विलिनिकरणाबाबत अजित पवारांसोबत झालेल्या बैठकांसदर्भात जयंत पाटलांचा मोठा दावा
- Navnath Yewale
- 18 hours ago
- 1 min read

मुंबई: 17 जानेवारीची बैठक विलिनीकरणाची तारीख ठरवणे आणि तो निर्णय शरद पवारांना सांगणं यासाठीच होती असा दावा जयंत पाटलांनी केला आहे. अजितदादांनी विलिनीकरणाची सगळी रुपरेषा ठरवली होती. फक्त झालेला निर्णय शरद पवारांना सांगणे शिल्लक होतं असं जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी विलिनिकरणावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, 17 जानेवारीच्या आधी 16 जानेवारीला आपल्या घरीही या संदर्भात बैठक झाल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं. विलिनिकरणाच्या सगळ्या बैठका जयंत पाटलांनी आपल्याच घरी झाल्याचवा दावा केला आहे. ते म्हणाले की, “ 17 तारखेची जी बैठक होती आणि 16 जारखेला माझ्या घरी झालेली बैठक त्यावेळी सगळे इथे होते. साहेबांच्या घरी जाऊन फक्त तारीख ठरवायची यासाठीच बारामतीला गेलो होतो. मी निर्णय घेतला की माझे 40 आमदार मी म्हणेन तसंच वागतील याच शंका नाही. एकदा अंतिम निर्णय झाल्यावर मी त्यांना बैठकीला बोलावतो आणि घोषणा करतो. दुसर्या दिवशी असं करू अशी चर्चा झाली. माझ्या घरीच सगळ्या बैठका झाल्या.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनिकरण फक्त जाहीर करणं शिल्लक असतानाच नेमका अजितदादांचा विमान अपघात कसा झाला अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. मुलाखतीत त्यांनी त्यांच्या मनातली शंका बोलून दाखवली. तसंच सत्तेत सोबत यावं अशी अजितदादांची तीव्र इच्छा होती असा गौप्यस्फोटही केला आहे. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत अनेकांना शंका आहे या शंकांचं निरसन करण्याची जाबाबदारी चौकशी समिती आणि सरकारची असल्याचंही जयंत पाटलांनी सांगितलं आहे.
सत्तेत सोबत यावं अशी अजितदादांची तीव्र इच्छा होती असा गौप्यस्फोट जयंत पाटील यांनी केला आहे. मुलाखतीत जयंत पाटलांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवार समर्थकांनी सत्तेत जाण्याची मानसिकता तयार केल्याचं सांगितलं आहे. या संदर्भात बोलताना अजितदादा अनेकवेळा सभागृहातही सत्ताधारी बाकांच्या बाजुला जयंत पाटलांनी यावं असं म्हणाल्याचंही जयंत पाटील म्हणाले. विलिनिकरणाच्या माध्यमातून अजित पवारांची ती इच्छाही पूर्ण झाली असती असं जयंत पाटलांनी सांगितलं. महायुतीत जाण्याबाबत राष्ट्रवादी एसपी चे नेते किती अनुकूल होते हे सांगण्यासाठी जयंत पाटलांचं हे वक्तव्य पुरेसं ठरावं



Comments