top of page

मुंबईत कबुतरांना खायला देण्यावरुन वाद, जैन समुदायाचा कडाडून विरोध !


कबुतरांच्या विष्ठेमुळे हा आजार होऊ शकतो. मुंबई याशी संबंधित एका प्रकरणामुळे चर्चेत आहे, ज्याची आपण चर्चा करणार आहोत. प्रत्यक्षात, मुंबई महानगरपालिकेने दादर कबुतरखान्यात कबुतरांना खायला घालण्यास बंदी घातली आहे. सरकारच्या सूचना आणि न्यायालयाच्या आदेशानंतर, हा निर्णय घेण्यात आला आहे. यावरही कारवाई सुरू झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला घातल्याप्रकरणी मुंबईतही पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


माहिममध्ये पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो एलजी रोडवर त्याच्या कारमधून कबुतरांना खायला घालतना दिसला. यापूर्वी, बीएमसीने रविवारी दादरमधील कबुतरखान्याला ताडपत्रीने झाकले होते. कबुतरांना खायला घालण्यामुळे आरोग्याशी संबंधित धोके निर्माण होत असल्याने हे पाऊल उचलण्यात आले. परंतु, अनेक वेळा निर्णयांवर श्रद्धाचा वियज होतो. या प्रकरणातही असाच एक दृष्टिकोन समोर आला आहे. दादरमधील कबुतरखान्याला ताडपतभने झाकण्याच्या प्रकरणाला जैन समुदाय विरोध करत आहे.


हे लक्षात घेता आणि बीएमसीच्या कारवाईनंतर, महाराष्ट्राचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही महानगरपालिकेच्या आयुक्तांना हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यांनी एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मुंबई उपनगर जिल्हा प्रभारी मंत्र्यांनी संत आणि प्राणीप्रेमींच्या भावनांची काळजी घ्यावी आणि न्यायालयाच्या सूचनांचा आदर करून एक सौहार्दपूर्ण तोडगा काढावा. कबुतरखान्याला ताडपत्रीने झाकल्यानंतर आणि कबुतरांना खाऊ न घालण्याचा इशारा देणारे फलक लावल्यानंतर, त्यांनी हे पत्र लिहिले आहे.


काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने म्हटले होते की, कबुतरांना खाऊ घालणे हे सार्वजनिक त्रास निर्माण करणारे कृत्य आहे. त्यामुळे लोकांच्या आरेाग्यालाही धोका निर्माण होतो. न्यायालयाने बीएमसीला कबुतरांना खाऊ घालाणार्‍यांविरुद्ध एकआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले. गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाने बीएमसीला कोणतेही जुने वारसा कबुतरखाना पाडण्यापासून रोखले होते आणि या ठिकाणी खाऊ घालण्याची परवानगी देऊ नये असे म्हटले होते.


महाराष्ट्राचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महानगरपालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात दावा केला आहे की, अन्नाअभावी रसत्यावर मृत कबुतरे आढळतात. बीएमसीने कबुतरांना खाऊ घालण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. बीकेसी, संजयी गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे कॉलनीमध्ये मोकळ्या जागा आहेत. कबुतरांना खायला देण्यासाठी येथे पर्यायी जागा निर्माण करता येतील. आयुक्तांनी याचा विचार करावा आणि त्यावर उपाय शोधावा.


मुंबई हे देखील अशा शहरांपैकी एक आहे, जिथे अनेक ठिकाणी कबुतरांना खायला दिले जाते. ते एक पुण्यकर्म मानले जाते. धार्मिक श्रद्धेबद्दल बोलायचे झाले, तर असे म्हटले जाते की, यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला समाधान मिळते आणि आशिर्वाद मिळतो. आमावस्येसारख्या प्रसंगी कबुतरांना खायला घालणे खूप शुभ मानले जाते.


जैन धर्मात कबुतरांना खायला घालणे हे सजीव प्राण्यांवरील दया म्हणून पाहिले जाते. सजीव प्राण्यांबद्दल करूणा हे देखील जैन परंपरेचे एक तत्व आहे. जैन मंदिरे देखील कबुतरखाना चालवतात. जैन धर्मावर विश्वास ठेवणारे लोक नियमितपणे कबुतरांना खायला घालतात. दादर कबुतरखाना ज्याला झाकले गेले आहे, ते देखील जैन मंदिराने बांधले होते. यामुळेच समाजात संताप आहे. रस्त्यावर येऊन समुदाय याचा निषेध करत आहे.


कबुतरांच्या विष्ठेमुळे फुफ्फुसांचे आजार होऊ शकतात. जे लोक दीर्घकाळ संपर्कात राहतात ते त्याचे बळी बसू शकतात. म्हणूनच बर्‍याचदा तज्ञ आणि डॉक्टर सल्ला देतात की, ज्या भागात कबुतरांची संख्या जास्त आहे. अशा भागात राहणार्‍या लोकांनी कबुतरांनी खिडकीजवळ किंवा घराजवळ घरटे बनवले आहे का? ते तपासत रहावे.


Comments


bottom of page