी घोषणा केली आहे. आझाद
5 days ago2 min read


आझाद मैदानामध्ये आदोलनासाठी जरांगे पाटीलांना मुंबई पोलिसांनी दुसर्यांदा परवानगी नाकारली
मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी पुन एकदा परवानगी नाकारली आहे. मनोज जरांगे यांचं जालन्यातील अंतरवली सराटी येथे गेल्या 16 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आपल्या मागण्या मान्य न झालयाने आता जरांगे मुंबईच्या दिशेला कूच करण्याच्या तयारीत आहेत. मनोज जरांगे उद्या सकाळी अंतरवलीहून मुंबईच्या दिशेने मार्गक्रम करणार आहेत. मुंबईच्या आझाद मैदान उपोशण करण्याचा त्यांचा मानस आहे. पण मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी मनोज जरांगे यांच्या उप
5 days ago2 min read


आणिबाणी लागू करून सरकार चालू शकत नाही, ती काँग्रेसची संस्कृती आहे -अमित शाह
मुंबई : देशभरात झालेल्या जेन झींच्या आंदोलनाबद्दल भाष्य करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आमची आणीबाणी लागू करून सरकार चालवण्याची संस्कृती नाही. असे उत्तर दिले. अमित शाह यांची मुंबईत पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी विद्यार्थी आंदोलनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि आता देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या सेवेला 25 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भाजपा प्रण
6 days ago1 min read


मुंबई आंदोलनासाठी परवानगी नाकारली; जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, उपचार, पाणी सोडले
अंतरवाली : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय आणि सामजिक वातावरण चांगलंच तापलं आहे. अंतरावाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, मनोज जरांगेच्या 19 स्पटेंबरच्या आंदोलनालाही मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यावरून मनोज जरांगे पाटलांनी संताप व्यक्त करत मुंबई आंदोलनावर ठाम भूमिका घेतली आहे. मागील आंदोलनामध्ये नियमांचा भंग झाल्याचे कारण देत मुंबई पोलिसांनी जाहीर सभ
6 days ago2 min read


पाटोदा बसस्थानकातील सोन्याचे दागिने, रोख रकम चोरीचा छडा लागलाआरोपी महिलेकडून 13.97 लाखांचा मुद्देमाल जप्त
बीड: बसस्थानकात गर्दीचा फायदा घेवून बसमध्ये चढताना हातसफाईने महिलांचे दागिणे, रोखरक्कम चोरीचे प्रकार जिल्ह्यात वाढत आहेत. पाटोदा बसस्थानक परिसरात बॅगेतून लाखोंचे सोने व रोख रक्कम चोरीला गेले होते. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलिसांत अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हादाखल करण्यात आल. स्थानिक गुन्हे शाखा व पाटोदा पोलिसांनी घटनेच्या तपासामध्ये तांत्रिक पुरव्याअधारे चुंभळी फाटा येथून एका महिलेस ताब्यात घेतले. तिच्याकडून चोरीस गेलेले 8 तोळे 4 ग्रॅम सोन्याचे दागिने 10 हजार रु
7 days ago2 min read


विलास घुले हत्याप्रकरण: कुटुंबिय, ग्रामस्थांचा बीड- केज महामार्गावर रास्तारोको; खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाच्या अटकेची मागणी
बीड: विलास घुले हत्या प्रकरणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरभ सोनवणे यसांच्या अटकेची मागणी करत घुले कुटुंबियांसह ग्रामस्थांनी आज शनिवारी (दि.12)पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला. बीड-केज मार्गावर टायर जाळून तब्बल चार तास रास्तारोको करण्यात आला. या रास्तारोकोमुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. विलास घुले खून प्रकरणातील सीआयडीद्वारे सुरू असलेल्या तपासाची सद्यस्थिती लेखी स्वरुपाची दिली जावी, घटना घडली त्याच्या आदल्या दिवसींचा आरोपींशी फोन संवादाचा सीडीआरमध्ये समावेश
Sep 122 min read


जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनापासून नाशिकच्या क्रांती मोर्चांचे समन्वयक अलिप्त?
नाशिक: मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने कूच करण्याची घोषणा केली असली, तरी त्यांना राज्यातील आंदोलकांकडूनच मोठा धक्का बसताना दिसत आहे. गेल्या वेळेस आंदोलनात हिरीरीने सभागी झालेल्या नाशिकमधील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी या वेळी जरांगे पाटलांच्या आंदेालनात सहभागी न होण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. गेल्या आंदोलनादरम्यान नाशिकच्या समन्वयकांनी मुंबईतील आंदोलकांसाठी हजारो लोकांच्या जेवणाची, पाण्याची आणि किरणा सामानाची मोठी रसद
Sep 122 min read
bottom of page