top of page

पूल कोसळल्याची दुर्घना कशी घडली; बचावलेल्यांनी सांगितली आपबिती


इंद्रायणी नदीवरील कुंडमाळ येथील पूल कोसळल्याने सर्वत्र हाहकार उडाला. एकीकडे पाऊस पडत होता. इंद्रायणी नदीला उधाण आलं होतं. त्यावेळी पर्यटक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमले होते. अशातच अचानक हा पूल कोसळला. त्यात अनेक लोक वाहून गेल्याचं बोललं जात आहे. या दुर्घटनेत एनडीआरएफने काही लोकांना वाचवलं आहे. त्यात एक महिलेचा ही समावेश आहे. त्या महिलेने दुर्घटनेवेळी नक्की काय घडलं हे सांगितलं आहे. विशेष म्हणजे ती महिला वाचली असली तरी तीचा पती आणि मुलगा कुठे आहे हे मात्र अद्याप कळू शकले नाही.


दुपारी 3:30 ची वेळ होती. रविवार असल्याने कुंडमाळ इथं मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. इंद्रायणी नदी, निसर्गरम्य परिसर आणि इथ असलेले कुंड पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने आले होते. पुल कोसळला त्या वेळी दुपारच्या 3:30 ची वेळ होती असं बचावलेल्या महिलेने सांगितलं. घटनेपूर्वी याच पूलावर मोठ्या प्रमाणात लोक उभे होते. लोकांची गर्दी इतकी वाढली होती की पुलाला ते वजन पेलवलं नाही. त्याच वेळी पुलावर आम्हाला तीन गाड्याही दिसल्याचं तिने सांगितलं. पूल हलायला लागला होता. कुणाला काही समजण्याच्या आत पूल कोसळला. त्यावेळी मी पूलावर होते असं या महिलेने सांगितलं. पण नशिबाने आपण बचावलो. आपल्या बरोबर पती आणि मुलगा ही होता. पण ते कुठे आहेत हे माहित नाही, हात फॅ्रक्चर झाला असून उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेने त्या हादरुन गेल्या आहेत.


त्याच बरोबर अमोल घुगे नावाचा तरुणही या दुर्घटनेत बचावला आहे. पुलावर मोठ्या प्रमाणात लोक उभे होते. ते सगळेच पाण्यात पडल्यांच तो सांगतो. पूल पडण्या आधी पाच मिनिटे तो हत होता असं अमोल सांगतो. तरी ही लोक एकमेकांशी त्यावेळी बोलत होते. ते आपल्या जागेवरून हलत नव्हते. त्यांना आपण पुढे चला असं सांगत होतो. पण कुणही ऐकलं नाही. शेवटी पूल कोसळला. पुलावर त्यावेळी दोन्ही बाजूने टु व्हिलर येत होत्या असं ही त्याने सांगितले. ज्या वेळी पूल कोसळला त्यापेळी आपण एका रॉडला पकडलं, त्यामुळे जिव वाचला. बराच वेळ त्या रॉडला पकडून होतो असं अमोल म्हणाला.



दुसर्‍या एका तरुणीने सांगितलं की, पुलावार पन्नास पेक्षा जास्त लोक होते. शिवाय गाड्याही होत्या. कुणीही पोलिस तिथे नव्हते. आम्ही पुलाच्या काठावर होतो त्यामुळे आम्ही वाचलो. पण आमच्या समोर पाण्यात आनेक लोक वाहून गेले. ते आम्ही डोळ्याने पाहिले. पण किती जण वाहून गेले हे सांगता येणार नाही असं ही तिने सांगितले. ज्यावेळी पूल कोसळत होता त्यावेळी तो हलत होता. तो अचानक मध्येच तुटला. धोकादायक बोर्ड तिथे लावलेला होता. पण तरीही गाड्या त्यावरून नेल्या जात होत्या. असं ललिता हिने सांगितलं ती दिल्लीवरून पुण्यात फिरण्यासाठी आली आहे.

Comments


bottom of page