top of page

शेतकर्‍यांसाठी मनोज जरांगेचा एल्गार;भुजबळांवर टीका, सरकारला इशारा

ree

मराठा आंदोलनासाठी रान पेटवणारे मानेज जरांगे पाटील यांनी आता शेतकर्‍यांसाठी एल्गार पुकारला आहे. अतिवृष्टीने शेतकर्‍यांचं कंबरडं मोडलं आहे. पण अजुनही मदतीचा हात पोहोचला नाही. त्याविरोधात जरांगेनी दंड थोपाटले आहेत. मराठा कुणबी आंदोलनाबाबत हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्याचा निर्णय झाला आहे. आता जरांगे पाटील हे शेतकर्‍यांसाठी मैदानात उतरले आहेत. राज्यातील 29 जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले आहे. अतिवृष्टीने शेतकर्‍यांचं मोठं नुकसान झालं. शेताना तळ्याचं स्वरुप आलं नदी- ओढ्याकाठच्या जमिनी वाहून गेल्या.शेतकर्‍यांचं आतोनात नुकसान झालं. पण मदतीचा मोठा हात अद्यापही शेतकर्‍यांपर्यंत पोहचला नाही. तीन हजाराहून अधिक कोटीच्या पॅकेजची घोषणा झाली पण दिवाळी संपूनही शेतकर्‍यांच्या हाती काहीच लागले नाही. त्याविरोधात जरांगे पाटील यांनी भाऊबिजीला आंदोलनाचा इशारा दिला आहे.


आज भाऊबिजीच्या दिवशी आम्ही यादी तयार करात आहोत. लवकरच बैठक घेऊन शेतकर्‍यांचे मोठे आंदोलन उभारणार आहे. अनेक ठिकाणी सरकार पेक्षा अधिकारी मोठे झाले आहेत. जे अधिकारी काम करत नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत.दिलेली मदत ही मदत म्हणता येणार नाही. तो तात्पुरता आनंद आहे. जसं की फडणवीस हे प्रत्येकाला तात्पुरता आनंद देतात. धनगर समाजाला देखील तात्पुरता आनंद दिला. शेतकर्‍याचे काम करणारे अभ्यासक, तज्ञ, नेते एकत्र बसू. सगळ्यांना फोन करून बोलवणार आहे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.


आमच्याकडे एकच इमानदारीने लढण्याची आणि ती जिंकण्याची गोष्ट आहे. सर्व संघटनेचे पक्षाचे शेतकरी नेते आम्ही अंतरवालीत बोलावणार. पहिला टप्पा एकत्र बसून चर्चा करू, नंतर सर्वांची बैठक आणि त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवणार. आमदारांकडे हजारो कोटींच्या प्रॉपर्ट्या आहेत.तरी तरी त्यांना पाच कोटी देण्यात येत आहेत. भाऊबीज निमित्त लाडक्या बहिणीला लाडक्या दाजीला सगळ्यांना न्याय दिल्याशिवाय शांत बसायचं नाही. असं ऐतिहासिक आंदोलन पुन्हा होणार नाही हे देश सुद्ध पाहिल.


हमीभाव कसा होत नाही, कर्जमुक्ती कशी भेटत नाही, शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना कशा नोकर्‍या देत नाहीत तेही बघू. शेतकर्‍यांना आणि शेतीला नोकरीचा दर्जा देण्याची मागणी करणार आहे. सोनं, चांदी सगळं वाढलं, त्याचं पाणीही वाढलं मात्र आमच्या दुधाला भाव मिळाला नाही असंही पाटील म्हणाले.


छगन भुजबळ हे बूळबूळ गाड्यांचे टोळी मुकादम आहेत. बीडच्या एल्गार सभेत धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेचे वारस असल्याच्या वक्तव्याचा जरांगे पाटील यांनी समाचा घेतला. त्यांनी ते वाक्य वापरले खूप अवमान केला एका शब्दात. हा संधी साधू आहे. त्या विचारात वाढलेला वंश आहे ना त्यांच्याकडे, त्रास देणारा कसा होऊ शकतो वारसा चालणारा, त्याचे हात ररक्ताने भरलेले आहेत. त्यांनी हयातीत गोपीनाथ मुंडे यांना खूप त्रास दिला आहे. जो खरा वारस आहे तो विसरतो तरी कसा काय? जातीचा म्हणून किंवा तुमच्या घरातलं घर आहे म्हणून विसरताय त्रास दिलेला इतका, ही कुठली परंपरा आहे, अस ंही जरांगे पाटील म्हणाले.


महादवे मुंडे हत्या प्रकरण:

महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. कालच त्यांचे बंधू आणि आठ-दहा लोक माझ्याकडे आले होते. मॅटरमध्ये पडल्यावर मी मागे नाही हटत ते कोणाचंही असो. पुन्हा मराठ्याच्या नादी लागायचं नाही, आमच्यात एक म्हण आहे 99 गुन्हे झाले भरू द्या. गुंडाच्या टोळीचं ऐकून मराठ्यांनीच परळीत मराठ्यांना त्रास देऊ नका. आमच्यापर्यंत आलं आहे त्याचं ऐकून त्रास दिला जातोय. बीड जिल्ह्यातल्या आणि परळीतल्या प्रत्येक गावात आम्ही लक्ष ठेवून आहोत. इथून पुढे लक्षात ठेवा असा इशाराही त्यांनी दिला.


सरकारला इशारा :

तिकडे ओबीसी म्हणायचं तुमच्या आरक्षणाला हात लागला नाही आणि इकडे आम्हाला जीआर द्यायचा जीआर द्यायचा पण प्रमाणपत्र द्यायचे नाहीत. तर लक्षात ठेवा आंदोलन कुठल्याही दिशेला जाऊ शकते. हे फडणवीस यांनी लक्षात ठेवावे. 1994 चा जीआर निघाला त्याचे प्रमाणपत्र ते आत्तापर्यंत काढत आहेत. जीआर निघालाय तो तुम्हाला कायमचा झाला हे समजून घ्या. जीआरच्याआधार एका वर्षात सगळ्यांना आरक्षणात घालू. तो आली बाबा म्हणतोय संविधानपेक्षा जीआर मोठा नाही. जर आमचा जीआर संविधानापेक्षा मोठा नाही तर तुमचा सुद्धा जीआर संविधानापेक्षा मोठा नाही हे लक्षात घ्या, आमच्या जीआर ला काही झालं तर तुमच्यालाही होणार. 16 टक्के जीआर आहे त्यामध्ये 30,20,25 जाती घातल्या ते सगळं माहित असल्याचं म्हणत जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला.

Comments


bottom of page