top of page


पुणे महापालिकेला जानेवारीमध्ये तर मुंबईला फेब्रूवारीत मिळणार महापौर
पुणे : राज्यातील सर्व महापालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यासाठी राज्य सरकारने कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, महापालिकांकडून महापौर-उपमहापौर निवड आणि नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली सभा घेण्याची तांत्रिक तयारी सुरू झाली आहे. महापालिकेच्या विभागाकडून शुक्रवारी (दि.23) विभागीय आयुक्तांना यासंदर्भात पत्र पाठविले गेले. विभागीय आयुक्तांकडून दोन दिवसांत पहिल्या सभेची तारीख आणि पीठासीन अधिकार्याची नियुक्तीची माहिती महापालिकेला कळविली जा
Jan 241 min read


भाजपने सत्तागणित जुळवले, काँग्रेसच्या हातून महापालिका गेली;प्रकाश आंबेडकरांनाही धक्का!
अकोला: आकोला महापालिकेत काँग्रेस विरोधी पक्षांनासोबत घेऊन सत्ता स्थापन करेल, अशी शक्यता होती. प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलून आपला सत्तेत वाटा नको मात्र भाजपला सत्ता स्थापनेपासून रोखू अशी चर्चा झाली. त्यासाठी आंबेडकर यांच्या निवास्थानी बैठक देखील झाली होती. त्यामुळे भाजप सत्तेपासून दूर रहाणार अशा चर्चा होत्या. मात्र,भाजपने गेम फिरवत मित्र पक्षांना सोबत घेत ‘शहर सुधार आघाडी’ स्थापन करून सत्ता आपल्याकडे राहिल, अशी खेळी केली आहे. अकोला महानगरपालिकेतील सत्तास्थापनेचे गणित जुळले अस
Jan 242 min read


राज्यात राजकारणाचा खेळ मांडला: अमरावतीत अभद्रयुती, सत्तेसाठी भाजपची चक्क एमआयएमशी गट्टी
अमरावती : महानगरपालिका निवडणुकीतून राज्यात अभद्र युती होताना दिसत आहे. अमरावतीमध्ये चक्क भाजपा आणि एमआयएमने युती केली असून दोन वेगवेगळ्याव विचारांचे पक्ष एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपरिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि एमआयमएमने एकत्र येत सभापती निवडून सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून हिंदुत्ववादी म्हणणार्या भाजपवर विरोधी पक्षांकडून जोरदार टीकेची झोड उठवली जात आहे. अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत भा
Jan 232 min read


मुुंबईसह राज्यातील 29 महापालीका महापौरपदाचे आरक्षण जाहीर मुंबई, पुणे सर्वसाधारण महिला तर ठाणे अनुसूचित जाती, कल्याण-डोंबिवली अनुसूचित जमातीखुल्या प्रवर्गासाठी
मुंबई: मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिकांच्या महापौरपदासाठीची सोडत आज जाहीर झाली आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. महापालिका सोडतीसाठी भाजपकडून महामंत्री राजेश शिरवडकर, ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनोज जामसुतकर, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितपवार गटाकडून आनंद परांजपे उपस्थित होते. दरम्यान 50 टक्के महिला आरक्षणाचे नियम लागू केल्याने राज्यातील 15 महापालिकांवर महिला राज असणार आहे. तर 1
Jan 232 min read


भाजप कार्यकर्त्यांनी स्वपक्षाच्या मंत्र्याची गाडी आडवली ,छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप-शिवसेना (शिंदे) युतीवरून राडा; मंत्री अतुल सावेंची युतीची घोषणा, युती तोडा युती तोडा ची कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये स्वबळावर लढल्यानंतर भाजप आता सत्ता स्थापन करणार आहे. त्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून जागावाटपावर रस्सीखेच सुरू झाली आहे. पण, अखेरीस आज दोन्ही पक्षांकडून एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपचे मंत्री अतुल सावेंनी युतीची घोषणा केली. पण, संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी युती तोडा, युती तोडा अशी घोषणाबाजी करत सावेंची गाडी अडवली. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची बैठक अखेरी
Jan 201 min read


भाजप कोणार्कचा हायहोल्टेज ड्राम, भिवंडीत 44 जणांना अटक 470 जणांवर गुन्हा दाखल
भिवंडी: भिवंडी महापालिकेतील कोणार्क विकास आघाडीचे विजय उमेदवार आणि माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात माजी महापौर प्रतिभा पाटील जखखमी झाल्या आहेत. जखमी प्रतिभा पाटील यांना उपचारासाठी रुग्णानलयात दाखल करण्यात आले आहे. हल्ला करणारे आमदार महेश चौघुलेंच्या मुलाचे समर्थक असल्याचा आरोप होत आहे. या हल्ल्यामुळे विलास पाटलांच्या समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या मांडला. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची माहिती समोर येत आहे. भाज
Jan 192 min read


राज्याच्या राजकारणात ‘बिहार भवन’चा भडका! मुंबईच्या महापौर निवडी आधीच सत्ताधारी विरोधकात जुंपली; वाद पेटणार?
मुंबई: बिहार सरकारने मुंबईत बिहार भवन उभारण्यासाठी निधीची तरतूद करत प्रकल्प उभारणीला मंजूरी दिली आहे. महापौर निवडीपूर्वीच सत्ताधारी महायुतीने मुंबईत मराठी माणसांच्या अस्मितेला नख लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक किल्लेदार यांनी मनसे आहे तो पर्यंत मुंबईत बिहार भवन होणार नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहूमत मिळाले. बहूमताचा आकडा पार करुनही महापौरपदावरून भाजप-शिव
Jan 192 min read


झेडपीच्या निवडणुकाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार! बारामतीच्या गोविंद बागेत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक; प्रदेशाध्यक्षाची मोठी घोषणा
बारामती: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. पुणे- पिंपरी चिंचवड हे बालेकिल्ले असलेल्याच शहरांमध्ये भाजपने पवार काका-पुतण्यांना धोबीपिछाड देत पुण्याचे कारभारी बदण्याचा पराक्रम केला. या मोठ्या पराभवानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. निकालानंतर दुसर्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी मोठी घ
Jan 181 min read


जिल्हापरिषद निवडणुकीत भाजपला एकटं पाडण्याची रणनिती दोन्ही शिवसेना एकत्र येणार, धाराशिवच्या नेत्यांमध्ये खलबतं
धाराशिव: राज्यात महानरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत 29 महापालिकांपैकी बहसंख्य महापालिकांत भाजपा हा क्रमांक एक नंबरचा पक्ष ठरला आहे. आता राज्यभरात महापौरपदाच्या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. एकीकडे महानगरपालिकेची निवडणुक संपलेली असताना आता दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी वातावरण तापले आहे. जिल्हा परिषद जिंकण्यासाठी आतापासूनच युती आणि आघाड्यांच्या राजकारणाने वेग पकडला आहे. असे असतानाच आता खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. मिळालेल्य
Jan 181 min read


शिवसेना शिंदे गटाकडून महापौरपदासाठी कोणताच प्रस्ताव आलेला नाही- मंत्री बावनकुळे
मुंबई: महानगरपालिकेच्या निवडणूकीनंतर महापौरपदावरुन राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असतानाही महासपौरपद कोणाकडे जाणार या बाबत अद्याप स्पष्टता नव्हती . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अडीच वर्षेे महापौरपद मिळणार, अशा चर्चांनी राजधानीत वातवरण तापले होते. मात्र आता या विषयावर भाजपकडून मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी “ बहुमत हे चंचल असतं, आज असतं उद्या नसतं” असे विधान करत मुंबईतील सत्तासमिकरण बदल
Jan 181 min read


राज्याच्या राजकारणात मोठा भुकंप?: मुंबईत शिवसेनेचं ‘ऑपरेशन टायगर’ , ठाकरे गटाचे दोन अंकी नगरसेवक नॉट रिचेबल; शिंदे गटाच्या संपर्कात!
मुंबई: महानगरपालीकेच्या निकालानंतर महापौरपदाचा संस्पेन्स कायम असताना एकनाथ शिंदे यांनी आपले विजयी नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले आहेत. एकनाथ शिंदेना ‘ऑपरेशन लोटस’ की ‘मातोश्री’ची भीती अशा चर्चा होत असतानाच आता पुन्हा मोठ्या राजकीय उलथापालथची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना शिंदे गट ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात येत असल्याची चर्चा आहे. ठाकरे सेनेचे दोन अंकी नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान विरोधी बाकावर बसण्यास उदासिन असलेले नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात असल्या
Jan 181 min read


मुंबईत महापौर कोण? मुख्यमंत्री फडणवीस देणार धक्का यांची नावे आघाडीवर
मुंबई: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अखेर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीचा पराभव झाला. भाजप आणि शिवसेनेने बहुमताचा आकडा पार करत मुंबईची सत्ता काबीज केली. त्यानंतर आता मुंबईचा महापौर कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुंबईत भाजप सार्वात मोठा पक्ष ठरल्याने भाजपचाच महापौर होणार, हे स्पष्टच आहे. मुंबईतील ठाकरेंची 25 वर्षांपासूनची सत्ता उखडून टाकण्यात अखेर भाजपला यश आले आहे. भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर मित्रपक्ष अस
Jan 171 min read


प्रवीण दरेकरांनी उत्तरभारतीयांचे आभार मानले , नव्या वादाला तोंड फुटणार?
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईकरांचे आभार मानले आहे. “ भाजप मुंबई तोडणार नाही, तर जोडणार” अशी ग्वाही देत त्यांनी विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. विशेषत: उत्तर भारतीय आणि हिंदीभाषक मतदारांनी भाजपवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांना कृतज्ञता व्यक्त केली. प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरे
Jan 171 min read


महापालिका निवडणूकीत असुद्दीन ओवेसीच्या एमआयएमची मुसंडी 95 पेक्षा आधिक जागा ताब्यात ; छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 33 नगरसेवक
राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे. या महापालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीने जबरदस्त कामगिरी केली आहे. मात्र, या निकालांमध्ये असुद्दीन औवेसी यांच्या एमआयएमच्या यशाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. राज्यातील महापालिकांच्या निकालांमध्ये 95 हून अधिक एमआयएमचे नगरसेवक निवडून आले आहेत. त्यात मुंबईत 4 जागांवर एमआयएमचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यात मानखुर्द- गोवंडी या भागात एमआयएमने समाजवादी पक्षाला मोठा धक्का दिला. त्यामुळे मुंबईत काँग्रेससह सपासाठी हा मोठा धक्का म
Jan 171 min read


महापालिकेतही ‘भाजप’च बाहूबली: मुंबई ठाकरेंच्या हातून निसटली, महापालिकेवर महायुतीची सत्ता
मुुंबई: महापालिका (इचउ) निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव झाला आहे. मागील 25 वर्षे सत्तेत बसलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई मकहापालिका निवडणुकीत भाजप (88) शिवसेना - णइढ (73), शिवसेना शिंदे गट (29) काँग्रेस 18 आणि मनसे (10) जागांवर आघाडीवंर आहे. इचउ चा निकाल हा भाजप-शिवसेना (शिंदे) महायुतीच्या बाजूने लागल्याने उद्धव ठाकरेंना गड राखण्यात अपयश आलं आहे. मुंबईतील ‘ मराठी माणुस’ हा मुद्दा ठकारेंनी उचलून
Jan 164 min read


मतदानापूर्वीच धुळ्यात बोगस मतदान कार्डाचा साठा सापडला रस्त्याच्या बाजूला हजारो बोगस मतदान कार्ड अढळले; राज्यभरात खळबळ
धुळे: महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच धुळे येथे हजारो बोगस मतदान कार्डाचा साठा आढळला आहे. यामुळे उमेदवारामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. हा साठा कोणाच्या मुळावर आणण्यासाठी आणला होता. याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस याप्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. निवडणूक अयोगाच्या आचारसंहिता कक्षाच्या पथकाला प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत. धुळे शहरातील देवपूर भागात हजारो मतदान कार्ड बेवारस अवस्थेत सापडले आहेत. या घटनेची म
Jan 141 min read


बिनविरोध निवडी विराधातली याचिका हायकोर्टाने फेटाळली मनसेचे अविनाश जाधव यांना धक्का
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांना धक्का देणारा निर्णय कोर्टाने दिला आहे. राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकींच्या मतदान प्रक्रियेेला अवघे काही तास उरले आहेत. मतदानापूर्वीच महापालिकांमध्ये 60 पेक्षा जास्त नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. दरम्यान या बिनविरोध निवडीला अविाश जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात अव्हान देणारी याचिका दाखल केली होती. मात्र, आज मा. न्यायालयाने अविनाश जाधव यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे दरम्यान वकील असीम सरोदे यांनी सकाळी
Jan 141 min read


ठाकरे बंधूंचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप प्रचारानंतर मतदारांच्या गाठीभेटीवर आक्षेप; तीन प्रश्नांचे कोडे मुळात ही मुभा मिळाली का?, दिली का?, हा कायदा बदलला का?
मुंबई: राज्यात 29 महानगरपालिका निवडणूकीच्या मतदानासाठी अवघे काही तास उरले आहेत. काल सायंकाळी 5:00 जाहिर प्रचार थंडावला असला तरी निवडणूक अयोगाने अटी व शर्थी घालून उमेदवारांना प्रचार संपल्यानंतर मतदारांच्या गाठीभेटीची परवानगी दिली आहे. शिवाय मतदान प्रक्रियेमध्ये आता ईव्हिएम सोबतच ‘पाडू’ यूनिट मशिन कार्यान्वीत केली आहे. निवडणूक अयोगाच्या या निर्णया विरोधात संताप व्यक्त करत आज राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी तातडीच्या पत्रकार परिषदेतून निवडणूक अयोगावार गंभीर आरोपक केले. महापालिका मत
Jan 142 min read


निवडणुकीच्या आखाड्यात मुख्यमंत्री ठरले महायुतीसाठी ‘सुपरमॅन’ राज्यभरात 77 कार्यक्रमांना हाजेरी, 37 सभा, रोडशोचा उडवला धडाका
मुंबई: 15 जानेवारी रोजी होणार्या राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीची प्रचाराची रणधुमाळी अखेर शांत झाली आहे. गेल्या 2 आठवड्यांपासूनसुरू असलेल्या या धामधुमीत सर्वच राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. या संपूर्ण प्रचार मोहिमेत सत्ताधारी महायुती आणि विशेषत: भारतीय जनता पार्टीचा प्रमुख चेहरा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा काना कोपरा पिंजून काढला. आता प्रचाराची सांगता झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या या झंझावाती दौर्याची आकडेवारी समोर आली
Jan 132 min read


अण्णामलाईची लूंगी काढणार्यास लाखाचे बक्षीस! शिवसेना (उबाठा) गटाच्या नेत्याचे आव्हान, ‘ हटाव लूंगी, बजाव पुंगी’ ची घोषणा
मुंबई: भाजप नेते अण्णामलाई यांनी मुंबईमध्ये येऊन वादग्रस्त वक्तव्य केलं. मुंबई ही केवळ महाराष्ट्राचीच नसून हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. असं विधान केलं होतं. अण्णामलाईच्या याच वक्तव्यावरून ऐन महापालिका निवडणुकीच्या प्रचारात वाद उफाळला. यावरून ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी अण्णामलाईची लुंगी काढणार्याला तब्बल एक लाखांचं बक्षीस देण्यात येईल अशी घोषणाच केली आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर अण्णामलाई मुंबईत एक पाय ठेवण्याच्या प्रयत्न करशील तर तुझे दोन्ही पाय तोडण्यात येतील आणि
Jan 131 min read
bottom of page