पाकिस्तानच्या बलुचिस्तानातील एफसी मुख्यालयावर दहशतवादी हल्ला
- Navnath Yewale
- Dec 1, 2025
- 2 min read

बलूचिस्तान : पाकिस्तान बलुचिस्तान प्रांतात दहशतवादी हल्ला झाला. नोक्कुंडी येथील फ्रंटियर कॉर्प्स मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वत:ला उडवून दिले. ज्यामध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांनी प्रत्यूत्तर म्हणून किमान तीन तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान दहशतवादी ठार झाले.
रिको डिक आणि संदक खाण प्रकल्पांशी संबंधित परदशी तज्ञांच्या निवास्थानाच्या कंपाऊंडला लक्ष्य करण्यात आले. बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट नेही या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ही घटना पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा आव्हानांवर प्रकाश टाकते, जिथे त्यांचे स्वत:चे पुरस्कृत दहशतवादी आता त्याचा फटका बसत आहेत.
बलुचिस्तानमधील नोक्कुंडी येथील फ्रंटियर कॉर्प्स मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वत:ला उडवून दिले. त्यानंतर,किमान सहा सशस्त्र हल्लेखोरांनी मुख्यालयावर हल्ला केला, ज्यामुळे पाकिस्तानी सुरक्षा दलांना तीन टीटीपी अतिरेक्यांना ठार मारण्यात आले.याच भागात बलुच लिबरेशन फ्रंट ने दावा केलेल्या रिको डिक आणि संदक खाण प्रकल्पांशी संबंधित परदेशी तज्ञांच्या निवास्थानांवही आत्मघाती हल्ले झाले. या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
नोव्हेंबर 2022 मध्ये पाकिस्तान सरकारसोबतचा युद्धविराम संपल्यापासून, तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान च्या कारवाया तीव्र झाल्या आहेत, विशेषत: खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये. अलिकडेच, क्वेटा आणि डेरा मुराद जमाली येथे सात स्ूफोट झाले, ज्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. पाकिस्तानच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण करत आहे आणि या घटना दर्शवितात की, हा बंदी घातलेला गट आपल्या नापाक कारवायांमध्ये निर्ययी आहे, ज्यामुळे पाकिस्तानला आंतराष्ट्रीय स्तरावर लाज वाटली जात आहे.
नोक्कुंडी येथील आत्मघातकी हल्ल्यात रिको डिक आणि संदक खाण प्रकल्पांशी संबंधित परदेशी तज्ञांच्या निवास्थानावर लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानी सरकार या प्रकल्पांना त्यांचे “ सर्वात सुरक्षित” परदेशी गुुंतवणूक प्रकल्प म्हणून घोषित करत होते आणि अमेरिकेसह जगभरातून गुंतवणूक आमंत्रित करत होते. या संवेदनशील हल्ल्यामुळे प्रकल्पाच्या सुरक्षेबद्दल आणि पाकिस्तानमधील परकीय गुंतवणुकीच्या वातावरणाबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा हल्ला पाकिस्तानच्या आर्थिक विकासाच्या महत्वकांक्षेला मोठा धक्का आहे.
जगभरात दहशतवादी घटना घडवून आणणारा पाकिस्तान आता स्वत:च्या पुरस्कृत दहशतवाद्यांमुळे मोठ्या संकटाचा सामना करत आहे. एकेकाळी पाकिस्तानने भारताविरुद्ध वापरण्यासाठी प्रशिक्षित केलेले टीटीपीसारखे गट आता पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयवर हल्ला करत आहेत. पेशावरमधील एफसी मुख्यालयांवर झालेला आत्मघाती हल्ला आणि बहावलपूरच्या अबू दुजानासारख्या दहशतवाद्यांना टीटीपीमध्ये सामील करणे, हे दर्शविते की दहशतवादाची “ निर्यात” करण्याचे पाकिस्तानचे धोरण आता ते “ आयात ” करून स्वत:साठी एक मोठा धोका बनले आहे.



Comments