top of page

प्रवीण दरेकरांनी उत्तरभारतीयांचे आभार मानले , नव्या वादाला तोंड फुटणार?

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईकरांचे आभार मानले आहे. “ भाजप मुंबई तोडणार नाही, तर जोडणार” अशी ग्वाही देत त्यांनी विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. विशेषत: उत्तर भारतीय आणि हिंदीभाषक मतदारांनी भाजपवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांना कृतज्ञता व्यक्त केली.


प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांनी दहिसरमधील वॉर्ड क्रमांक तीनमधून विजय मिळवला आहे. या विजयानंतर बोलताना दरेकर म्हणाले की, ‘मी’ हिंदीभाषी, उत्तर भारतीयांचा मनापासून आभारी आहे. मुंबईत मराठी भाषक आणि उत्तर भारतीयांमध्ये तेढ निमाृण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही नेत्यांकउून करण्यात आला. मात्र, मुंबईकरांनी आणि स्वत: मराठी माणसाने अशा फूट पाडणार्‍या राजकारणाला नाकारले आहे.


मुंबईत सर्वजण आजही गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत, हेच या निकालातून सिद्ध झाले आहे. “ यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंचे नाव न घेता त्यांच्यावर बोचरी टीका केली. ते एका वाहिनीशी बोलत होते.


दरम्यान, दरेकर यांनी विजयाचे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला दिले. ते म्हणाले की, “ महायुतीच्या कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन परिश्रम घेतले. मुंबईकरांचा एकनाथ शिंदे आणि ‘ देवाभाऊ’ यांच्यावर असणारा विश्वासच आज मतांच्या रूपाने समोर आला आह . हा विजय केवळ भाजपचा नसून विकासावर विश्वास ठेवणार्‍या प्रत्येक मुंबईकराचा आहे.”


उत्तर भारतीय समुदायाचे आभार मानताना दरेकर म्हणाले, “ उत्तर भारतीयांनी दाखवून दिले की, ज्या मातीने त्यांना मोठे केले, त्या मातीचा आणि संस्कृतीचा ते सन्मान करतात. ते पूर्णपणे भाजपच्या पाठीशी उभे राहिले, असे ते म्हणाले. मुंबईत भाजपचे मिशन यशस्वी होत असून हर्षद कारकर, संजय घाडी आणि संजना घाडी यांसारख्या उमेदवारांनी मोठ्या ताकदीने विजय मिळवल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

Comments


bottom of page