top of page

भुजबळांना क्लीन चिट नाही, निर्णयाविरोधात कोर्टात जाणार ! सामाजिक कार्यकर्त्या अंजलि दमानियांचा दावा

मुंबई: महाराष्ट्र सदन घोटाळा आणि तळोजा गृहपकल्प गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना ईडीने अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने क्लीन चिट दिली आहे. पण भुजबळांना अजून क्लीन चिट मिळाली नाही. मी या निर्णयावर स्थगिती घेण्याची मुंबई उच्च न्यायालात मागणी करणार आहे, असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी स्पष्ट केलं. तसंच “ मुख्यमंत्री फडणवीस यांनी भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचा नारा दिला होता आणि आज भाजप सगळ्या भ्रष्टाचार्‍यांना घेऊन पुढे जात आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी महाराष्ट्राला याच उत्तर द्यावं, अशी मागणीही दमानिया यांनी केली आहे.


सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भ्रष्टराच्या मुद्यावर मंत्री छगन भुजबळ यांच्यावर अनेक आरोप केले होते. पण आता ईडीने आरोप केलेल्या महाराष्ट्र सदन प्रकरणात भुजबळांची कोर्टाने आरोपातून मुक्तता केली आहे. या प्रकरणी दमानियांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली आहे.


“2014 पासून जनहित याचिका दाखल केल्यापासून माझा लढा सुरू आहे एकून 11 घोटाळे आणि त्यातून मिळणारे पैसे यांसदर्भात आम्ही जनहित याचिका दाखल केली होती. तीन गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत दोन गुन्ह्यांमध्ये दिलासा मिळाला आहे एक गुन्हा बाकी आहे. कोर्टाला योग्य ती माहिती न दिल्यामुळे गुन्हे रद्द केले असतील. मी मुख्य न्यायमूर्तींकडे यासंदर्भात पत्र लिहणार आहे. कलिना सेंट्रल लायब्ररीच प्रकरण प्रलंबित आहे अद्याप भुजबळांना क्लीन चिट नाही, असा दावा दमानियांनी केला.


“ सगळे एका माळेचे मणी आहेत. उद्धव ठाकरे सरकारचे 31 मार्च 2022 ला शासन निर्णय रद्द करण्यासाठी दुसरा शासन निर्णय काढला. एप्रिल 2023 मध्ये एक शासन निर्णय काढून अपिलमध्ये जाण्याचा शासन निर्णय काढला मात्र महाराष्ट्र सदन घोटाळ्याच प्रकरण अद्याप संपल नाही. सगळ्या सरकारने त्यांना वाचवलं आधी ठाकरेंनी वाचवलं मग फडणवीसांनी वाचवलं. असा आरोपच दमानियांनी केला.


‘ नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करावे लागणार आहे. सगळे घोटाळे हे दवेंद्र फडणवीस यांनी संपुष्टात आणले यासाठी त्यांना महाराष्ट्र कधी माफ करणार नाही. ईडीच्या आरोपपत्राचे सगळे पुरावे आहेत, प्रत्येकाचा जबाब दिले आहेत तरी असा निर्णय आला हे दुर्दैव आहे. भाजपची ही मोडस ऑपरेंडी आहे. आधी आरोप करा त्यांच्या मागे तपास यंत्रणा लावा आणि फडणवीस यांनी भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राचा नारा दिला होता आणि आज हेच फडणवीस सगळ्या भ्रष्टाच्यार्‍यांना घेऊन पुढे जात आहेत आता कित्येक पटींनी लूट सुरू आहे. फडणवीस यांनी महाराष्ट्राला याचं उत्तर द्यावं सध्या राज्यात केवळ बोली लावण्याचं राजकारण सुरू आहे. अशी टीकाही दमानियांनी केली.

Comments


bottom of page