आष्टीचा जब्या पुन्हा मुंंडेकडे येईल निवडणुकीत त्याचा कार्यक्रम करू
- Navnath Yewale
- Sep 19
- 2 min read
ओबीसी मोर्चात वाघामरेची आमदार सुरेश धसांवर टीका

बीड: यांना जर आमचा ग्रामपंचायत सदस्यही चालत नसेल तर आम्हालाही यांचा आमदार चालणार नाही, यापुढे ओबीसींनी ओबीसींनाच मतदान करायचं असं वक्तव्य ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलं. आष्टीचा जब्या म्हणत त्यांनी भाजप आमदार सुरेश धसांवरही टीका केली. आष्टीचा जब्या विधानसभेला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेकडे परत येईल. त्याचा निवडणुकीत कार्यक्रम करू असा इशाराही त्यांनी दिला. बीडच्या केजमध्ये ओबीसी समाजाच्या मोर्चास संबोधीत करताना नवनाथ वाघमोर बोलत होते.
शरद पवारांवर टीका करताना नवनाथ वाघमारे म्हणाले की, “मराठा समाजाच्या शिक्षण, नोकरीतील आरक्षणाला कधी विरोध केला नाही. पण बारामतीच्या करामतीने ओबीसींना अडचणीत आणण्यासाठी अंतरवाली सराटीतून आंदोलन उभा केले. आपण किती दिवस शांत बसणार? आता ‘ करो व मरो’ ची परिस्थिती आहे. हाकेंनी म्हटलं की आमच्या पोरांना पोरी द्या , मग आग लागली. आग लागायचं कारण नव्हतं. आमचे उष्टे खायला आले म्हणजे आमच्याही खाली गेले.
मनोज जरांगे हा छगन भुजबळ आणि पंकजाताईवर बोलतोय, त्याची लायकी आहे का? आष्टीचा जब्या विधानसभा आली की पुन्हा पंकजाताई आणि धनंजय मुंडेकडे येईल. येणार्या विधानसभेला जब्याचा आम्ही कार्यक्रम करू, निजामाच्या विचाराच्या लोकांना आता मतदान करायचे नाही. याने जर थोडी दाढी वाढवली तर हा निजामासारखा दिसेल. याला निजामी गॅझेट नुसार आरक्षण पाहिजे.”
सरकारला संविधान मान्य नाही का? मग हैदराबाद कसे काय लागू करू शकता? धनगर, बंजारा समाजाने अनेक वषाृपासून आंदोलन केले, तेव्हा कळले नाही हैदराबाद गॅझेट लावावे म्हणून. छत्रपतींच्या विचारांचे आम्ही वारस आहोत. हे निजामाकडे कशाला गेले होते? निजामाच्या दाढ्या करायला गेले होते का? यापुढे जशास तसे उत्तर दिले पाहिजे. “ मनोज जरांगेच्या व्यासपीठावर जाऊन पाठिंबा देण्याचे काम बीडमधील लोकप्रतिनिधी करतात. मुस्लिम बांधवांना देखील कळले पाहिजे की आजवर त्यांना कोणी त्रास दिला आहे. दलित, मुस्लिम, ओबीसी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा सांगितले आहे की, ओबीसींच ताट वेगळ असले पाहिजे, मराठा समाजाचे ताट वेगळं असलं पाहिजे. पकंजा मुंडे यांनी देखील सांगितलेे आहे की गेल्या वर्षी दोन वर्षात ज्या प्रमाणपत्रांचे वाटप झाले त्याची चौकशी करावी. आपल्या आंदोलनाला पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांचा पाठिंबा आहे. तिकडे विदर्भात वडेट्टीवार देखील बोलत आहत.”
दरम्यान, दसरा मेळावा झाला की सर्वांशी चर्चा करून आपल्याला मुंबईकडे निघायचे आहे. नाक दाबल्यावर जर सरकार तोंड उघडत असेल, झुंडशाहीची भाषा सरकारला कळत असेल तर आपण सुद्धा झुंडशाही करू. ओबीसी समाज जर मुंबईत गेला तर या राज्य सरकारला कुठे पळावे हे सुद्धा कहणार नाही असा इशारा वाघामारे यांनी दिला. आपला ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही अशी काळजी त्यांनी घेतली आहे. यांना जर आमचा ग्रामपंचातय सदस्य झालेला चालत नसेल तर आम्हाला सुद्धा तुम्ही आमदार झालेले चालणार नाही. ओबीसींनी यापुढे ओबीसींनाच मतदान करायचे असे अवाहनही वाघमारे यांनी केले.



Comments