देशमुख कुटूंबीयांना कोणापासून धोका, धनंजय देशमुख काय म्हणाले
- Navnath Yewale
- 3 days ago
- 2 min read

मस्साजोगचे (जि. बीड) सरपंच सतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येला सहा महिन्याचा कालावधी लोटला आहे. प्रकरणाची मा. न्यायालयात सुनावणी सुरू आहे. एकमेव कृष्णा आंधळे वगळता इतर आरोपी कारागृहात आहेत. फरार कृष्णा आंधळे याच्या अटकेसह इतर मागण्यांसाठी देशमुख कुटूंबीयांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हात्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली. आरोपींची क्रूर माणसीकता ठेचून काढण्याच्या भावना सामान्यांतून उमटू लागल्या. आरोपींच्या अटकेसाठी राज्यभरात ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलनं करण्यात आली. दरम्यान, कृष्णा आंधळे वगळता सात आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली. प्रकरणाची मा. न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
देशमुख कुटूंबीयांच्या मागणीनुसार अॅड. उज्वल निकम यांची सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आरोपींना कारागृहात व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा आरोपही मधल्या काळात झाला. त्यानुसार कारागृह अधिकार्याची बदली करण्यात आली. त्यातच आता धनंजय देशमुख यांनी मोठे खुलासे केले आहेत.
एका वाहिणीला दिलेल्या मुलाखतीत धनंजय देशमुख यांनी फरार कृष्णा अंधळे पासून देशमुख कुटूंबीयांच्या जिवीत्वास धोका असल्याचा दावा केला आहे. कृष्णा आंधळेच्या मित्र परिवार सोशल मिडियावर सक्रिय आहे. निश्चितच फरार कृष्णा आंधळे विषयी त्याच्या मित्र परिवारास माहिती असली पाहिजे असा दावाही धनंजय देशमुख यांनी केला आहे. याचबरोबर फरार कालावधीत आरोपींना मदत करणार्यांना सह आरोपी करण्यात यावं, बीडच्या कारागृहातील आरोपींची नागपूर, सोलापूर, ऑर्थररोड कारागृहात रवानगी करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी वैभवी देशमुख, धनंजय देशमुख यांच्यासह देशमुख कुटूंबीय सोमवार (16 जून) पासून आंदोलन करणार असल्याचेही धनंजय देशमुख म्हणाले.
दरम्यान, प्रकरणाला मनोज जरांगे यांच्याकडून जातीय रंग देण्यात आल्याच्या प्रश्नावर धनंजय देशमुख म्हणाले की, संतोष देशमुख यांची हत्या नऊ (डिसेंबर) तारखेला झाली. सतंप्त मस्साजोग ग्रामस्थांनी आरोपींच्या अटकेसाठी रास्तारोकोला सुरूवात केली. पण प्रशासनाकडून साधा एफआयआर दाखल करण्यात आला नाही.
दुसर्या दिवशी सकाळी (10 डिसेंबर) रोजी मनोज जरांगे अन्यायाच्या विरोधात मस्साजोग येथे आले आणि तब्बल नऊ तास आंदोलनात सहभागी झाले तत्कालीन पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ, अतिरिक्त पोलिस अधिक्षक यांच्याशी सातत्याने त्यांनी संवाद साधला तेव्हा कुठतरी रात्री 8:00 च्या दरम्यान केज पोलिसांनी एफआयआर दाखल केला. त्यानंतर (11 डिसेंबर) रोजी दलित बांधवाचा (6 डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेेचा) अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला. हत्त्या झाल्या नंतर मु÷ख्य आरोपीच्या विरोधात (12 डिसेंबर) रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. असा घटनाक्रम सांगत असताना मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच खर्या अर्थाने घटनेला कायद्याने वाचा फूटल्याचेही धनंजय देशमुख म्हणाले.
दरम्यान, न्यायासाठी आता देशमुख कुटुंबीय रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचे सांगत येत्या (16 जून) देशमुख कुटूंबीयांकडून न्यायीक मागण्यांसाठी आंदोलन करणार असल्याचेही धनंजय देशमुख म्हणाले.
Comments