भारताची लोकशाही हायजॅक झाली आहे- राहुल गांधी
- Navnath Yewale
- Sep 18, 2025
- 2 min read
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून मत चोरीच्या आरोपला वाचा फोडली आहे. पहाटे 4:00 ओटीपी, मत चोरीची मोड्स ऑपरेंडीटी, पुराव्यासह केला मोठा दावा

नवीदिल्ली: काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज निवडणूक अयोगावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी मतचोरी प्रकरणात नवा गौप्यस्फोट केला. केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञाणेश्वर कुमार यांनी मत चोरीला मदत केली असल्यचा अरोप त्यांनी केला. मतदारांची नावे त्यांना न कळवता डिलिट करण्यात आली. या प्रकरणातील आरोप करणार्यांना मुख्य निवडणूक आयुक्त पाठीशी घालत असल्याचा आरेाप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांनी कशी मतचोरांना लोकशाहीविरोधातील लोकांना कशी मदत केली हे सांगणार आहे. मतचोरी कशी झाली, मते कशी बदलली हे पुराव्यानिशी मांडणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी मत चोरी करण्यासाठी प्रक्रिया मोड्स ऑपरेडिंटी काय आहे, याचा पुराव्यासह दावा केला.
राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत मत चोरीच्या आरोपांवर पुनरुच्चार करताना केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकमार यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी म्हटले की, कर्नाटकमधील आळंद मतदारसंघातून 6018 मतदारांची नावं वगळण्यात आली. मतदारांना कल्पनाच नाही की त्यांची नावे मतदारयादीतून गळण्यात आली आहेत. दलित, अल्पसंख्याक मतदारांची नावे मतदारयादीतून जाणीपूर्वक वगळण्यात आली. यात विशेष: काँग्रेसच्या मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. गोदाबाई या वयस्कर महिलेच्या नावावरून 12 मतदार वगळण्यात आले. यावेही राहुल गांधी यांनी गोदाबाई यांची व्हिडिओ क्लिप दाखवली.
कर्नाटक बाहेरील मोबाइल क्रमांकावरून मतदारांची नावे वगळण्यात आली. अर्ज कोणी केले, ओटीपी कोणाला गेले, हे सगळं संशयास्पद असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. सुर्यकांत नावाच्या व्यक्तीने 14 मिनिटांत 12 नावे वगळण्याचे अर्ज भरले असल्योच आमच्या तपासात समोर आले असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट करताना मत चोरी मोड्स ऑपरेंडिटी सांगितली. राहुल गांधी यांनी सांगितले की मागण्चा पत्रकार परिषदेत आम्ही मतदारयादीतून कशाप्रकारे बोगस नावे जोडली जातात, हे दाखवलं. तर, या पत्रकार परिषदेत मतदारयादीतून कशाप्रकारे बोगस नावे वगळण्यात आली, याची माहिती देणार आहे. काँग्रेसला ज्या बुथवर सर्वाधिक मते मिळाली, त्याच बुथवरील मतदारांना वगळण्यात आले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले की, सुर्यकांत यांच्या नावावरून मतदारयादीतील 12 जणांची नावे वगळण्यात आली. अवघ्या काही मिनिटांत हे काम करण्यात आलं. तर, नागराज नावाच्या व्यक्तीने पहाटे 4:00 वाजाता उठून 36 सेकंदात दोन नावे वगळण्यासाठी अर्ज केला. राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेत मतदारयादीतून नाव वगळलेल्या सूर्यकांत यांनी सांगितले की, माझ्या नावावरून 12 जणांची नावे वगळण्यात आली. मी कोणालाही मेसेज केला नाही, मी मतदारयादीतून नावं वगळण्याबाबत कोणताही अर्ज केला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक अयोगावर गंभीर आरोप
राहुल गांधी यांनी निवडणूक अयोगावर गंभीर आरेाप केले आहेत, मत चोरीला निवडणूक आयोगाकडून मदत केली जात आहे. कर्नाटक सीआयडीने या मतदार वगळण्याचा तपास सुरू केला. सीआयडीने 18 अर्ज केले. आम्हाला ओटीपी ट्रेस मोबर्इाल क्रमांक, कोणाच्या नावावर नंबर रजिस्टर आहे, अशी सगळी तांत्रिक माहिती मागितली. मात्र, निवडणूक आयोगाकडून कोणताही प्रतिसाद दिला गेला नसल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
मतदारयादीतून नावे वगळण्याच्या तक्रारीवर 23 फेब्रूवारी तपास सुरू झाला. मार्च महिन्यात काही परावे समोर आले. निवडणूक अयोगाला सीआयडीने पुढील काही दिवसात पत्र लिहिली.. ऑगस्टमध्ये केंद्रीय निवडणूक अयोगाने अपूर्ण माहिती दिली, ज्याचा तपासात काहीच फायदा होणार नव्हता. सीआयडीने केंद्रीय निवडणूक आयोगाला 18 वेळा स्मरण पत्रे पाठवली. त्यालाही उत्तर मिळाले नाही. कर्नाटक निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे माहिती मागितली, त्यांना उत्तर दिले नाही. ज्ञाणेश्वर कुमार हे मत चोरीतील आरोपींना वाचवत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.



Comments