top of page

उत्तराखंडमधील केदारनाथला हेलिकॉप्टर क्रॅश, दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू ; महाराष्ट्रातील तिघांचा समावेश, तेलंगणाच्य बासरमध्ये पाच जण बुडाले


केदारनाथ धामला दर्शनासाठी गेलेल्या यवतमाळच्या जैस्वाल कुटुंबावर मोठी आपत्ती ओढवली. आज सकाळी केदानाथ मार्गावर झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणी येथील राजकुमार जैस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा जैस्वाल, त्यांची दोन वर्षाची मुलगी काशी जैस्वाल यांच्यासह एकून सात जणांचा मृत्यू झाला. दुषित हवामानामुळे ही दुर्घटना घडली. हेलिकॉप्टर गौरीकुंडाच्या जंगलात कोसळले. या दुर्घटनेमुळे केदारनाथ यात्रेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


ही दुर्घटना गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण दरम्यान घडली. आर्यन कंपनीच हेे हेलिकॉप्टर देहरादूनहून केदारनाथच्या दिशेने निघाले होते. केदारनाथ खोर्‍यात दाट धुके आणि जोरदार वार्‍यामुळे हेलिकॉप्टर भरकटले. यानंतर हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि ते गौरीकुंडच्या जंगलात कोसळले. उत्तराखंडचे एडीजी ( कायदा आणि सुव्यवस्था) डॉ. व्ही. मुरुगेशन यांनी सांगितले की, “ खराब हवामान हे या दुर्घटनेचे प्रमुख कारण असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे,” या अपघातात पायलटसह सर्व सात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे.


घटनेची माहिती मिळताच उत्तराखंड प्रशासनाने तातडीने बचाव पथक घटनास्थळी रवाना केले. पण केदारनाथ खोर्‍यातील दाट धुके आणि प्रतिकूल हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे आले. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रहिवासी असलेले राजकुमार जैस्वाल, श्रद्धा आणि त्यांची दोन वर्षाची मुलगी काशी 12 जून रोजी केदारनाथच्या दर्शनासाठी निघाले होते. धार्मिक श्रद्धेने प्रेरित होऊन त्यांनी हेलिकॉप्टर सेवेचा पर्याय निवडला होता. मात्र, ही यात्रा त्यांच्या आयुष्यातील शेवटची ठरली. या कुटुंबाच्या निधनाने वणी गावात शेककळा पसरली आहे.


केदारनाथ हे धाम भारतातील प्रमुख तिर्थक्षेत्रांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. खराब हवामान आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे येथील प्रवास नेहमीच आव्हानात्मक राहिला आहे. यापूर्वीही अशा दुर्घटना घडल्या असून, हेलिकॉप्टर सेवेच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेनंतर प्रशासनाने हेलिकॉप्टर सेवेच्या सुरक्षितता नियमांचा आढावा घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. उत्तराखंड प्रशासनाने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हेलिकॉप्टरच्या तांत्रिक बिघाडासह हवामानाच्या परिस्थितीचा तपास केला जाणार आहे. मृतांच्या कुटुंबियांना योग्य ती मदत आणि सहकार्य देण्याचे अश्वासन प्रशासनाने दिले आहेत.

तेलंगणाच्या बासरमध्ये गोदावरी पात्रात पाच जण बुडाले:

हैद्राबाद येथून बासर येथील देवीच्या दर्शनासाठी आलेल्या एकाच कुटूंबातील पाच जण गोदावरी पात्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी 12:30 च्या सुमारास घडली. दरम्यान, स्नानासाठी गोदापात्रात गेलेले पाचही जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला या पैकी चार जणांचे मृतदेह सापडले असून एका मृतदेहाचा शोध सुरू आहे. एकाच कुटुंबातिल पाच जणांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Kommentare


bottom of page