ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंची कार पेटवली; जालन्यातील घराबाहेरची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
- Navnath Yewale
- Sep 22
- 2 min read

जालना शहरात ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्या गाडीला आग लावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील निलम नगर परिसरात उभ्या असलेल्या त्यांच्या कराला रात्री दहाच्या सुमारस आग लावण्यात आली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली असून, अज्ञात व्यक्तीने जानिवपूर्वक ही आग लावल्याचा संशय व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर नवनाथ वाघमारे यांनी थेट मराठा आंदोलक मनेाज जरांगे पाटील यांच्या समर्थकांवर गंभीर आरोप केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ वाघमारे यांच्या घरासमोर त्यांची कार नेहमीप्रमाणे उभी होती. अचनाक गाडीतून धूर निघून आगीचा भडका उडाल्याचे परिसरातील नगारिकांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ आरडाओरडा करून वाघमारे यांना माहिती दिली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि पुढील तपास सुरू केला आहे.
ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास पोलिस करत आहेत, मात्र नवनाथ वाघमारे यांनी यामागे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांचा हात असल्याचा आरोप केला आहे. “ गाडी जाळल्याने ओबीसींचा आवाज दाबला जाणार नाही. मी जरांगेसारखा भिकार चोट नाही,” अशा तीव्र शब्दांत त्यांनी जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांवर टीका केली आहे.
वाघमारे म्हणाले की, “ हा सगळा जरांगे समर्थकांचा कट असायला पाहिजे. कारण मी जरांगे आणि शरद पवारांच्या विरोधात बोलतो. सत्या बोलणार्यांच्या विरोधात अशा गोष्टी होत असतात.
तुम्ही जर अशाप्रकारे गाड्या जाळत असाल, उभ्या गाड्या जाळण्याचा प्रयत्न करत असाल. तर आमच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या गाड्या जाळल्या तर आश्चर्य मानून घेऊ नका. त्यामुळे तुम्ही अशी चुकीची कामं करू नका. माझी पोलिस प्रशासनाला विनंती आहे की, हा गुन्हा जरांगेच्या नवाने दाखल झाला पाहिजे, हा गुन्हा शरद पवारांच्या नावाने, शेंबडा रोहित पवारांच्या नावाने, अजित पवार, एकनाथ शिंदेच्य नावाने दाखल झाला पाहिजे. कारण मी या लोकांच्या विरोधात बोलतोय, सत्य बोलतोय. ओबीसींची बाजू घेऊ बोलतोय. त्यामुळे त्यांनी केलेलं हे कट कारस्थान आहे.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यात एक अनोळखी व्यक्ती गाडीला आग लावताना दिसत आहे. या फुटेजच्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. जालना शहरातील या घटनेमुळे ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी निष्पक्षपणे तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. या घटनेमुळ—े महाराष्ट्रातील आरक्षणांसदर्भात आंदोलनाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.



Comments