top of page

भ्रष्टाचारावरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

ree


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज दादर येथे भ्रष्ट मंत्र्यांविरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यत आले. याचवेळी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये देखील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरेंनी भ्रष्टाचारावरून सत्ताधार्‍यांवर हल्लाबोल केला. ‘ महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे, सत्ताधार्‍यांशी संघर्ष करायला मर्द लागतो, तो मर्द आपल्या शिवसेनेत आहे.’ असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.


सत्ताधारी मंत्र्यावर उद्धव ठाकरे यांनी ठाकरे शैलीत फैरी झाडल्या, ‘ कुणी डान्सबार चालवतंय, कुणी बॅगा घेऊन बसलंय, रमी मंत्री भरसभागृहात रमी खेळतात. शेतकर्‍यांची कर्जमुक्ती करायला यांच्याकडे पैसे नाहीत. शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही, देवेंद्र फडणवीस भाजपाची परंपरा पुढे चालवणारे आहेत असं आम्हाला वाटलं होतं. मंत्र्यांची हकालपट्टी केली जाईल, असा विश्वास होता. पण त्यांनी गैरवर्तन करणार्‍यांना फक्त समज देऊन सोडून दिलेलं आहे. चांगली गोष्ट आहे पण भ्रष्टाचार्‍यांविरोधात पुरावे आहेत तरी त्यांना सोडून देणार असाल तर मग धनकड यांना तात्काळ राजीनामा घेऊन वनवासात का पाठवलं याचंही उत्तर द्या.’


धनकड यांच्या राजीनाम्याबाबत भाष्य करत ठाकरे म्हणाले, ‘ धनकड यांचा राजीनामा का घेतला यांचक कारण काही समजलं नाही. त्यांना तडकाफडकी काढून गायब केलं. धनकड यांना फक्त समज का दिली नाही?’ चीनमध्ये सरकारविरोधात कळत असो वा नकळत बोलणार्‍या व्यक्ती गायब होतात, तसंच भाजपचं सुरु असल्याचा दावा ठाकरे यांनी यावेळी केला. मग उपराष्ट्रपती आहेत कुठे ते सर्वांना सांगा, असेही ठाकरे म्हणाले. तर ‘ आज मी सगळ्यांना म्हणजेच सगळ्या शिवसैनिकांना सांगतोय मोदींनी जशी चाय पे चर्चा केली होती तशी तुम्ही आता लोकांशी चर्चा करा. आता भ्रष्टाचा पे चर्चा करा. भ्रष्टाचारी मंत्री जोपर्यंत हाकलले जात नाहीत तोपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही, अशी भुमिकाही त्यांनी मांडली.


यावेळी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधार्‍यांवर भ्रष्टाचारावरून जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्र भ्रष्टाचारात पहिल्या क्रमांकावर असून विकासकामात मागे असल्यावा आरोपही त्यांनी केला. शिवाय मंत्र्यांवर गंभीर आरोप करत गैरवर्तन करणार्‍यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाठीशी घातल्याचा आरोप केला.

Recent Posts

See All
स्वबळाचा नारा काँग्रेसचा ! फायदा मात्र भाजपाचा !!

मुंबई महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार! असा नारा भाई जगताप यांनी दिला आणि मुंबईचे राजकारण पुन्हा एकदा तापू लागले. मतदार यादीत घोळ झाला असा आरोप करीत भाजपा विरोधकांनी एकजुटीने आक्रमक भूमिका

 
 
 

Comments


bottom of page