top of page

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना फडणवीस सरकारतर्फे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी मोठ्या दिलासाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने 2 लाख रुपयांपर्यंतच्या कृषी कर्जमाफीला आणि नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांसाठी प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे लाखो

शेतकर्‍यांना थेट फायदा होण्याची अपेक्षा आहे, मात्र आचारसंहितेमुळे याची अधिकृत घोषणा पुढे ढकलण्यात आली आहे.


56 लाख शेतकर्‍यांना होणार फायदा : अलीकडेच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, या योजनेचा अंदाजे 56 लाख शेतकर्‍यांना फरायदा होऊ शकतो. 36,585 कोटी रुपयांपर्यंतची कृषी कर्जे माफ होण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.


आचारसंहितेमुळे घोषणा पुढे ढकलली: माहितीनुसार विधान परिषद निवडणुकीसाठी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेमुळे या योजनेची औपचारिक घोषणा पुढे ढकलण्यात आली आहे. सरकाने एक निर्णय घेतला आहे, परंतु तो जाहीर करण्याबाबत सावधगिरी बाळगत आहे.


मंत्रिमंडळाने केवळ कर्जमाफीलाच नव्हे, तर आणखी एका महत्वाच्या उपक्रमालाही मंजुरी दिली आहे. जे शेतकरी आपल्या कृषी कर्जाची वेळेवर परतफेड करत आहेत, त्यांना 50,000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन दिले जात आहे. या योजनेचा उद्देश प्रामाणिक कर्जदारांचा सन्मान करणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे.


खरिप हंगामापूर्वी मिळाला दिलासा : मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच संकेत दिले होते की, पात्र शेतकर्‍यांना 30 जूनपर्यंत लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जातील, जेणेकरुन त्यांना आगामी खरीप हंगामासाठी नवीन कृषी कर्ज सहज मिळू शकेल. कृषी कामांमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये, हे सुनिश्चित करणे हे सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले आहे.

सरकारने राष्ट्रीयकृत बँकांना त्यांच्या कृषी कर्ज वितरणाच्या उद्दिष्टांपैकी किमान 80 टक्के पूर्ण करण्याचे निर्देेश दिले आहेत. यामुळे शेतकर्‍यांना वेळेवर आणि पुरेसा पतपुरवठा सुनिश्चित होईल असे म्हटले जात आहे.

Comments


bottom of page