top of page

राष्ट्रवादी (श.प.) पक्ष प्रदेशाध्यक्षांच्या राजीनाम्याची केवळ चर्चाच !

शरद पवारांनी भाकरी फिरवलीच नाही; आव्हाडांचे स्पष्टीकरण

ree

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, असं वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झालं होतं, त्यावर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.दरम्यान, हे वृृत्त खोडसाळपणा असल्याचं स्पष्टीकरण पक्षाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे. जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारीत होणे, हा निव्वळ खोडसाळपणा आहे. पक्ष एका नियमानुसार अन शिस्तीनुसारच चालत असतो, असं ट्विट आमदार आव्हाड यांनी केलं आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्या राजीनाम्याचे वृत्त हे निराधार असून शरद पवारांनी अद्याप भाकरी फिरवली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.


दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये अखेर खांदेपालट करण्यात आल्याची चर्चा शनिवारी (12 जूलै) सकाळपासून सुरू होती. जयंत पाटील यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष पदासाठी शशिकांत शिंदे यांचे नाव आघाडीवर होते. यापूर्वी 10 जून रोजी झालेल्या पक्षाच्या वर्धापनदिनीच जयंत पाटल यांनी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. मला पवार साहेबांनी संधी दिली. सात वर्षाचा काळ दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहर्‍यांना संधी देणे आवश्यक आहे. शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. त्यांनी निर्णय घ्यावा, अशी विनंती जयंत पाटील यांनी केली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली.


दरम्यान, या बातम्यांवर शशिाकंत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या नावाची प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा सुरू आहे हे माझे भाग्य आहे. 15 जूलैला ते जाहिर होईल. मला जर संधी मिळाली तर नक्कीच पक्ष वाढविण्यासाठी मी प्रयत्न करेन. माझा लोकसभेला, विधानसभेला पराभव होऊनदेखील मला संधी मिळते आहे हे माझं भाग्य असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष 15 जूलै रोजी निश्चित होण्याची शक्यता आहे.

Comments


bottom of page