top of page

अंकिता भंडारी हत्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय!



उत्तराखंडमधील कोटद्वार येथील जवळपास 3 वर्षे जुन्या अंकिता भंडारी हत्या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय आला आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवले आहे. अंकिता भंडारीचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आला. आता या बहूचर्चित खून प्रकरणात, कोटद्वारच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयाने आज निकाल दिला आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.


47 साक्षीदारांचे जबाब :

कोटद्वार येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अंकिताच्या हत्ते प्रकरणी पुलकित आर्य, सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता या तीन आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाने तिन्ही आरेापींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुमारे दोन वर्षे आणि आठ महिने चाललेल्या सुनावणीदरम्यान, न्यायालयात 47 साक्षीदारांनी जबाब दिले. याशिवाय , एसआयटीने संपूर्ण प्रकरणात 97 साक्षीदार सादर केले होते, त्यापैकी फक्त 47 महत्वाचे साक्षीदार न्यायालयात सादर करण्यात आले.

परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था:

या हायप्रोफाईल प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, न्यायालयाच्या आजूबाजूच्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यासोबतच न्यायालय परिसरात लोकांची गर्दी दिसून आली. त्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. यावेळी अंकिताचे कुटूंबीय सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत होते.

काय आहे, अंकिता भंडारी हत्या प्रकरण :

उत्तराखंडमधील ऋषिकेशजवळील पौरी जिल्ह्यातील गंगा भोगपूर भागातील वनयंत्र रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणार्‍या 19 वर्षीय अंकिता भंडारीची सप्टेंबर 2022 मध्ये हत्या कारण्यात आली होती. घटनेच्या एका आठवड्यानंतर, अंकिताचा मृतदेह चिला कालव्यात सापडला. या प्रकरणात पोलिसांनी रिसॉर्ट मालक पुलकित आर्य आणि त्यांचे दोन कर्मचारी सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांना अटक केली होती. तपासात असे दिसून आले की, आरोपीने अंकिताला चिला कालव्यात ढकलून तिची हत्या केली होती.


व्हीआयपींना अतिरिक्त सेवा देण्यास नकार!

अंकितच्या हत्येमागील कारण रिसॉर्टमधील व्हीआयपींना अतिरिक्त सेवा देण्यास नकार असल्याचे म्हटले जात होते. या घटनेनंतर उत्तराखंडमध्ये खळबळ उडाली होती . उत्तराखंड सरकारने तपासासाठी उपमहानिरिक्षक पी. रेणुका देवी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन केले होते.

32 महिन्यात काय घडले:

अंकिताच्या हत्येनंतर, आरोपींना 24 तासांच्या आत तुरुंगात पाठवण्यात आले आणि ते अजूनही तुरुंगात आहेत. अंकिता भंडारी हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. याशिवाय आरोपीविरुद्ध गुंड कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अंकिता भंडारीच्या कुटुंबाला धामी सरकारने 25 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. या संपूर्ण प्रकरणात 500 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. अंकिताच्या कुटुंबाच्या मागणीवरून सरकारी वकील तीन वेळा बदलण्यात आले. यासोबतच अंकिताच्या भावाला आणि तिच्या वडिलांना सरकारी नोकरी दिली. सरकारी वकिलाने न्यायालयात केलेल्या जोरदार युक्तीवादामुळे, आरोपीने दाखल केलेला जामीन अर्ज प्रत्येक वेळी फेटाळला गेला.


Comments


bottom of page