भारताचा पाकिस्तानला अल्टिमेटम, “ पीओके खाली करो, अतंकावाद खत्म करो”
- Navnath Yewale
- 3 days ago
- 2 min read

भारत- पाक सीमेवर सुरू असलेल्या तणावादरम्यान, भारताने पुन्हा एकदा दहशवादाबाबतचे आपले धोरण स्पष्ट केले आहे. पाकिस्तानशी चर्चेच्या मुद्यावर भारताने आपली जुनी भूमिका पुन्हा मांडली आणि म्हटले आहे की, दहशवादाला पाठिंबा देणे पूर्णपणे थांबवले तरच त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा शक्य आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी साप्ताहिक पत्रकार परिषदेत हा स्पष्ट संदेश दिला. परराष्ट्र प्रवक्त्यांनी सांगितले की, जोपर्यंत पाकिस्तान वाँटेड दहशतवाद्यांना भारताच्या स्वाधीन करत नाही आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) रिकामा करत नाही तोपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये आता सामान्य चर्चा होऊ शकत नाही.

प्रवक्ते जयस्वाल म्हणाले की, “ पाकिस्तानशी असलेल्या आमच्या संबंधाबद्दल, भारताची भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट आहे. कोणत्याही प्रकारची चर्चा पूर्णपणे द्विपक्षीय असावी आणि दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत. आम्ही अनेक वर्षापर्वूी पाकिस्तानला सोपवलेल्या वान्टेड दहतवाद्यांची यादी आम्हाला सोपवावी.” ते पुढे म्हणाले की, “जम्मू आणि काश्मीरवरील कोणत्याही प्रकारची चर्चा तेव्हाच होईल, जेव्हा पाकिस्तान बेकायदेशीरपणे व्यापलेले क्षेत्र रिकामे करेल आणि ते भारताला सोपवेल. पीओकेवरील चर्चा तेव्हाच शक्य आहे.”
सिंधू पाणी करार सध्या स्थगित राहणार :
रणधीर जयस्वाल यांनी असेही स्पष्ट केले की, दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानच्या वृत्तीमुळे त्याला एक कडा संदेश देण्यासाठी भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. ते म्हणाले की, “ पाकिस्तान विश्वासार्ह आणि अपरिवर्तनीय पद्धतीने समीमापार दहशतवादला पाठिंबा देणे पूर्णपणे थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी करार सथगित राहील”
त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानांचा उल्लेख केला आणि म्हटले की,“ पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार म्हणतात की, दहशतवाद आणि चर्चा एकत्र चालू शकत नाहीत, दहशतवाद आणि व्यापार एकत्र जाऊ शकत नाहीत आणि पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. हे भारताचे स्पष्ट धोरण आहे आणि त्यात कोणताही बदल होणार नाही.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानला इशारा
यापूर्वी,12 मे रोजी राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला होता की, जर त्याने दहशवादाला पाठिंबा देणे सुरू ठेवले तर ते स्वत:ला नष्ट करेल. “ पाकिस्तानी सैन्य आणि सरकार ज्या पद्धतीने दहशतवादाला प्रोत्साहन देत आहेत ते एके दिवशी पाकिस्तानचा नाश करतील.
जर पाकिस्तानला टिकायचे असेल तर त्याला त्याचे दहतवादी पायाभूत सुविधा नष्ट करावी लागतील. दुसरा कोणताही मार्ग नाही. भारताची भूमिका अगदी स्पष्ट आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र चालू शकत नाहीत, दहशतवाद आणि व्यापार एकत्र जाऊ शकत नाहीत आणि पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही.”
Comments