राहुल गांधींना निवडणूक अयोगाचा अल्टीमेट!
- Navnath Yewale
- Aug 17
- 2 min read
सात दिवसांत शपथपत्र दाखल करा, अन्यथा देशाची माफी मागा; तिसरा पर्याय नाही.

मतांच्या चोरीवरून झालेल्या आरेापांनतर आज रविवारी केंद्रीय निवडणूक अयोगाने तातडीने पत्रकार परिषद घेऊन याबाबतच्या सर्व टीकांवर उत्तर दिले. पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञाणेश कुमार यांनी राहुल गांधी यांच्या ‘ संविधानाची शपथ’ या युक्तिवादाला प्रत्यूत्तर दिले. त्यांनी सांगितले की, त्या मतदारसंघातील मतदार नसलेल्या व्यक्तीला ‘साक्षीदार’ म्हणून शपथ घेणे बंनकारक आहे.
निवडणूक अयोगाने राहुल गांधी यांना एकतर सात दिवसांच्या आत शपथपत्र सादर करण्यास सांगितले आहे किंवा त्यांच्या आरोपबद्दल देशाची माफी मागण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दिल्लीतील पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, जर तुम्ही त्या मतदारसंघाचे मतदार नसाल, तर कायद्यानुसार तुमच्याकडे फक्त एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे, ‘द रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टर्स रूल्स’ च्या नियम क्रमांक 20 उपकलम (3) उपकलम (बी) नुसार तुम्ही साक्षीदार म्हणून तुमची तक्रार दाखल करू शकता. यासाठी तुम्हाला निवडणूक नोंदणी अधिकार्यासमोर शपथ घ्यावी लागेल आणि ती शपथ ज्या व्यक्तीविरोधात तुम्ही तक्रार केली आहे, तिच्या समोर घेतली जाईल.
मुख्य निवडणूक आयुक्तांनी राहुल गांधींना त्यांच्या आरोपांसाठी एकतर शपथपत्र सादर करण्यास किंवा देशाची माफी मागण्यास सांगितले. ते म्हणाले, शपथपत्र द्या किंवा देशाची माफी मागा. तिसरा कोणताही पर्याय नाही. जर सात दिवसांत शपथपत्र दिले नाही, तर याचा अर्थ सर्व आरोप निराधार आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी आपल्या ‘ मतांची चोरी ’ च्या दाव्यांना पाठिंबा देण्यासाठी शपथपत्र मागितल्याबद्दल निवडणूक अयोगावर टीका केली होती. राहुल गांधी म्हणाले होते, निवडणूक अयोग मला शपथपत्र आणि शपथ घेऊन माहिती देण्यास सांगत आहे. मी संसदेत संविधानाची शपथ घेतली आहे. त्यांनी असा आरोप केला होता की निवडणूक अयोगाने भाजपसोबत संगनमत करून लोकांकडून लोकसभा निवडणुक “चोरल्या”
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर निवडणूक अयोगाने मतदार याद्यांच्या स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजनला सुरुवात केल्यानंतर राजकारण तापले आहे. विरोधकांनी असा आरोप केला होता की, निवडणूक अयोग भाजपच्या फायद्यासाठी लोकांची नावे मतदार यादीतून वगळत आहे.
निवडणूक अयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते पवन खेरा यांनी आरोप केला की, मुख्य निवडणूक आयुक्त भाजपच्या एजंटाप्रमाणे काम करत आहेत.
आयोगावर आरोप:
आज सकाळी राहुल गांधी यांनी बिहारमध्ये मतदार यादीतील नावे जोडणे आणि वगळणे (एसआयआर) द्वारे विधानसभा निवडणुकांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. सासाराम येथे आपल्या 1,300 किमीच्या ‘ मतदाता अधिकार यात्रे’ च्या शुभारंभप्रसंगी ते म्हणाले, संपूर्ण देशात विधानसभा आणि लोकसभा निवडणूका चोरल्या जात आहेत आणि त्यांचा शेवटचा कट म्हणजे बिहारमधील निवडणूका चोरण्यासाठी एसआयआर द्वारे मतदार जोडणे आणि वगळण. आम्ही त्यांना बिहारमधील निवडणुका चोरी करू देणार नाही. बिहारचे लोक त्यांना निवडणुका चोरी करू देणार नाहीत. गरिबांकडे फक्त मताची ताकद आहे आणि ते त्यांना निवडणुका चोरू देणार नाहीत, असेही राहुल गांधी म्हणाले.



Comments