top of page

भेदरलेल्या पाकिस्तानला भारताकडून चोख प्रत्युत्तर


ree


पहलगाम हल्ल्यानंतर, भारताच्या कठोर कारवाईमुळे पाकिस्तान अधिकाधिक निराश होत आहे. काल रात्री पुन्हा एकदा काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर त्यांच्याकडून युद्धबंदीचे उल्लंघन करण्यात आले. भारताने याला चोख प्रत्यूत्तर दिले आहे. कोणतीही जीवतहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या, दहशतवादी हल्ल्यापासून भारत पाकिस्तानविरूद्ध सतत कठोर कारवाई करत आहे.


भारताचा बदला खूप धोकादायक आणि निर्णायक असेल, याची पाकिस्तानला नेहमीच भीती असते. या भीतीमुळे पाकिस्तान अस्वस्थ होत आहे आणि नियंत्रण रेषेवर सतत गोळीबार करत आहे. त्याने सलग तिसर्‍या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. या गोळीबाराला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले.


26-27 एप्रिलच्या रात्री उल्लंघन

भारतीय सैन्याच्या म्हणण्यानुुसार 26-27 एप्रील 2025 च्या रात्री, पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांनी तुतमारी गली आणि रामपूर सेक्टर समोर नियंत्रण रेषेवर लहान शस्त्रांनी विनाकारण गोळीबार सुरू केला. आमच्या सैन्याने योग्य त्या छोट्या शस्त्रांनी गोळीबार करून प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले.


दारूबंदीचे उल्लंघन करून विनाकारण गोळीबार!

जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकस्तानी सैन्याने रविवारी विनाकारण गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, असे अधिकार्‍यांनी सांगितले. भारतीय लष्कराच्या जवानांनी प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने विनाकारण गोळीबार करण्याची ही सलग तिसरी रात्र होती. भारतीय लष्कारांच्या जवानांनी योग्य त्या लहान शस्त्रांनी गोळीबार करून प्रभावीपणे चोख प्रत्युत्तर दिले.


पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भीती

मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करून 26 जणांची निर्घुण हत्या केली. लष्कराच्या गणवेशात आलेल्या, दहशतवाद्यांनी प्रथम पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले, त्यांची ओळखपत्रे तपासली आणि नंतर पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. तेव्हापासून, भारत अनेक आघाड्यावर पाकिस्तानची झोप उडवत आहे. सिंधू पाणी कराराच्या निलंबनापासून ते पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यापर्यंत, भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले आहेत. पाकिस्तानही अनियमित विधाने करत आहे. दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.


सीसीएस बैठकीत महत्वाचे निर्णय

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, सुरक्षा मंत्रिमंडळ समितीच्या (सीसीएस) बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये 1960 चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला. यामुळे अटारी एकात्मिक तपासणी नाका तात्काळ बंद करण्यात आल. याशिवाय, सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली होती. भारतात उपस्थित असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी 48 तासांचा कालावधी देण्यात आला होता. त्यास आता काही तास उरले आहे.

Comments


bottom of page