top of page


पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांच्या आदेशाने ‘ईडी’ची कारवाई; पोलिस उपायुक्तांभोवती फास आवळला
पश्चिम बंगालाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक कामगिरी करत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. त्यानंतर प्रशासनातही मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. राज्यात 15 वर्षे ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होत्या त्यामुळे निवडणुकीआधी केंद्रीय निवडणूक आयोगानेही अनेक वरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्या केल्या होत्या. निकाल समोर आल्यानंतर काही तासांतच राज्याच्या मुख्य आयुक्तांनी सर्व विभागांना कोणत्याही महत्वाच्या फायलींना हात न लावण्याचे आदेश काढले आहेत. दरम्यान आता, अंमल बजावणी
16 hours ago2 min read


ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
पश्चिम बंगालमध्ये भाजपचवा मोठा विजय झाला आणि टीएमसीचा दारुण पराभव झाला आहे. यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या विजयावर शंका उपस्थित करत केंद्रीय संस्थांसह न्यायव्यस्थेच्या मदतीने 100 जागा पळवल्याचा आरोप केला आहे. ‘ आम्ही निवडणुक हरलेलो नाही, त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच नाही. आम्ही विधानसभा निवडणुका नैतिकदृष्ट्या जिंकल्या आहेत. मी लोकभवनात जाऊन राजीनामा देणार नाही असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. पराभूत पक्षाच्य
16 hours ago2 min read


इराणचा सर्वात मोठा हल्ला; फुजैराहवर मिसाइल चार मिसाइल डागल्या, हल्ल्यात तीन भारतीय जखमी
मध्यपूर्वेतुन संपूर्ण जगाची झोप उडवणारी घटना समोर आली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा युद्ध भडण्याची शक्यता आहे. इराणने शस्त्रसंधीचे उल्लंघण केले आहे. इराणने युएईवर हल्ला केला आहे. फजैराहमध्ये हा मिसाईल हल्ला झाला आहे. यामुळे परिसरता आग लागली आहे. यामुळे युएईने आपली डिफेन्स सिस्टीम सक्रिय केली आहे. या हल्ल्यात 3 भारतीय जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. फुजैराहमध्ये भीषण आग: इराण कडून झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे फुजैराह येथील पेट्रोलियम औद्यागिक परिसरात भीषण आग
2 days ago1 min read


भाजपने निवडणुक अयोगाच्या मदतीने आसाम आणि बंगालची निवडणुक चोरली - राहुल गांधी
पाच राज्यात झालेल्या निवडणुकांत भाजपचा तीन राज्यात अभूतपूर्व विजय झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये तर भाजपाने तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचा अभेद्य किल्ला नष्ट केला आहे. आसाम आणि पद्दुचेरीतही भाजचे सरकार येत आहे. आसामध्ये भाजपाने तिसर्यांदा विजय मिळवत हॅट्रीक साधली आहे. दरम्यान, भाजपाच्या या विजयावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाने पश्चिम बंगाल येथील गेल्या अनेक वर्षांचे ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीचे सरकार उलथवून लावत बहुमत मिळवले आहे. भाज
2 days ago1 min read


5 राज्याच्या निकालात भाजपची मुसंडी: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीला धक्का, तामिळनाडूत थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला बहूमत; केरळमध्ये डाव्यांचा गड ढासळला
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे आणि महाराष्ट्रातील 2 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाचही राज्यांमध्ये मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल आणि असाममध्ये ऐतिहासिक कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर दुसरीकडे, तामिळनाडू आणि केरळमध्ये प्रस्थापित सत्ताधार्यांना मतदारांनी नाकारून मोठा राजकीय बदल घडवून आणला आहे. पश
2 days ago2 min read


अमेरिकेचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब, डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेने जगभरात खळबळ
अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये तब्बल 40 दिवस युद्ध सुरू होतं. अखेर पाकिस्तानच्या मध्यस्थिने अमेरिका आणि इराणने युद्धविरामाची घोषणा केली. मात्र जरी युद्धविराम झाला असला तरी देखील अजूनही या दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव आहे. एकीकडे इराणने युुद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद केला होता. तो अजूनही बंदच आहे. त्यात भरीसभर म्हणजे अमेरिकेनं देखील या मार्गावर नाकेबंदी केली आहे. त्यामुळे सध्या संपर्णू जगावर मोठं उर्जा संकट निर्
3 days ago1 min read


एक्झिटपोल भाजपच्या बाजूने, पण ममता बॅनर्जींचा टीएमसी कार्यकर्त्यांना महत्वाचा मॅसेज 200 जागा जिंकण्याचा दावा; शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका
पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुक निकालास अवघे काही तास उरले आहेत.पश्चिम बंगालमध्ये विविध एक्झिट पोल्सनी भाजला आघाडी दर्शवली असली तरी, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विजयाचा मोठा दावा केला आहे. “ आपण 200 पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेत येत आहोत अश्वस्त रहा” अशा शब्दांत ममता दीदींनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला आहे. तसेच मतमोजणी केंद्रावर शेवटपर्यंत तैनात राहण्याचे कडक निर्देशही त्यांनी दिले आहेत. दरम्यान, काल संध्याकाळी
3 days ago1 min read


महाराष्ट्रात उन्हाचा कहर!: महिनाभरात उष्माघाताचे 8 बळी? मृत्यूमध्ये एका बाळाचाही समावेश
राज्यात गेल्या दोन महिन्यापासून उन्हाचा कडाका जाणवत आहे. भर दुपारी तर अनेकजण उन्हाने होरपळून निघत आहेत. घसा कोरडा पडत असून अनेकजण चक्कर येऊन पडताना दिसत आहेत. राज्यात गेल्या महिनाभरात उष्माघाताचे 8 बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कुणाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला सापडला, कुणाची डेडबॉडी ऑटोत तर कुणाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. उष्माघाताने बळी गेलेल्यांमध्ये एका बाळाचाही समावेश आहे. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्या
Apr 272 min read


सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांच्या पॅनेलमध्ये न्यायामूर्ती स्वर्ण कांतांची दोन्ही मुलं ; तेच न्यायमूर्ती निष्पक्ष निकाल देतील? - केजरीवाल यांचा सवाल
नवी दिल्ली : माझ्या विरोधात सीबीआय म्हणजेच केंद्र सरकार आहे आणि समोर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे वकील आहेत. न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांची दोन्ही मुले केंद्र सरकारच्या वकिलांच्या पॅनेलमध्ये काम करतात. त्यांच्या मुलांना कोणते आणि किती खटले द्यायचे, हे तुषार मेहता ठरवतात. 2023 ते 2025 दरम्यान न्यायमूर्तींच्या मुलाला तब्बल 5904 खटले मिळाले, ज्यातून त्याला कोट्यवधी रुपयांची फी मिळाली. जेव्हा न्यायाधीशांच्या मुलांचे भविष्य आणि कमाई समोर उभ्या असलेल्या वकिलावर अवलंबून असते, त
Apr 272 min read


दिव्यांगासाठी कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय; भूखंडांवर 25% सवलत आणि 5% आरक्षण जाहीर
राज्यातील दिव्यांगांना सवलतीच्या दरात भूखंड देण्याचा नवा निर्णय कर्नाटक शासनाकडून घेण्यात आला आहे. बेळगावसह राज्यातील सर्व नगरविकास प्राधिकरणाकडून भविष्यात भूखंड वितरण करताना या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. दिव्यांगांना 5 टक्के भूखंड राखीव तर ठेवावे लागणार आहेतच,शिवाय 25 टक्के सवलतीच्या दरात ते द्यावे लागणार आहे. उच्च न्यायालयाचा आदेशानंतर सरकारने तातडीने हालचाल करत कर्नाटक नगर विकास प्राधिकरण (भूखंड वाटप) नियम 1991 मध्ये दुरुस्ती केली असून, दिव्यांगांसाठी स्वतंत्र
Apr 261 min read


बांग्लादेशी घुसखोरांना बंगालमधून हाकलून देऊ, ममता बॅनर्जी त्यांना वाचवू शकणार नाहीत- पंतप्रधान मोदी
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला. बनगाव येथील सभेत बोलताना त्यांनी घुसखोरांना थेट इशारा देत ‘ 29एप्रिलपूर्वी बंगाल सोडा, अन्यथा 4 मे नंतर कारवाई होईल’ असा स्पष्ट इशारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या सभेनंतर भाजप आणि तृणमूल काँग्रेस यसांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर घुसखोरांना आश्रय दिल्याचा आरोप केला. भाजप सत्तेत आ
Apr 261 min read


धुळे जिल्हा प्रशासनाने एआय आधारित ई-सुविधा पोर्टलचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शिरपूर येथे लोकार्पण
शिरपूर: धुळे जिल्हा प्रशासनाने एआय आधारित तयार केलेल्या ई-सुविधा पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिरपूर येथील कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले. यावेळी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, वस्तोद्योग मंत्री संजय सावकारे आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या या पोर्टलबद्दल पालकमंत्री जयकुमार रावल, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी या पोर्टलची माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री महोदयांच्या 1
Apr 261 min read


राघव चढ्डा यांच्यासह 7 जणांची खासदारकी धोक्यात, ‘आप’ ने आखला प्लॅन
दोन दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीच्या 7 राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशातच आता आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांनी या सर्व बंडखोर खासदारांची राज्यसभा सदस्यता रद्द होणार असल्याचा दावा केला आहे. आता आम आदमी पार्टी बंडखोर खासदारांना अपात्र घोषित करण्याची मागणी करणार असल्याचेही समोर आले आहे. पीटीआय -भाषाच्या वृत्तानुसार संजय सिंह यांनी राज्यसभा सभापती सीपी राधाकृष्णन यांना पत्र पाठवून राघव चढ्डा यांच्यासह राज्यसभेतील त्या 7 खासदारांना अपात्र घोषित करण्याची विनंती
Apr 261 min read


उष्णतेचा कहर! अकोल्यात पारा 46 अंशावर, परभणीत उष्माघाताचा मृत्यू ; राज्यात अनेक ठिकाणी अघोषित संचारबंदी
मुंबई: राज्यभरात उष्णतेचा पारा प्रंचडं वाढला आहे. नागरिकांच्या अंगाची अक्षरश: लाहीलाही होत आहे. मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा तडखा वाढत असून दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत आहेत. आकोल्यात काल या मोसमातील सर्वाधिक 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत तपामाण 46 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शहरात ऐन दुपारी अघोषित संचाबंदी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत अकोल्यात तपामानात सातत्याने वाढ ह
Apr 262 min read


बागेश्वर बाबांचा माफीनामा; भावना दुखावल्यास माफी मागतो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यावरुन मागीतली माफी
सध्या देशभरात बागेश्वर बाबांच्या छत्रपती शिवरायांबद्दलच्या विधयानावरुन संताप व्यक्त होत आहे. शिवरांयाबद्दल अवमानकारक, वादग्रस्त विधान केल्याने बागेश्वर यांच्याविरोधात संतापाची लाट पसरली आहे. संतापजनक विधानावर आता बागेश्वर बाबांनी आजा जाहीर माफी मागितली आहे. नागपूर येथे भारतदुर्गा मंदिराच्चया शिलान्यास कार्यक्रमावेळी बागेश्वर बाबांच्या वक्तव्यांनं राज्यभरात संतापची लाट पसरली. छत्रपती शिवाजी महाराज युद्धाच्या वेळी थकल्यावर समर्थ रामदासाकडे जाऊन म्हणाले की आपण खूप युद्ध लढलो आता
Apr 262 min read


जग हादरलं! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला; व्हाईट हाऊसमध्ये घुसून गोळीबारहल्ल्यावेळी सिक्रेट सर्व्हिस ने तात्काळ सूत्रे हाती घेतली; आरोपीस तत्काळ अटक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्ट्स डिनर’ दरम्यान गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेमुळे राजधानी वॉशिंग्टन डी.सी. मध्ये एकच गोंधळ निर्माण झाला असून जगभरात खळबळ उडाली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर या अतिशय महत्वाच्या कार्यक्रमादरम्यानच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अचानक मंचावरून बाजूला नेण्यात आले आणि एका सुरक्षीत स्थळी हलवण्यात आलं आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे
Apr 261 min read


पाकिस्तानात काय घडलं?: इराण- अमेरिकेतील चर्चा पुन्हा फिस्कटली, जगाला पुन्हा युद्ध पाहावे लागणार?
गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून इराण आणि अमेरिकेत तणावाचे वातावरण आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाली असली तरी युद्ध अद्याप थांबलेले नाही. अशातच दोन्ही देशांमध्ये पाकिस्तानात युद्ध थांबण्याबाबतच्या करारावर चर्चा होणार होती, मात्र आता ही चर्चेची दुसरी फेरी मावळल्याचे दिसत आहे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची मोठ्या प्रतिनिधीमंडळासह इस्लामाबादला पोहोचले होते. पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये मध्यस्थानी भूमिका निभावणार होता, मात्र आता अमेरिकन प्रतिनिधी पाकिस्तानात पोहो
Apr 251 min read


इस्त्रायलने युद्धविराम मोडला; लेबनॉनचं अख्ख शहरच उद्ध्वस्त युद्ध पुन्हा सुरू होणार?
इस्त्रायलकडून 28 फेब्रूवारी रोजी इराणवर पहिला हल्ला करण्यात आला आणि भीषण युद्धाला सुरूवात झाली. इस्त्रायलने इराणवर हल्ला करताच अमेरिकेनं देखील या युद्धात उडी घेतली. हे युद्ध तब्बल 40 दिवस सुरू होत, अखेर 40 व्या दिवशी तीनही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आणि जगाने सुटकेचा निश्वास सोडला. अमेरिका आणि इराणकडून दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती, मात्र युद्धविरामाचा कालावधी संपताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा युद्धविराम वा
Apr 251 min read


छत्रपती शिवरायांचा अवमान करणार्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला- आमदार रोहित पवार
आपल्या आगळ्या वेगळ्या दाव्यांमुळे चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी आज नागपूरात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते पुन्हा वादात सापडले आहेत. नागपूर येथील भारतदुर्गा शक्तिस्थ शिलान्यास कार्यक्रमात बोतना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले, “ युद्ध करताना महाराज थकले होते, त्यांनी आपला मुकूट समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करून विश्रांतीची इच्छा व्यक्त केली होती” असा अजब दावा धीरेंद्र शास्त्री यांनी
Apr 252 min read


‘आप’ मधील फुटीनंतर अण्णा हजारे संतापले, थेट नव्या कायद्याची मागणी
आहिल्यानगर : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा फटका बसला आहे. राघव चड्डा यांच्यासह पक्षातील सात राज्यसभा खासदारांनी पक्षाला रामराम करत भाजपची वाट धरली आहे. त्यामुळे दिल्ली आणि पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. खासदार फुटल्यानंतर आम आदमी पक्षाने भाजपवर सडकून टीका केली आहे. तसेच विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. अरविंद केजरीवाल यांचे एकेकाळचे सहकारी आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजार ेयांनी राजकीय घडामोडीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अण्णा हजारे
Apr 241 min read
bottom of page