top of page

त्या परप्रांतीय तरुणाला आम्ही धडा शिकवणारच - मनसे

अविनाश जाधव यांनी घेतली पिडीत तरुणीची भेट, उपचाराची घेतली जबाबदारी

ree

रुग्णालयात कामावर असलेेल्या रिसेप्शनीस्ट तरुणीला झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपी गोकूळ झा प्रवृत्तीचा तरुण आहे. फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करतो, हेच त्याचे काम असल्याची घक्कादायक माहिती शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी दिली, तर पिडित मुलींच्या उपचाराच्या खर्चाची जबाबदारी मनसेने घेतली आहे. उपचारासाठी पिडित मुलीला मनसे कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केले आहे. घटना घडून 12 तास उलटून गेले तरी आरोपी गोकुुळ झा पोलिसांना सापडला नाही, तो अद्याप फरार आहे. त्यामुळे मनसेच्यावतीने पोलिसांनाही इशारा देण्यात आला आहे. पुढील काही तासात आरोपी न सापडल्यास पोलिस स्टेशनबाहेर आंदोलनाचा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.


कल्याण पूर्वमधील खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणार्‍या तरुणीवर एका गुंड प्रवृत्तीच्या तरुणाकडून झालेल्या हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी स्वत: घटनास्थळी भेट दिली आणि पिडित तरुणीच्या घरी जाऊन तिची भेट घेत उपचाराच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी उचलण्याचे अश्वासनही दिले. त्या मुलीची शरीरिक अवस्था पाहून संताप अनावर होतो. छाती, पाठ, पायावर मारहाण झाली असून तिला तातडीने रुग्णालयात भरती करणं गरजेचं आहे. तिची स्थिती गंभीर असून ती कालपासून तशीच आहे, कपडेही बदललेले नसल्याचे अविनश जाधव म्हणाले.


पोलिसांच्या कारवाईवरही जाधव यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, घटना घडून 22 तास उलटून गेले तरी आरोपी गोकुळ झा फरार आहे. आमच्या कार्यकर्त्यांना रात्रीच्या वेळी उलता, मग अशा गुन्हेगाराला का नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच, हा प्रकार मराठी-अमराठी वाद नसला तरीही “ जरी बाहेरुन आलेला व्यक्ती आमच्या मराठी मुलीला अशा पद्धतीने मारत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही” असा थेट इशारा अविनाश जाधव यांनी दिला. “ जर लवकरात लवकर आरोपीला अटक झाली नाही तर आम्ही पोलिस स्टेशनबाहेर आंदोलन छेडू” असंही मनसेचे अविनाश जाधव म्हणाले .मतासाठी काही नेते बाहेरुन माणसं आणून बसवतात आणि त्यांना वाटतं, काहीही केलं तरी सगळं माफ, असे म्हणत राजकीय नेत्यांवरही जाधव यांनी टीका केली आहे.


शालिनी ठाकरेंचा संताप :

कल्याणमधल्या मुलीला मारहाण होऊन 24 तास उलटले आहेत. राज्याचं गृहखातं इतकं कमजोर आहे का? की एका तिरपट गुंडाला 24 तासांत शोधू शकत नाही? महाराष्ट्रातल्या आया-बहिणींवर हात उचलले जात असतील, आणि गुन्हेगार मोकाट फिरणार असेल तर राज्याची सुरक्षा रामभरोसे आहे म्हणावं लागेल. कल्याणच्या मुलीला न्याय मिळायलाच हवा, त्या नराधमाला लवकरात लवकर अटक झालीच पाहिजे आणि कडक शिक्षा देखील व्हायला पाहिजे, असे ट्विट मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी केलं आहे.


दरम्यान, मराठी मुलीला जास्त मारहान झाली असून तिच्या हाता-पायाला दुखापत झाल्याने तिला नीट हालचाल करता येत नाही. आपण पेशंटचं एक्स रे केलं आहे, पुढे एमआरआय करण्याची गरज भासल्यास करू, सध्या गजरजेचे उपचार तिच्यावर केल्याची माहिती ग्लोबलमधील डॉ. ऋतुजा जानकी यांनी दिली.

Comments


bottom of page