top of page

महायुतीतील वाद चव्हाट्यावर; शिवसेना मंत्र्याचा ‘दादागिरी’ चा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्याकडे मांडणार कैफियत




महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून दूय्यम स्थान मिळत असल्याच्या वल्गना करत एकनाथ शिंदे यांच्या समवेत मंत्री आमदारांनी बंड पुकारला होता.दरम्यान अजित पवार यांच्याकडून पुरेसा निधी मिळत नाही, शिवाय विकास कामे थांबवल्याचा आरोप महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर तत्कालीन शिवसेना मंत्री, आमदारांनी केला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच शिवसेने प्रमाणे राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि अजित पवार शिंदे सरकारमध्ये सामिल झाले.


पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने सहाजिकच शिवसेनची जमेची बाजू राहिली. त्यामुळे निश्चितच शिंदे सरकारमध्ये जेवढी भाजपची चलती तेवढी अजित पवार यांची राहिली नाही. विधानसभा निवडणूकीनंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संख्याबळामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना सरस असली तरी परंपरेनुसार अर्थखातं अजित पवार यांच्याकडे कायम राहिलं. त्यामुळे निधी वाटप, विकास कामांसाठी निधी खर्च या सर्व बाबी अजित पवार यांच्याकडे आहेत. त्यामुळे आता पुन्हा महायुतीतील धूसपूस समोर आली आहे.


एकनाथ शिंदेचे सर्व मंत्री अजित पवारांवर नाराज आहेत. शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी एकनाथ शिंदेकडे तक्रार केली आहे. यामुळे आता एकनाथ शिंदे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा विषय मांडणार आहेत. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप असे हे महायुतीचे सरकार आहे. माहयुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. एकनाथ शिंदे यांचे सर्व मंत्री अजित पवारांविरोधात नाराज आहेत. यामुळे एकनाथ शिंदेचे सर्व मंत्री आणि आणि एकटे अजित पवार अशा प्रकाराचे चित्र उभे राहिले आहे.

शविसेनेच्या सर्व मंत्र्यांनी अजित पवारांविरोधात एकनाथ शिंदेकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार आमची विकासकामं थांबवत असल्याची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी शिंदेकडे केली आहे. तर देवेंद्र सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज कॅबिनेट बैठकीनंतर शिवसेनच्या मंत्र्यांची एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी अजित पवार विकासकामं थांबवत असल्याची तक्रार केल्याची माहिती आहे. तर सरकामध्ये सर्वांना समान अधिकारी मिळावा, अशी भावना देखील व्यक्त केली आहे.


यावेळी मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखाते असल्यानं शिवसेना पक्षाच्या मंत्र्यांच्या विभागांना कमी निधी दिला जात असल्याची तक्रार एकनाथ शिंदेकडे केली. यापूर्वीही अजित पवारांबद्दलची नाराजी एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली होती. महायुती सरकार अंतर्गत कुरघोडीचे राजकारण होत असल्याचे दिसून येत असलं तरी ते रोखण्यासाठी आता मुख्यमंत्री काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.

Comments


bottom of page