‘धरावी’ पुणर्विकासाला राज्य सरकारची मंजूरी
- Navnath Yewale
- 2 days ago
- 1 min read

मुंबईतील सर्वात मोठ्या आणि आशियातील प्रसिद्ध झोपडपट्टी ‘धारावी’ च्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारने मास्टर प्लॅनला मुजूरी दिली आहे. या प्रकल्पामुळे पुढील काही वर्षात धारावीचे चित्र पूर्णपणे बदलण्याचा दावा करण्यात येत आहे. त्याचबरोबर धारावीचे अनेक रहिवासी या महत्वकांक्षी योजनेबद्दल संतापले आहेत, अणि त्याचा निषेधही नोंदवत आहेत. या पुनर्विकासामुळे सर्वात मोठ्या झोपडपट्टी क्षेत्राचे पूर्णपणे रूपांतर होईल धारावी पुनर्विकास प्रकल्प हा महाराष्ट्र सरकार आणि अदानी समूहाचा एक मेगा प्रकल्प आहे.
धारावी पुनर्विकास योजना:
धारावी पुनर्विकास प्रकल्प नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड ( एनएमडीपीएल) द्वारे चालवला जात आहे, जो स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) म्हणून स्थापन करण्यात आला आहे. धारावीला आधुनिक, नियोजित आणि हरित शहरी क्षेत्रात रूपांतरीत करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. या मास्टर प्लॅन अंतर्गत, धारावीत2.5 चौरस किलोमिटर क्षेत्र पूर्णपणे विकसित केले जाईल. ज्यामध्ये ग्रीन स्पाइन, सेंट्रल पार्क, वॉटरफ्रंट, म्युझियम, मल्टी-मॉडल, ट्रांन्झिट हब आणि मिश्र वापराचे निवासी आणि व्यवसायिक संकुल बांधले जातील.
स्थानिक व्यवसायाला स़्थान:
धारावी हे केवळ झोपडपट्यांचे क्षेत्र नाही तर ते मुंबईचे एक प्रमुख औद्योगिक क्षेत्र देखील आहे. येथे चामडे, मातीची भांडे, कपडे आणि पुनर्वापराचा मोठा व्यापार आहे. मास्टर प्लॅनमध्ये विद्यमान लघु उद्योग आणि दुकानांच्या पुनर्वसनाबद्दल बोलले आहे. परंतु स्थानिक लोकांना भीती आहे की, त्यांचे पारंपारिक उपजीविका गगनचुंबी इतराती आणि व्यावसायिक प्रकल्पांच्या नावाखाली संपेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धारावीचा विकास त्याच्या मूळ संकल्पनेनुसार आणि पर्यावरणीय दृष्टिकोनासह एकात्मिक पद्धतीने केला जाईल आणि कारागीर, लहान व्यवसायिकांचे पुनर्वसन प्राधान्य दिले जाईल. स्थानिक लोकांना विश्वासत घे़ऊन विकास कामे करावीत, असेही त्यांनी सांगितले.
Comments