top of page

समाजाची दशा बदलण्याठी मराठा समाज देणार नवीन दिशा !



पुणे यथील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाज आता आचारसंहितेच्या माध्यमातून समाजात जनजागृती निर्माण करत आहे. समाजातील अनिष्ठ रुढी पंरपरांना फाटा देवून विवाह आचारसंहिता ठरविण्यात आली आहे. त्यानुसार राज्यभरात समाज जनजागृती करण्यात येत आहे. सोमवारी नांदेड जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतिने जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली.

जिल्हाभरातील समाजिक कार्यकर्ते,विविध राजकिय पदाधिकारी, कार्यकर्ते याच्या उपस्थितीत शहरातील विजयनगर येथील हनुमान मंदिर मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी विवाह सोहळ्यामधील बडेजावपणाला प्रखर विरोध केला.


उपस्थितांमध्ये विचार विनिमय होवून ठरवलेल्या आचारसंहितेप्रमाणे दोनशे लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पाडावा, डिजे ऐवजी पारंपारिक वाद्याला पसंती द्यावी , प्री-वेडिंग सारखा प्रकार बंद करण्यात यावा, मूळ पत्रिका भेटवस्तू सहित देणे टाळावे, हळद, साखरपुडा, लग्न एकाच दिवशी पार पाडावे, संगीत सेरेमनी सारखा कार्यक्रम बंद करावा, हळदीच्या कार्यक्रमात पारंपारिक सुसूत्रा असावी, लग्न वेळेवरच लावावे, लग्नात छत्रपती शिवरायांची आरती घेण्या ऐवजी जिजाऊ वंदना घ्यावी, नवरा, नवरीला हार घालताना उचलून घेऊ नये, लग्नात भेटवस्तू ऐवजी पुस्तके, झाडांची रोपे किंवा रोख रक्कम द्यावी, जेवनात पाच पेक्षा जास्त पदार्थ नकोत, लग्नात नवरदेव नवरी पुढे व्यसन करून नाचणार्‍या तरुणाईचा पायबंद करावा, सासरच्या मंडळींनी पैशासाठी सुनेचा छळ करू नये, सामूहिक विवाह सोहळे पंचक्रोशी व तालुकास्तरावर घ्यावेत, आमदारांनी आपल्या मतदारसंघात सामूहिक विवाह सोहळ्याची जबाबदारी घ्यावी अशा पद्धतीचे आचारसंहिता ठरविण्यात आली.


दरम्यान उपस्थितांच्या सर्वानुमते तालुकास्तरावर एक सुकाणू समिती ठरविण्यात आली. शिवाय प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर हा प्रबोधनात्क उपक्रम राबवण्याबाबत निर्णय घेण्यात आला. नांदेड सुकाणू समितीही यावेळी स्थापन करण्यात आली असून प्रत्येक संघटनेच्या पदाधिकार्‍यांना स्थान देण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सामाजिक, राजकिय, शैक्षणिक, वैद्यकिय, विधी, व्यवसाय क्षेत्रातील नागरिक पदाधिकार उपस्थित होते.

Comments


bottom of page