top of page


महापौरपदासाठी कोणतही तडजोड नाही, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे स्पष्ट निर्देश
मुंबई: मुंबई महापौरपदासाठी भाजपने कोणतीही तडजोड न करण्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे. सर्वाधिक जागा मिळवूनही मित्रपक्ष शिंदे गटासोबत सत्तावाटपाची चर्चा सुरू असताना, दिल्लीतील नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना कार्याकर्त्यांच्या भावनांचा आदर करत महापौरपद राखण्याचे निर्देश दिले आहेत. गुरुवार 22 रोजी महापौरपदाची सोडत आहे, त्यामुळे भाजपची ही भूमिका निर्णायक ठरणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक 89 जागा मिळवून भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष ठरला आहे. तर या निवडणुकीत त्या
Jan 212 min read


भाजप कार्यकर्त्यांनी स्वपक्षाच्या मंत्र्याची गाडी आडवली ,छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप-शिवसेना (शिंदे) युतीवरून राडा; मंत्री अतुल सावेंची युतीची घोषणा, युती तोडा युती तोडा ची कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये स्वबळावर लढल्यानंतर भाजप आता सत्ता स्थापन करणार आहे. त्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून जागावाटपावर रस्सीखेच सुरू झाली आहे. पण, अखेरीस आज दोन्ही पक्षांकडून एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपचे मंत्री अतुल सावेंनी युतीची घोषणा केली. पण, संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी युती तोडा, युती तोडा अशी घोषणाबाजी करत सावेंची गाडी अडवली. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची बैठक अखेरी
Jan 201 min read


भाजप कोणार्कचा हायहोल्टेज ड्राम, भिवंडीत 44 जणांना अटक 470 जणांवर गुन्हा दाखल
भिवंडी: भिवंडी महापालिकेतील कोणार्क विकास आघाडीचे विजय उमेदवार आणि माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात माजी महापौर प्रतिभा पाटील जखखमी झाल्या आहेत. जखमी प्रतिभा पाटील यांना उपचारासाठी रुग्णानलयात दाखल करण्यात आले आहे. हल्ला करणारे आमदार महेश चौघुलेंच्या मुलाचे समर्थक असल्याचा आरोप होत आहे. या हल्ल्यामुळे विलास पाटलांच्या समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या मांडला. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची माहिती समोर येत आहे. भाज
Jan 192 min read


जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलणार? राज्य निवडणुक अयोगाकडे याचिका दाखल
मुंबई : राज्यात दि.5 फब्रूवारी रोजी होणार्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाबांबत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून, किसान आर्मी व वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे एक महत्वपूर्ण याचिका दाखल केली आहे. धार्मिक कारणांमुळे लाखो मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने काही जिल्ह्यातील निवडणूक तारीख 06 किंवा 08 फेब्रूवारी रोजी घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात असलेल्या च
Jan 192 min read


राज्याच्या राजकारणात ‘बिहार भवन’चा भडका! मुंबईच्या महापौर निवडी आधीच सत्ताधारी विरोधकात जुंपली; वाद पेटणार?
मुंबई: बिहार सरकारने मुंबईत बिहार भवन उभारण्यासाठी निधीची तरतूद करत प्रकल्प उभारणीला मंजूरी दिली आहे. महापौर निवडीपूर्वीच सत्ताधारी महायुतीने मुंबईत मराठी माणसांच्या अस्मितेला नख लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक किल्लेदार यांनी मनसे आहे तो पर्यंत मुंबईत बिहार भवन होणार नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहूमत मिळाले. बहूमताचा आकडा पार करुनही महापौरपदावरून भाजप-शिव
Jan 192 min read


झेडपीच्या निवडणुकाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार! बारामतीच्या गोविंद बागेत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक; प्रदेशाध्यक्षाची मोठी घोषणा
बारामती: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. पुणे- पिंपरी चिंचवड हे बालेकिल्ले असलेल्याच शहरांमध्ये भाजपने पवार काका-पुतण्यांना धोबीपिछाड देत पुण्याचे कारभारी बदण्याचा पराक्रम केला. या मोठ्या पराभवानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. निकालानंतर दुसर्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी मोठी घ
Jan 181 min read


जिल्हापरिषद निवडणुकीत भाजपला एकटं पाडण्याची रणनिती दोन्ही शिवसेना एकत्र येणार, धाराशिवच्या नेत्यांमध्ये खलबतं
धाराशिव: राज्यात महानरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत 29 महापालिकांपैकी बहसंख्य महापालिकांत भाजपा हा क्रमांक एक नंबरचा पक्ष ठरला आहे. आता राज्यभरात महापौरपदाच्या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. एकीकडे महानगरपालिकेची निवडणुक संपलेली असताना आता दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी वातावरण तापले आहे. जिल्हा परिषद जिंकण्यासाठी आतापासूनच युती आणि आघाड्यांच्या राजकारणाने वेग पकडला आहे. असे असतानाच आता खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. मिळालेल्य
Jan 181 min read


राज्याच्या राजकारणात मोठा भुकंप?: मुंबईत शिवसेनेचं ‘ऑपरेशन टायगर’ , ठाकरे गटाचे दोन अंकी नगरसेवक नॉट रिचेबल; शिंदे गटाच्या संपर्कात!
मुंबई: महानगरपालीकेच्या निकालानंतर महापौरपदाचा संस्पेन्स कायम असताना एकनाथ शिंदे यांनी आपले विजयी नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले आहेत. एकनाथ शिंदेना ‘ऑपरेशन लोटस’ की ‘मातोश्री’ची भीती अशा चर्चा होत असतानाच आता पुन्हा मोठ्या राजकीय उलथापालथची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना शिंदे गट ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात येत असल्याची चर्चा आहे. ठाकरे सेनेचे दोन अंकी नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान विरोधी बाकावर बसण्यास उदासिन असलेले नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात असल्या
Jan 181 min read


मुंबईत महापौर कोण? मुख्यमंत्री फडणवीस देणार धक्का यांची नावे आघाडीवर
मुंबई: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अखेर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीचा पराभव झाला. भाजप आणि शिवसेनेने बहुमताचा आकडा पार करत मुंबईची सत्ता काबीज केली. त्यानंतर आता मुंबईचा महापौर कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुंबईत भाजप सार्वात मोठा पक्ष ठरल्याने भाजपचाच महापौर होणार, हे स्पष्टच आहे. मुंबईतील ठाकरेंची 25 वर्षांपासूनची सत्ता उखडून टाकण्यात अखेर भाजपला यश आले आहे. भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर मित्रपक्ष अस
Jan 171 min read


प्रवीण दरेकरांनी उत्तरभारतीयांचे आभार मानले , नव्या वादाला तोंड फुटणार?
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईकरांचे आभार मानले आहे. “ भाजप मुंबई तोडणार नाही, तर जोडणार” अशी ग्वाही देत त्यांनी विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. विशेषत: उत्तर भारतीय आणि हिंदीभाषक मतदारांनी भाजपवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांना कृतज्ञता व्यक्त केली. प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरे
Jan 171 min read


महापालिका निवडणूकीत असुद्दीन ओवेसीच्या एमआयएमची मुसंडी 95 पेक्षा आधिक जागा ताब्यात ; छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 33 नगरसेवक
राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे. या महापालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीने जबरदस्त कामगिरी केली आहे. मात्र, या निकालांमध्ये असुद्दीन औवेसी यांच्या एमआयएमच्या यशाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. राज्यातील महापालिकांच्या निकालांमध्ये 95 हून अधिक एमआयएमचे नगरसेवक निवडून आले आहेत. त्यात मुंबईत 4 जागांवर एमआयएमचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यात मानखुर्द- गोवंडी या भागात एमआयएमने समाजवादी पक्षाला मोठा धक्का दिला. त्यामुळे मुंबईत काँग्रेससह सपासाठी हा मोठा धक्का म
Jan 171 min read


मतदानापूर्वीच धुळ्यात बोगस मतदान कार्डाचा साठा सापडला रस्त्याच्या बाजूला हजारो बोगस मतदान कार्ड अढळले; राज्यभरात खळबळ
धुळे: महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच धुळे येथे हजारो बोगस मतदान कार्डाचा साठा आढळला आहे. यामुळे उमेदवारामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. हा साठा कोणाच्या मुळावर आणण्यासाठी आणला होता. याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस याप्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. निवडणूक अयोगाच्या आचारसंहिता कक्षाच्या पथकाला प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत. धुळे शहरातील देवपूर भागात हजारो मतदान कार्ड बेवारस अवस्थेत सापडले आहेत. या घटनेची म
Jan 141 min read


ठाकरे बंधूंचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप प्रचारानंतर मतदारांच्या गाठीभेटीवर आक्षेप; तीन प्रश्नांचे कोडे मुळात ही मुभा मिळाली का?, दिली का?, हा कायदा बदलला का?
मुंबई: राज्यात 29 महानगरपालिका निवडणूकीच्या मतदानासाठी अवघे काही तास उरले आहेत. काल सायंकाळी 5:00 जाहिर प्रचार थंडावला असला तरी निवडणूक अयोगाने अटी व शर्थी घालून उमेदवारांना प्रचार संपल्यानंतर मतदारांच्या गाठीभेटीची परवानगी दिली आहे. शिवाय मतदान प्रक्रियेमध्ये आता ईव्हिएम सोबतच ‘पाडू’ यूनिट मशिन कार्यान्वीत केली आहे. निवडणूक अयोगाच्या या निर्णया विरोधात संताप व्यक्त करत आज राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी तातडीच्या पत्रकार परिषदेतून निवडणूक अयोगावार गंभीर आरोपक केले. महापालिका मत
Jan 142 min read


निवडणुकीच्या आखाड्यात मुख्यमंत्री ठरले महायुतीसाठी ‘सुपरमॅन’ राज्यभरात 77 कार्यक्रमांना हाजेरी, 37 सभा, रोडशोचा उडवला धडाका
मुंबई: 15 जानेवारी रोजी होणार्या राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीची प्रचाराची रणधुमाळी अखेर शांत झाली आहे. गेल्या 2 आठवड्यांपासूनसुरू असलेल्या या धामधुमीत सर्वच राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. या संपूर्ण प्रचार मोहिमेत सत्ताधारी महायुती आणि विशेषत: भारतीय जनता पार्टीचा प्रमुख चेहरा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा काना कोपरा पिंजून काढला. आता प्रचाराची सांगता झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या या झंझावाती दौर्याची आकडेवारी समोर आली
Jan 132 min read


अण्णामलाईची लूंगी काढणार्यास लाखाचे बक्षीस! शिवसेना (उबाठा) गटाच्या नेत्याचे आव्हान, ‘ हटाव लूंगी, बजाव पुंगी’ ची घोषणा
मुंबई: भाजप नेते अण्णामलाई यांनी मुंबईमध्ये येऊन वादग्रस्त वक्तव्य केलं. मुंबई ही केवळ महाराष्ट्राचीच नसून हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. असं विधान केलं होतं. अण्णामलाईच्या याच वक्तव्यावरून ऐन महापालिका निवडणुकीच्या प्रचारात वाद उफाळला. यावरून ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी अण्णामलाईची लुंगी काढणार्याला तब्बल एक लाखांचं बक्षीस देण्यात येईल अशी घोषणाच केली आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर अण्णामलाई मुंबईत एक पाय ठेवण्याच्या प्रयत्न करशील तर तुझे दोन्ही पाय तोडण्यात येतील आणि
Jan 131 min read


जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगूल वाजले, दोन टप्यात निवडणुकां पहिल्या टप्प्यात 12 जिल्हापरिषदा 125 पंचायतसमित्यांचा समावेश
मुंबई: महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक अयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची घोषणा केली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी येत्या 5 फेब्रूवारी रेाजी मतदान होऊन 7 फेब्रूवारी रोजी निकाल लागणार आहे. गेल्या महिन्यातच (डिसेंबर 2025) महाराष्ट्रात विविध नगरपालिकांसाठी मतदान होऊन निवडणुका झाल्या. आता दोनच दिवसात राज्यातील महानगरपालिकांतील मतदान होत आहे. त्यामुळे या निव
Jan 132 min read


शिवतिर्थावरून फडणवीसांची ठाकरे बंधूंवर सडकून टीका ‘ लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत पोलखोल!
मुंबई: राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. येत्या 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात एकूण 29 महापालिकांसाठी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. यंदा पालिका निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेची निवडणुक केंद्रस्थानी आहे. यंदा पालिका निवडणुकीत मुंबई महानगपालिकेची निवडणुक केंद्रस्थानी आहे. मुंबई महापालिकेवर विजयी पताका फडकवण्यासाठी राज्यातील सर्व प्रमुख पक्ष कामाला लागले आहेत. जोमाने प्रचार करून मुंबईकरांना आकर्षित क
Jan 121 min read


राज्य सरकारला मोठा झटका: लाडकी बहीण योजनेला निवडणूक अयोगाचा प्रतिबंध?
मुंबई: महापालिका निवडणुकाच्या आचारसंहितेचा दाखला देत निवडणुक अयोगाने जानेवारी 2026 चा लाभ आधीच देण्यास बंदी घातली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे. मुंबईसह राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना ‘ लाडकी बहिण’ योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल असे स्पष्ट केले आहे. राज्य सरकारला जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे . त्याम
Jan 122 min read


मराठा मोर्चाचा मुंबईत ठाकरे बंधूंना पाठिंबा, जरांगे पाटीलांचे पोस्टद्वारे अवाहन
जालना: महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. मतदान अवघ्या दोन दिवसांवर आलं आहे . त्याआधी मुंबईतील राजकीय वातावरण जास्तच तापलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर जबरदस्त वातावरण नर्मिती झाली आहे. ठाकरे बंधूच्या सभेनंतर भाजपच्या नेत्यांकडून टीकेची झोड सुरू आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता कुणाची येणार अशी चर्चा सुरू झाली असतानाच, निवडणुकीसाठी मुंबईत मराठा मोर्चानं ठकारे बंधूंना पाठिंबा जाहीर केला आहे. मुंबईत मराठा बांधव हे ठाकरे बंधूंना मतदान करण्यासाठी आवाहन करणार
Jan 121 min read


तुषार आपटेचं भर चौकात मुंडके छाटा, भाजपने स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करताच कालीचरण महाराज कडाडले.
नाशिक: बदलापूरमधील एका शाळेतील लहान मुलींवर अत्याचार करण्यात आला होता. या अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या तुषार आपटे याला भाजपाने थेट स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्ती केले. त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तुषार आपटेच्या नियुक्तीला कालीचरण महाराजांनीही विरोध केला आहे. ‘तुषार आपटेला भार चौकात उभं करा आणि त्याचं मुंडके छाटा, असे विधान त्यांनी केले आहे. बदलापूर-कुळगाव नगरपरिषदेची काही दिवसांपूर्वी निवडणूक पार पडली. या निवडणुकीनंतर भाजपाने घेतलेल्या एका निर्णयाने संतापाची लाट
Jan 101 min read
bottom of page