कोरोना रुग्णसंख्या 4000 पार, मृत्यू 32; महाराष्ट्राला रेड झोन!
- Navnath Yewale
- 2 days ago
- 2 min read

कोवीड-19 ची लाट पुन्हा भारतात येणार आहे का? असा प्रश्न आता अधिक गंभीर होत चालला आहे. कारण एका आठवड्यात देशात 1200% जेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे. एप्रिलपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या काहीशेचच्या घरात होती, तर जूनच्या सुरुवातीला ही संख्या 4000 च्या जवळपास पोहोचली आहे. एनबी.1.8.1 आणि एलएफ .7 सारख्या नवीन प्रकारांमुळे संसर्गच्या प्रकरणांमध्ये तीव्र वाढ झाली आहे. विशेषत: केरळ, महाराष्ट्र, दिल्ली आणि कर्नाटकमध्ये. केरळ आणि महाराष्ट्रातील आकडेवारीनुसार दोन्ही राज्ये रेड झोनमध्ये आहेत, जिथे संसर्गचे प्रमाण आणि मृत्यूदर दोन्ही वाढत आहेत. 2 जून 2025 रोजी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत 203 सक्रिय रुग्ण आढळले आहेत, तर 4 मृत्यू झाले आहेत. त्याच वेळी,1 जानेवारी ते 2 जून 2025 पर्यत, मृतांची संख्या 32 आणि सक्रिय रुग्णांची संख्या 3961 झाली आहे.
दिल्लीची अवस्था वाईट! :
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, काल दिल्लीत 47 नवीन रुग्ण आढळले आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सध्या दिल्लीत एकून 483 सक्रिय रुग्ण आहेत, तर एकून मृत्यूंची संख्या 4 आहे.
कर्नाटकात कोरोनाचा कहर:
कर्नाटककात गेल्या दिवशी 15 नवीन रुग्ण आढळले,तर मृत्यूची संख्या 0 वर राहिली. पण जर आपण एकून सक्रिय रुग्ण 253 आहेत, तर आतापर्यंत 4 मृत्यू झाले आहेत.
केरळमध्ये कोरानाचा उद्रेक:
केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत. गेल्या 24 तासांत 35 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 1 मृत्यूची नोद झाली आहे. त्याच वेळी सक्रिय रुग्णांची एकून संख्या 1435 वर पोहोचली आहे तर 8 मृत्यू झाल्याने केरळ कोरोना अपडेट मध्ये देशात अव्वल स्थानावर आहे.
महाराष्ट्रात कोरोना बनाला साथीचा रोग:
महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती खूपच वाईट आहे. येथे गेल्या 24 तासांत 21 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर एका मृत्यूची नोंद झाली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे केरळनंतर, एकून सक्रिय रुग्णांच्या संख्येत ते दुसर्या क्रमांकावार आहे. जिथे 506
जण सक्रिय असून एकून 8 मृत्यू आहेत.
दृष्टीक्षेपात समजून घेऊ :
केरळ सक्रिय रुग्ण संख्या 1435 मृत्यू: 8
महाराष्ट्र सक्रिय रुग्ण संख्या 506 मृत्यू: 8
दिल्ली सक्रिय रुग्ण संख्या 483 मृत्यू :4
कर्नाटक सक्रिय रुग्ण संख्या 253 मृत्यू :4
याशिवाय गुजरात, तामिळनाडू, बंगाल सारख्या राज्यांमध्ये प्रकरणे हळूहळू वाढत आहेत.
नवीन प्रकाराचा धोका किती ? :
डब्ल्यूएचओ आणि आयसीएमआर नुसार, एनबी.1.8.1, एलएफ .7, एक्सएफजी आणि जेएन.1 सारखे प्रकार हे ओमिक्रॉनचे उप-प्रकार आहेत. यापैकी, एनबी .1.8.1 ला ‘व्हेरिएंट अंडर मॉनिटरिंग (व्हीयूएम) या श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. चांगली गोष्ट म्हणजे या प्रकारांमधून होणार संक्रमण सध्या सौम्य असल्याचे दिसून येते.
लक्षणे काय आहेत?:
ताप, घसा खवखवणे, नाक बंद होणे, पाटोच्या समस्या, मळमळ आणि थकवा. आरोग्य तज्ञांनी म्हटले आहे की, जर ही लक्षणे 4 दिवसापेक्षा जास्त राहिली तर निश्चितच आरटी-पीसीआर चाचणी करून घ्यावी.
सध्या घाबरण्याची गरज नाही:
आरोग्य मंत्रालय आणि तज्ञांचे म्हणणे आहे की, परिस्थिती नियंत्रणात आहे आणि वैद्यकिय पायाभूत सुविधा पूर्णपणे सज्ज आहेत. पण हे देखील खरे आहे की, निष्काळजीपणा महागात पडू शकतो. विशेषत: ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि इतर आजार असलेल्या लोकानी विशेष खबरदारी घ्यावी.
सरकारची खबरदारी:
केरळ आणि महाराष्ट्रात सरकार अलर्ट मोडवर आहे, आरटी-पीसीआर आणि जीनोम सिक्वेन्सिंग वाढवले गेले, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये आरोग्य बुलेटिन जारी.
जरी लाट पूर्वीसारखी धोकादायक वाटत नसली तरी, रुग्णांची जलद गती दर्शवते की, सावधगिरी हाच एकमेव बचाव आहे. येत्या काळात जर प्रकरणे अशीच वाढत राहिली,तर सरकारला काठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. मास्क, अंतर आणि दक्षता पुन्हा एकदा आपली गरज बनली आहे.
Commentaires