क्लास चालू असताना शिक्षकासमोरच अल्पवयीन मुलाने वर्गमित्राचा गळा चिरला राजगुरुनगरमधील धक्कादायक घटना; उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू
- Navnath Yewale
- 52 minutes ago
- 2 min read

खेड: पुण्याच्या खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील संस्कार कोचिंग स्लसेसमध्ये लहान मुलांचे भयंकर गँगवार घडले आहे. इयत्ता 10 वीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत असतानाच एका मुलाने त्याच्या क्लामेंटचा गळा चिरला. वर्गातच झालेल्या या चाकू हल्ल्याने एकच खळबळ उडाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थानामुळे ओळख असलेलं राजगुरुनगर हे शहरसध्या वाढत्या हिंसाचरामुळे चर्चेत आहे. आज सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास राजगुरूनगरमधील एका खासगी क्लासमध्ये दहावीत शिकणार्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. या वादातून एका विद्यार्थ्याने वर्ग मित्रावर चाकूने हल्ला केला.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विद्यार्थ्याला शेजारी राहणार्या एका युवकाने तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना समजताच त्याच्या वडिलांना मोठा धक्का बसला आहे. मृत विद्यार्थी हा एकुलता एक होता, दोन दिवसांपूर्वीच त्याला मारहाणही झाली होती, मात्र याबाबत त्यांना सांगण्यात आले नव्हते. वर्गात हत्या होते शिक्षक काय करतात? आता मी कोणाकडे पाहू असे म्हणत त्यांनी एकच आक्रोश केला.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून या दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये वाद सुरू होते. याच वादातून आज अल्पवयीन आरोपीने वर्गमित्रावर हल्ला केला. अल्पवयीन आरोपी वर्गामध्ये उशिरा पोहोचला. तो मृत विद्यार्थ्याच्या मागच्या बेंचवर बसला. वर्ग सुरू असतानाच त्याने हल्ला करत थेट गळा चिरला तसेच त्याच्या पोटावरही वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
राजगुरुनगर शहरात अल्पवयीन मुलांमध्ये गँग तयार होत असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहेत. महात्मा गांधी विद्यालय आणि संबंधित खासगी क्लासमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांमध्ये वारंवार भांडण, बाचाबाची आणि मारामारीच्या घटना घडत असल्याचंही बोललं जात आहे. अल्पवयीन मुलांमधील किरकोळ वाद थेट चाकूहल्ला आणि मृत्यूपयृऐत पोहोचणं ही गंभीर बाब असून, समाजात मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. आता या प्रकरणात पोलिस कोणती कारवाई करतात आणि भाविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी काय ठोस उपाययोजना केल्या जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.



Comments