top of page

निवडणुकांच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठकधाराशिवमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यास जमीनीचा निर्णय

मुंबई: राज्यभरातील सर्व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ठाकरे बंधूंची युती अखेरीस जाहीर करण्यात आली. दुसरीकडे काँग्रेसने राष्ट्रीय समाज पक्षाशी आघाडी केली. यावरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या घडामोडी घडत असताना आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत चार महत्वाचे निर्णय घेण्यात आले.


धाराशिव जिल्ह्यातील साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी, एक एकर जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच महारष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व मिळणार, तसेच मताचाही अधिकार मिळणार आहे.


मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय :


-ग्राम, तालुका व जिल्हा प्रशासन सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी 2.0 व सरपंच संवाद कार्यक्रम राबविणार ( सामान्य प्रशासन विभाग)

- राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार (ग्रामविकास व पंचायत राज विभाग)

- धाराशिव शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जमीन (महसुल विभाग)

- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करणार, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व मिळणार, मताचाही अधिकार, अधिनियमातील सुधारणेसाठी अध्यादेश काढणार (नगर विकास विभाग)

Comments


bottom of page