top of page

उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका, रुपाली ठोंबरे पाटील यांचे एकबोटेंवर टीकास्त्र


ree

कायदेशीर परवानगी असलेल्या पशुधन वाहतुकीदरम्यान वाहनचाकलांना तास देणार्‍या गोरक्षकांवर अंकुश ठेवावा आणि जिल्हा पोलिस प्रमुखांनी अशा वाहनांची तपासणी करणार्‍या खासगी व्यक्तीवंर कारवाई करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. त्यानंतर गोरक्षकांचं नेतृत्व करणार्‍या मिलिंद एकबोटे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. त्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यामुळे गोरक्षक आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष पुढील काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.


राज्यभरात भाकड म्हशीची खरेदी विक्री करणार्‍या कुरेशी समाजाला गोरक्षकांकउून त्रास दिला जात आहे, असा आरोप कुरेशी समाजाकडून करण्यात आला होता. त्यासाठी नुकतेच राज्यभरात कुरेशी समाजाकडून मुकमोर्चा देखील काढण्यात आला. म्हशींच्या खरेदी- विक्री करता वाहतुकीदरम्यान गोरक्षकांकडून दिल्या जाणार्‍या त्रासाच्या विरोधात हे मोर्चे काढण्यात आले होते.


कुरेशी समुदायाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत आपल्या आडचणी सांगितल्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायदेशीररित्या परवानगी असलेल्या जनावरांची वाहतूक करणार्‍या वाहन चालकांना त्रास देणार्‍या गोरक्षकांना आवर घाला. तसेच, जिल्हा पोलिस प्रमुखांनी पशुधन वाहतूक करणार्‍या वाहनांची तपासणी करणार्‍या खासगी व्यक्तींना रोखावं, अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशवार गोरक्षकांचे प्रतिनिधित्व करणार्‍या मिलिंद एकबोटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकबोटे म्हणाले की, अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये कसाई यांची बैठक झाली. त्या बैठकीनंतर अजित पवार यांनी कसाई आणि शेतकर्‍यांवर अन्याय होणार नाही, असं सांगितलं. हे कसाई गेल्या शंभर वर्षापासून आमच्या देशातील पशुधन संपवायला निघाले आहेत. पशुधन संपल्यामुळे भेसळयुक्त दूध लोकांना प्यायला लागत असून संस्कृतीलाही धक्का बसत आहेत. या सर्व गोष्टींचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काहीच वाटत नाही.


याबाबत मला खेद वाटत आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने कसाई यांची बैठक घेतली, त्याच पद्धतीने गोरक्षकांची बैठक घ्या अशी मागणी त्यांनी केली. एकबोटे यांनी एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांवर हल्ला करत ‘ अजित पवारांना जनाही नाही, तर मनाची तरी आहे की नाही? असा सवाल करत लोकसभेला पवारांना एकच जागा मिळाली.पण, मोदींच्या अशीर्वादाने त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिहाले आहे, याची जाणीव पवारांनी ठेवावी, असंही एकबोटे यांनी सुनावलं.


मिलिंद एकबोटे यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेला पक्षाच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ठोंबरे म्हणाल्या की, अजित दादांची लाज काढणारे मिस्टर एकबोट्या, तुमच्या घरी गाय नसेलच म्हणा. ये आपल्या दादांच्या गोठ्यात जाऊन ये बाबा. त्या गाईचं शेणमूत काढून तुमची पूर्वीची पापं तरी धुतली जातील. अजितदादांबद्दल भाषा नीट, म्हणजे नीटच वापरायची. कायद्यात राहताल , तरच फायद्यात राहताल बरे, असा थेट इशाराच रूपाली ठोंबरे यांनी दिला.


दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार नसानसांत भिनवा पहिले. सोईचे विचार चालत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हे भुरट्या लोकांना कडेलोट किंवा हत्तीच्या पायाखाली देत होते, असा इशाराही रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिला.

Comments


bottom of page