बुद्धपोर्णीमेच्या लख्ख प्रकाशात आज वन्यजीव गणना
- Navnath Yewale
- May 12
- 2 min read

वन्यजीवांच्या आधिवासांसह संकटग्रस्त, दुर्मीळ, अतिदुर्मीळ वन्यजीवांच्या माहितीसाठी राज्यभरात वन्यजीव गणना करण्यात येते. वनक्षेत्राची घटमुळेे वन्यजीवांच्या आधिवासावर संकट निर्माण झाले आहे. वनांचा अश्रय संपुष्ठात आल्याने वन्यजीव मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. भक्ष्य, चारा-पाण्याच्या शोधात भटकंती करणार्या वनजीवांची वनविभाग, वन्यजीव संरक्षण संघटन, प्राणीमित्रांच्या वतिने राज्यभरात बुद्धपोर्णीमेला वन्यजीव गणना करण्यात येते. आज बुद्धपोर्णीच्या चांदण्यारात्रीच्या लख्ख प्रकाशात राखीव वनक्षेत्रांसह खासगी क्षेत्रातील पाणवठ्यावर वन्यजीव गणना करण्यात येणार आहे.
वनक्षेत्रातील वन्यजींवाची वाढ आणि घट याचे मुल्यांकन होऊन वन्यजीवांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी उपाय योजनांच्या उद्देशाने वनविभाग, वन्यजीव तज्ञ, प्राणीमित्र, सामाजिक संघटना, वनजीव संघटनांच्या वतिने राज्यभरात बुद्धपोर्णीमेला चांदण्याच्या लख्ख प्रकाशात वन्यजीव गणना करण्यात येते. वनविभागाकडून यास आता निसर्गानुभव असे संबोधण्यात आले आहे. दरम्यान नगसर्गप्रेमींच्या सहभगाने राज्यभरातील वनक्षेत्र, खासगी क्षेत्रातील पाणवठ्यांवर वन्यजीव गणना करण्यात येते. दरम्यान, वन्यजीव गणनेसाठी लागणार्या साहित्याचा वनविभागाकडून पुरवठा करण्यात येतो. वनक्षेत्रातील पाणवठ्यावर ट्रॅप कॅमेर्यांच्या माध्यमातून वन्यजीवांची हालचाल टिपून त्यांची गणना करण्यात येते.
शिवाय खासगी क्षेत्रातील सक्षम पणवठ्यांवरही ट्रॅप कॅमेर्यांच्या साह्याने वन्यजीव गणना करण्यात येते. याशिवाय ज्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे नसतील अशा ठिकाणी मचाल बनवून दोन निसर्गप्रेमींच्या सह्याने वन्यजीव करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात संकटग्रस्त लांडगा, तरस, खवलेमांजर, बिबट यासह दुर्मीळ काळवीट, चिंकारा, कोल्हा, खोकड, उदमांजर, श्रृंगीघुबड, गरुड आदी वन्यजीवांची संख्या समोर येणार आहे. प्रत्यक्षात वन्यजीव अधिनियमांचे पालन म्हणून वनविभागांकडून काही आकडेवरी गोपनिय ठेवण्यात येणार आहे. मात्र वन्यजीव गणने नुसार संकटग्रस्त, दुर्मीळ, अतिदुर्मीळ वन्यजीवांच्या संरक्षण, संवर्धनासाठी उपाय योजना राबवण्यात येणार आहेत.
अशी केली जाते वन्यजीव गणना
ट्रॅप कॅमेरा : वनक्षेत्रासह सक्षम खासगी क्षेत्रातील नैसर्गीक व कृत्रीम पाणवठ्यावंर टॅ्रप कॅमेर्यांद्वारे पाणी पिण्यासाठी येणार्या वन्यजीवांची हालचाल टिपून त्यावद्वारे त्यांची गणणा करण्यात येणार आहे.

मचाल बनवून: ज्या ठिकाणी ट्रॅप कॅमेर्यांचा अभाव आहे अशा ठिकाणच्या नैसर्गीक व कृत्रीम पाणवठ्याच्या जवळ झाडांच्या फांद्याने व्यापलेल्या मचालीमध्ये बसून निसर्गप्रेमीं वन्यजीवांची गणना करणार आहेत.
मोहिमेसाठी निसर्गप्रेमींना सूचना: वन्यजीव गणनेत सहभागी होणार्य निसर्गप्रेमींसाठी वनविभागाने काही सूचना दिल्या आहेत अंगावर भडक कपडे नसावेत, मोहिम सुरू असतान बॅटरी, मोबाईलचा वापर करता येणार नाही, पाणवठ्या भोवताली मानवी हालचालीवर प्रतिबंध, निसर्गारुप वस्त्र परिधान करावेत.
वन्यजीव गणनेचा उद्देश: वन्यजीव गणना वन्यजीव संरक्षणासाठी आवश्यक आहे या माहितीचा उपयोग वन्यजीव अधिवासांचे व्यवस्थापन प्रजाती संरक्षणासाठी उपाययोजना करणे आणि मानवी-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी उपयोगी ठरतो.
Comentarios