top of page

मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस ठाकरे बंधुसोबत लढणार नाही- भाई जगताप

ree

अगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा ठाकरे बंधुसोबत एकत्र लढणार नाही, असे महत्वपूर्ण वक्तव्य काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केले. भाई जगताप हे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केले. भाई जगताप हे गेल्या वर्षापासून काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणू ओळखले जातात. ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत. मुंबई काँग्रेसमध्ये भाई जगताप यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे भाई जगताप यांच्या ठाकरे बंधूसोबत लढणार नसल्याच्या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे.


मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे सोडाच पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही.मी मुंबई काँग्रसेचा अध्यक्ष असताना ही गोष्ट ‘ डंके की चोट’ पर सांगितली होती. आमच्या राजकीय कामकाज समितीची जी बैठक झाली त्यामध्येही मी रमेश चेन्निथला यांच्यासमोर ही गोष्टी सांगितली. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, नेत्यांना नाही. जे काँग्रेस कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षापासून पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन आहेत, त्यांचीही इच्छा असते, आपणही कधी ना कधी निवडणूक लढवावी. त्यामुळे या निवडणुका कार्यकर्त्यांना लढू द्या. कोणी कोणासोबत लढायचे, हे स्थानिक कार्यकर्त्यांना ठरवू द्या. आम्ही मुंबईतील स्थानिक कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही मुंबईत स्वबळावर लढूयात, असे काँग्रेसच्या बैठकीत सांगितल्याचे भाई जगताप यांनी म्हटलं.


मी राजकीय कामकाज समितीच्या बैठकीत सांगितले की, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धवजींसोबत जाऊ नये, राज ठाकरेंचा तर प्रश्नच येत नाही. काँग्रेसने आजपर्यंत कधीही, ‘राज ठाकरेंना सोबत घेऊ, असे म्हटलेले नाही. मविआत शिवसेना एकटीच नाही. उद्धव ठाकरे मविआत आले तेव्हा शिवसेना एकटीच होती. आता देान शिवसेना झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत स्वबळावर लढवण्याबाबतचा निर्णय काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांवरच सोडावा. स्थानिक कार्यकर्त्यांची ठाकरे बंधूसोबत एकत्र निवडणुक लढण्याची इच्छा नाही, असे भाई जगताप म्हणाले.


आमची बैठक झाली चेन्निथला यांच्यासोबत त्यावेळी आम्ही आमची मतं मांडली आहे. मनसेसोबत आमचे मुलभूत मतभेद आहेत, त्यामध्ये काही शंका नाही. प्रत्येक नेत्याची भूमिका चेन्निथला यांनी ऐकून घेतली. स्थानिक स्वराज्य संस्सथांच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन वरिष्ठस्तरावर निर्णय घेतले जातात. काँग्रेस हायकमांड याबाबत सगळ्यांशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेईल, असे काँग्रेसच्या मिडिया सेलचे प्रमुख सचिन सावंत म्हणाले.

Comments


bottom of page