पुन्हा एकदा भारत- बांगलादेश- चीन सीमावाद तीव्र भारताच्या ‘चिकन नेक’ ला मोठा धोका...!
- Navnath Yewale
- 4 days ago
- 3 min read

‘ चिकन नेक’, हा शब्द आपण ईशान्येकडील सात राज्ये, पश्चिम बंगाल किंवा भारत बांगलादेश सीमेबद्दल वापरतो, चीनशी संघर्ष झाला की, ‘चिकन नेक’ वरील वाद अधिक तीव्र होतो. पण आता पुन्हा एकदा यावर वादविवाद तीव्र झाला आहे. हा ‘चिकन नेक’ भारताचा चिकन नेक नाही तर बांगलादेशचा चिकन नेक आहे आणि बांगलादेशमध्ये एक नाही तर दोन ‘चिकन नेक’ आहेत. ज्यामुळे बांगलादेश असुरक्षित वाटत राहतो. यापैकी एक बांगलादेशचा संगपूर चिकन नेक पौइंट आणि दुसरा बांगलादेशचा ‘चिकन नेक पौइंट’ आहे.
हिंमत यांनी युनूस फटकारले...
बांगालादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांना बांगालादेशच्या कमकुवतपणाबद्दल इशारा देाताना, आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा यांनी सोशल मिडिया साईट एक्स वर एका पोस्टद्वारे म्हटले आहे की, जे लोक भारताच्या ‘चिकन नेक’ कडे डोळे डोळ उघडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना मी सांगतो की, बांगलादेशकडे दोन ‘ चिकन नेक पॉइंट’ आहेत. पाहिले रंगपूर आणि दुसरे चिकन नेक. यापैकी, चितगाव, कॉरिडॉर हा भारताच्या चिकन नेकपेक्षाही लहान आहे आणि बांगलादेशच्या आर्थिक आणि राजकीय राजधानीला जोडणारा हा एकमेव दुवा आहे. मी फक्त तेच तथ्य मांडत आहे, जे लोक अनेकदा विसरतात.
युनूस चीनसोबत काय योजना आखणार?
हिमंताला हे सर्व सांगण्याची गरज वाअली, कारण त्यांच्या चीन ळेटीरदम्यान, युनूसने भारताच्या ईशान्य प्रदेशाचे वर्णन ‘भूपरिवेष्टित’ असे केले होते आणि असा दावा केला होता की, ‘बांगलादेश या क्षेत्रातील समुद्राचा एकमेव संरक्षक म्हणून काम करतो. म्हणून चीनने बांगलादेशमध्ये गुंतवणूक करावी’ युनूसच्या विधानामुळे ‘ चिकन नेक’ या शब्दाभोवती चर्चा पुन्हा सुरू झाली. ज्यामुळे हिमंताला बांगलादेशच्या भौगोलिक कमकुवतपणाकडे लक्ष वेधण्यास भाग पाडले.
बांगलादेशातील दुसर्या महायुद्धाच्या एअरबेसवर चीन:
बांगलादेशमध्ये भारतीय सीमेजवळ दुसर्या महायुद्धात बांधलेला लालमोनिरहाट एअरबेस पुन्हा सक्रिय करण्यासाठी चीन बांगलादेशला मतद करत आहे. हे एअरबेस भारताच्या ‘चिकन नेक’ पासून फक्त 100 किलोमिटर अंतरावर आहे. चीन आधिकारी देखील या एअरबेसला भेट देत आहेत आणि बांगलादेशनेही त्याला सहमती दर्शवली आहे. शेख हसीनाच्या काळात चीनने ही योजना आखली होती. परंतु त्यावेळी भारत- बांगलादेश संबंध शिगेला पोहोचले होते, त्यामुळे चीनला येथून काहीही मिळाले नाही. पण हसीनाची सत्ता उलथवताच, युनूसने स्वत: चीनला ती ऑफर दिली. असेही म्हटले जात आहे की, ते सामान्य विमानतळाच्या धर्तीवर विकसित केले जात आहे. परंतु त्याच्या लष्करी वापराची भीती नेहमीच राहील. म्हणून, हिमंताला बांगलादेशला त्याच्या ‘चिकन नेक पॉइंट’ ची आठवण करून द्यावी लागली.
बांगलादेशचे दोन्ही चिकन नेक पॉइंट्स :
बांगलादेशचा पहिला कॉरिडॉर म्हणजे रंगपूर कॉरिडॉर फक्त 83 किलोमिटर लांब आहे. तो पश्चिम बंगालच्या दिनाजपूर जिल्ह्याला आणि मेघालयाच्या नैऋत्य गारो हिल्सला लागून आहे. आणि भारत त्याच्या दोन्ही बाजूला आहे आणि त्याचा पूर्वेकडील भाग देखील भारतात उघडतो. म्हणजेच, चीन त्याला कोणत्याही प्रकारे मदत करू शकणार नाही. तसेच, तो बांग्लादेशचा 11 टक्के भाग बांगलादेशपासून वेगळे करतो. दुसरा चिकन नेक पॉइंट चितगाव आहे. ते फक्त 28 किलोमिटर लांब आहे, ज्याच्या एका बाजूला भारतीय त्रिपुरा राज्य आहे आणि दुसरी फक्त बंगालच्या उपसागरात म्हणजेच समुद्रात उघडते. जर भारताने ते ताब्यात घेतले तर बांगलादेशचे 9 जिल्हे त्यापासून तुटतील. शिवाय बांगलादेशचे सर्वात मोठे बंदर चितगाव देखील याच भागात येते, जे त्याची अर्थव्यवस्था चालवते. बांगलादेशी लोक त्याला बांगलादेशची आर्थिक जीवनरेखा देखील म्हणतात.
बांगलादेशात चीनची गुंतवणूक :
चीन बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह अंतर्गत चितगावमध्ये गुंतवणूक करत आहे. याशिवाय, चीन ढाका-चिट्टागोंग महामार्ग ढाका पॉवर प्लांट आणि ढाका बंदर यासारख्या प्रकल्पांच्या नावाखाली येथे आंधळे पैसे ओतत आहेत. जणेकरून बांगलादेशमध्ये त्याचा हस्तक्षेप वाढू शकेल आणि बांगलादेशला कर्जाच्या सापळ्यात अडकवून काही महत्वाचे क्षेत्र बळकावू शकेल.
भारताचा चीनवर उपाय :
चीनच्या युक्तीवर भारतानेही उपाय शोधला आहे. भारताने के.एम.एम.टी.टी प्रकल्प (कलादान मल्टी मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट) सुरू केला आहे. हा प्रकल्प भारतातील मिझोरमला म्यानमारच्या सिटवेशी जोडतो. यामुळे ईशान्येकडील राज्यांचे चितगाववरील अवलंबित्व की होईल आणि भारताला इतर व्यावसायिक भागीदारीही मिळतील. त्यामुळे चीनच्या बांगलादेशातील प्रवेशाचा भारताला कमी धोका आहे, जर ज्या दिवशी भारत निर्णय घेईल, त्या दिवशी बांगलादेशला निश्चित अनेक क्षेत्रे गमवावी लागतील.
भारताचा चिकन नेक पॉइंट तीन बाजून सुरक्षित :
बांगलादेशच्या कमकुवतपणाच्यसा विपरीत, भारताच्या सिलीगुडी कॉरिडॉर, ज्याला भारताचा ‘चिकन नेक पॉइंट’ असेही म्हणतात, तो एक ताकद मानला जातो. हा कॉरिडॉर ईशान्येकडील सात राज्ये, सिक्कीम, आसाम, मिझोरम, मेघालय, नागालँड, त्रिपुरा आणि मणिपूर यांना भारताच्या मध्यभागी जोडाते. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी अलीकडेच सांगितले की, भारतीय सैन्याच्या तीन बाजूंनी धोरणात्मक तैनातीमुळे हा कॉरिडॉर भारतासाइी एक मजबूत दुवा म्हणून काम करतो. सिलिगुडी कॉरिडॉर हा 22 किलोमीटर रुंद अरुद मार्ग आहे. ज्यामुळे चीन देखील त्यावर लक्ष ठेवून आहे. परंतु भारताच्या कडक सुरक्षेमुळे त्याचे हेतू प्रत्यके वेळी निष्फळ ठरतात.
युनूसचा किल्ला कधीही कोसळू शकतो...
दरम्यान, बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे तणाव वाढत असताना, बांगलादेशच्या भू-राजकारणात या भौगोलिक कमकुवतपणा वेगाने बदलत आहेत. जर बांगलादेशातील युनूसचे सरकार कधीही कोसळू शकते. अंतर्गत मतभेद इतके वाढले आहेत की, बांगलादेशचे सैन्य आणि बांगलादेशचा विरोध दोन्ही युनूसच्या विरोधात गेले आहेत.
Comments