top of page

मानखुर्दमध्ये तिनमजली इमारत कोसळली; ढिगार्‍याखाली चार ते पाच जण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मानखुर्द परिसरात झोपडपट्टी कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ग्राऊंड प्लस दोन असे ट्रक्चर असलेली झोपडी कोसळली आहे. या घरामध्ये चार ते पाच जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल स्थानिक नगरसेवक नवनाथ बन स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.


मानखुर्दमध्ये जी+3 चाळीचा भाग कोसळला आहे. यामध्ये 4 ते 5 जण अडकल्याची भीती आहे. रविवारी (दि.5) रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान हनुमान मंदिरामागील जनता नगर परिसरात तळमजला अधिक जीन मजली (जी+3) चाळीच्या इमरातीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक महितीनुसार, चाळ क्रमांक 5 मधील दोन ते तीन घरांचा भाग कोसळला असून, ढिगार्‍याखाली 4 ते 5 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलिस, संबंधित विभागाचे कर्मचारी तसेच 108 रुग्णवाहितका सेवा दाखल झाली असून शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.


दरम्यान, भारतीय हवामन विभागाने मुंबई महानगरला उद्या सोमवारी, (दि.6 जुलै) मुसळधार पावसाचा तसेच सोसाट्याचे वारे वाहतील असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमिवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना उद्या (दि.6) सुटी जाहीर करण्यात आली आहे. मात्र शासकीय व खासगी कार्यालये नियमितपणे सुरू राहतील. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे देखील अवाहन बृहनमुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


पालघर, रायगड जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर आणि रायगड जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयवांना सोमवारी (दि.6) अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सोमवारी रायगड, नाशिक, पुण्यासह सातारा घाटमाथा परिसरासाठी ‘ रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर मुंबई आणि ठाण्यासह इतर किनारी जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विशेषत: रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पवावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि लहान मुलांची हेळसांड होवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ खबरदारीचे पाउल उचलले आहे.


शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असली, तरी प्रशासकीय यंत्रया मात्र पूर्णपणे सतर्क मोडवर आहे. जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार, या सुट्टीच्या कालावधीत सर्व शाळांचे मुख्यध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत किंवा कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार या सर्व कर्मचार्‍यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात मदत करावी लागणार आहे.


तिघांना बाहेर काढले: नवनाथ बन

“ या घटनेनंतर घटनास्थळी दाखल झालेले भाजप नगरसेवक नवनाथ बन यांनी घटनेबाबत माहिती दिली आहे. एनडीआरएफ, अग्निशामक दल आणि मुंबई महापालिकेच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने तिघांना ढिगार्‍यातून बाहेर काढण्यात यश आलं आहे. आणखी एक जण आतमध्ये असण्याची शक्यता आहे. तातडीने मदतीचं काम हाती घेतलं आहे. बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे,अशी माहिती नवनाथ बन यांनी दिली.


मुंबईत मुसळधार: मुंबईत गेल्या तीन ते चार दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईला तर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता. या रेड अलर्टसारखाच मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस मुंबईत होत आहे. अतिमुसळधार वादळी पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये झाडे कोसळून जीवतहानी झाल्याची घटना घडली आहे.

Comments


bottom of page