top of page

महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी; मुसळधार पावसाची शक्यता...!




राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील हवामान पुन्हा एकदा बदलणार आहे. पण यावेळी वादळ आणि पाऊस नाही तर आर्द्रता त्रासदायक ठरणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून पुढील तीन दिवसांपर्यंत दिल्लकरांना आर्द्रतेचा त्रास होईल. आज हवामान कोरडे राहिल आणि 30 मे पासून पुन्हा एकदा वादळ आणि पावसाचा काळ सुरू होईल. सध्या लोकांना तीन दिवस आर्द्रता सहन करावी लागेल.


आजही दिल्लीत अंशत:

ढग असतील पण हे ढग पाऊस पडणार नाहीत.ज्यामुळे दमट उष्णता वाढेल. आज कमाल तापमान 37 अंश आणि किमान तापमान 27 अंश राहण्याचा अंदाज आहे. सोमवारी ही दिल्लीत कमाल तापमान 35 आणि किमान तापमान 25 अंश होते. दिल्ली एनसीआरमध्ये 30-31 मे दरम्यान पुन्हा पाऊस पडेल, ज्यासाठी आधीच अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पश्चिमी विक्षोभ आणि स्थानिक वार्‍यांमुळ राजधानीतील हमावामान बदल होईल.


आज आसाम, मणिपूर, सिक्कीममध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर हिमाचल, काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये काही ठिाकणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिणेबद्दल बोलायचे झाले तर, कर्नाटक, केरळ, तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि म्हणूनच अलर्ट जारी करण्यात आला आहे.


महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट:

आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे. रायगड, पुण्यात मुसळधार पाऊस पडू शकतो, तर मुंबईतही हलक्या पावसाची शक्यता आहे. ज्यासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Comments


bottom of page