top of page

एकला चालो रे चा ‘शंखनाद’, मित्र पक्षांचीच कोंडी!



लोसकसभा निवडणूकीत सपाटून पराजयाननंतर विधानसभेत मिळालेल्या अभूतपर्वू यशाचे महायुतीने शिखर गाठले. नाराजांची मोठ बांधत अवश्यकत्या ठिकाणी मतांचे धू्रवीकरण आणि विरोधकांच्या मत मतपरिर्वनाच्या जोरावर यशाची महायुतीने अनपेक्षीत यशाची ‘लिलया’ पार केली. यामध्ये खास करून भाजपची रणनिती मोठी कमालीची ठरली. त्यातच आता चार महिण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या सुप्रिम निर्णयामुळे सर्वच राजीकीय पक्ष मिनी मंत्रालयावर वर्चस्वासाठी तयारीला लागले आहेत. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी भाजपने पुन्हा एकदा शतरंजचे फासे फेकत ‘एकला चलो रे’ चा नारा देत मित्रपक्षांची चांगलीच कोंडी केली आहे.


आगामी काळात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी रणनितीला सुरूवात केली आहे. महाविकास आघाडीचे आणखी ठरलंच नाही, तोवर मायुतीने संभाव्य लढतीचे संकेत दिले आहेत. मुंबईसह ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड यांसारख्या वजनदार महापालिकांवर डोळा ठेवून भाजपने स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. त्यामुळे महायुतीतच मित्र पक्षांची चांगलीच कोंडी झाली आहे. पुणे महापालिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व आहे. शिवसेनेचे कायम वर्चस्व राहिलेली मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने रणनिती आखली आहे.


दरम्यान, शिवसेना फूटी नंतर पहिल्यांदाच होवू घातलेली निवडणूक मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी भाजपला संधी आहे, आणि हाच धागा पकडून मुंबई प्रमाणेच पुणे, पिंपरी- चिंचवड महापालिकांच्या निवडणूकांसाठी भाजपने शतरंजचे फासे टाकले आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार या दोन्ही मित्रपक्षांची सारखीच अवस्था आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये आयाराम, गयारामांना चांगलेच महत्व प्राप्त असते, त्यानुसार राजकीय पक्षांमध्ये ‘इनकमिंग, आउटगोईंग’चा हंगाम सुरू होताना दिसत असला तरी काही ठिकाणी मात्र बलाढ्य भाजपचेच मित्रपक्षांसमोर आव्हान राहणार आहे.


पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेवर जरी एकहाती अजित पवार यांचे वर्चस्व असले तरी एकीकडे महाविकास आघाडी तर दूसरीकडे बालाढ्य भाजपचे आव्हान यामध्ये धु्रविकरण रोखण्यासाठी महायुतीतील मित्रपक्षांच कस लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिले. त्यातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेड मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा शंखनाद करत मुंबईमध्ये भाजपच्या बैठकीत एकला चलो चा नारा देत पदाधिकारी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सुचना दिल्याने मित्रपक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत.


मोजक्या महापालिका निवडणूकांसाठी स्वबळाचा नारा देत निवडणूकी नंतर पुन्हा एकत्र येण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. मात्र, शहरी आणि ग्रामीण मतांवर याचा प्रभाव पडणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकांमध्ये स्थानिक पदाधिकार्‍यांची चांगलीच पंचाईत होणार आहे. एरवी गळ्यात गळे घालून फिरणारे महायुतीचे कार्यकर्ते निवडणूकीत आमणे सामने राहणार असल्याने गावपातळीवर निवडणूकांची तांलीम रंगणार असली तरी मतदारांवर याचा प्रभाव पडणार हे निश्चित.

Commentaires


bottom of page