top of page

बिहारनंतर आता बीएमसी निवडणुकीसाठी भाजपची मोठी खेळी


मुंबई : बिहार निवडणुकी नंतर भाजपने आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीदरम्यान, भारतीय जना पक्षाने आज त्यांच्या मुंबई युनिटमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल केले. पक्षाने त्यांची शहरी रणनीती यशस्वी करण्यासाठी आणि तळागळातील उपस्थिती मजबूत करण्यासाठी चार नवीन सरचिटणीसांची नियुक्ती केली.

राजेश शिरवाडकर, गणेश खापडकर, आचार्य पवन त्रिपाठी आणि श्वेता परुळेकर यांना नवीन सरचिटणीसांच्या महत्वाच्या जबाबदार्‍या देऊन, भाजपने आगामी निवडणुकांसाठी पूर्णपणे तयार असल्याचा स्पष्ट संकेत दिला आहे. हे नवीन नेतृत्व भाजपला शहरी मतदारांमध्ये त्यांची पोहोच वाढविण्यास आणि त्यांनी निवडणुक रणनीती अधिक तीव्र करण्यास मदत करेल. हे राजकीय गोंधळाच्या या काळात एक महत्वाचं पाऊल आहे.


संघटनात्मक फेरबदलासोबतच बीएमसीने बहुप्रतिक्षित वार्ड आरक्षण सोडत देखील काढली ज्यामुळे मुंबईतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. एकूण 227 वार्डापैकी 114 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ज्यामुळे सर्व प्रवर्गातील महिलांसाठी 50 टक्के आरक्षण निश्चित झाले आहे.


दरम्यान, या नविन आरक्षण संरेखनामुळे त्यांच्या पारंपारिक वॉर्डातील अनेक ज्येष्ठ नगरसेवकांना त्यांच्या जागेवरून काढून टकाण्यात आले आहे. यामध्ये रवी राजा आणि हर्षिता नार्वेकर सारखे भाजपचे दिग्गज नेते समाविष्ट आहेत. भाजपच्या अंतर्गत फेरबदलाने आणि वॉर्ड आरक्षणातील नाट्यमय बदलामुळे मुंबईच्या राजकारणात निर्णायक टप्प्याची सुरुवात झाली आहे. ज्यामुळे ही महापालिका निवडणूक एक उच्च- स्तरीय आणि बहुप्रतिक्षित स्पर्धा बनली आहे.

Comments


bottom of page