top of page

भोंदूबाबा खरातला वाचवण्यासाठी पहिला बळी 2007 मध्ये, 38 आमदारांनी बोट कापलं, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यासाठी अघोरी पूजा?

मुंबई: दवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्यासाठी राज्यातील काही आमदारांनी अघोरी पूजेचा घाट घातला होता. अशोक खरात यानेही संबंधित नेत्यांना फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करू, असे अश्वासन दिल्याचा सनसनाटी दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावारील चर्चेवेळी बोलत होते. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अशोक खरात आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांबाबत अनेक धक्कादायक दावे केले.


अशोक खरात याला वाचवण्यासाठी 2007 साली पहिला बळी पत्रकार बाळु तुपे याचा देण्यात आला. त्यावेळी या प्रकरणाची नाशिमध्ये प्रचंड चर्चा होती. वृत्तपत्रातही याबाबत लेख छापून आले होते. त्यामुळे अशोक खरात कोण हे पोलिसांना माहिती नव्हते, अशातला भाग नव्हता. या सगळ्या आरोपींना वाचावण्यासाठी पोलिसांनी किती पैसे घेतले ते फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती आहे. अनेक बडे अधिकारी खरातच्या समोर लोटांगण घ्यायचे, त्यांनी खरातला वाचवण्यासाठी बरेच पैसे घेतले, असा दावा जितेंद्र अव्हाड यांनी केला.


जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदारवरुन दूर करण्यासाठी काळी जादू आणि अघोरी विद्येच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही केला. ते म्हणाले की, मी खात्रीने सांगतो, अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्यासाठी काहीजण प्रयत्न करत होते. हे सर्वजन अशोक खरातकडे पूजा घालायला गेले हाते. वेळ आल्यावर मी त्यांचे नावं उघड करेन. ही सगळी माहिती सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांना मिळाली होती. या नेत्यांच्या खरातसोबत बैठका झाल्या होत्या. तेव्हा अशोक खरात म्हाला होता, मला थोडे दिवस द्या मुख्यमंत्री घरी गेलेले असतील.


अशाप्रकारच्या काळ्या जादूला आपण राज्यमान्यता देणार असू, सरकारी पैसा देणार असू, इशानेश्वर मंदिरासाठी कमानी बांधल्या, टाक्या बांधल्या, हा अशोक खरात इतका मोठा कोण होता? मला एका गोष्टीचे वाईट वाटतंय की, या तुकारामांच्या महाराष्ट्रात, ज्ञाणेश्वरांच्या महाराष्ट्रात, शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण काळ्या जादूला इतकी मान्यता देतोय. राजकारणात काळ्या जादूने काहीही होऊ शकते, असे समस्त आमदारांना वाटू लागले आहे.


माझ्याकडे 38 आमदारांची लिस्ट आहे. त्यांनी अशोक खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्या होत्या परवा विधानभवना सगळे आमदार एकमेकांची बोटं तपासून पाहत होते, तू खरातकडे जाऊन आलास का, विचारत होते. ही परिस्थिती महाराष्ट्रात आहे. या बाबासाठी सरकारचा पैसा जातोय, रस्ते बनवले जात आहेत. शिक्षण खाते, म्हाडा, एसआरए सगळ्या पोस्टींग खरातकडून केल्या जात आहेत. हे काय सुरु आहे.? अशोक खरातच्या ट्रस्टच्या सदस्या असणार्‍यांना अजून अटक का झाली नाही, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

Comments


bottom of page