top of page


त्यांच्याकडे सत्तेची, पैशाची मस्ती, आमच्याकडे निष्ठेची शक्ती ..हिंमत असेल तर, अहमदाबादचे नामांतर करून दाखवा , छत्रपती संभाजीनगरच्या विराट सभेतून उद्धव ठाकरेंची भाजपसह फडणवीसांवर सडकून टीका
छत्रपती संभाजीनगर: छ. संभाजीनगर महानगरपालिका निवडणुक शिवसेना-मनसे युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजीत विराट सभेस संबोधीत करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुक प्रचारार्थ येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या खडकेश्वर मैदानामध्ये उद्धव ठाकरे यांची आज (दि.10 जानेवारी) सभा पार पडली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरूवात आजची सभा अभूतपूर्व आहे, मला 1988 च्या हिंदूह्रदय
Jan 102 min read


भाजप हा उपर्यांचा आणि दलालांचा पक्ष, नाशिकमध्ये ठाकरे बंधू कडाडले
नाशिक: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीची पहिली संयुक्त सभा पार पाडली. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली. “ 1952 साली जन्मलेल्या पक्षाला आज पोरं भाड्याने घ्यावी लागत आहेत” अशा शब्दांत राज ठाकरेंनी भाजपच्या सद्यस्थितीवर हल्लाबोल केला, तर “ उद्या हे रावणालाही पक्षात प्रवेश देतील” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. महापालिका
Jan 92 min read


ईडीच्या धाडीत निवडणुक रणनीतीची कागदपत्र जप्त- ममता बॅनर्जींना धक्का!
आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या मुख्यमंत्री बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुरूवारी पहाटे सहा वाजता तृणमूल काँग्रेसची रणनीती आखणारी संस्था आयपॅक आणि तिचे संचालक प्रतीक जैन यांच्या ठिकाणांवर धाड टाकण्यात आली. ईडीच्या धाडीनंतर ममता बॅनर्जी त्या ठिकाणी पोहोचल्या आणि एक हिरव्या रंगाची फाइल घेऊन बाहेर पडल्या. त्यांनी पत्रकार परिषद घेेत गंभीर आरोप करत पक्षाचे निवडणुक रणनीती संदर्भातील सर्व डेटा जप्त केल्याचे सांगितले. उमेदवारांच्या या
Jan 91 min read


अतिवृष्टीची नुकसान भरपाई, मनरेगाच्या कामात भेदभाव करू नका
आष्टी मतदारसंघातील प्रशासकीय यंत्रणेणे कोण्या एका नेत्याचे बाहुले बनू नये - माजी आमदार धोंडे, आजबे यांचा इशारा मतदारसंघात कायदा सुव्यवस्था ढासळली; हल्ले करणार्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत -भाऊसाहेब लटपटेचा आरोप आष्टी विधानसभा मतदार संघातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मीळाली नाही. आणि मनरेगांतर्गत कामांत शासकीय अधिकाऱ्याकडून व कर्मचाऱ्याकडून भेदभाव केला जात आहे.हा भेदभाव कोणाच्यातरी सांगण्यावर होत आहे.सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी भेदभाव करू नये. आष्टी,पाटोदा,शिर
Jan 92 min read


घुसखोरांना शोधून डिपोर्ट करू, चेन्नइत महापौर जसा तमिळ, तसा मुंबईचा महापौरही मराठी, हिंदूच!- मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई: मुंबईचा महापौर कोण असावा यात काहीच शंका नाही. तो मराठीच असेल आणि हिंदूच असेल! ” अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीचे धोरण स्पष्ट केले. फडणवीस यांनी हिंदुत्व, मराठी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्यावरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. आजतकच्या एका वाहिणीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. बीएमसीच्या महापौरपदी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “ चेन्नईत जसा तमिळ महापौर होतो, तसा मुंबईत मराठी महापौरच होणार. ज्य
Jan 81 min read


लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही, रविंद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर रितेश देशमुखांचा पलटवार
लातूर : दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही.. जय महाराष्ट्र ” असं म्हणत दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पुत्र आणि अभिनेता रितेश देशमुख याने भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचं नाव न घेता सणसणीत प्रत्युत्तर दिलंय लातूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी रविंद्र चव्हाण सोमवारी लातूरमध्ये आले होते. एका प्रचारासभेत ते लातूरच्या राजकारणाविषयी बोलत होते. यावेळी बोलताना, “ खरं तर आल्या स
Jan 61 min read


तुमको मिर्ची लगी तो मै क्या करू.. धुळ्यातून मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
धुळे: राज्यात होत असलेल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये जवळपास 68 उमेदवार बिनविरोध आल्याच्या मुद्दयावरून राजकीय रणकंदन सुरू आहे. ज्या प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, अशा ठिकाणच्या निवडणुका रद्द करून त्या प्रभागांमध्ये नव्याने निवडणूक राबवावी, अशी मागणी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच निवडणूक अयोग भाजपाच्या सांगण्यानुसार काम करत असल्याचे आरोपही उद्धवसेनेकडून सातत्याने करण्यात येत आहेत. याच मुद्दयावरून आज देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्यात बोल
Jan 61 min read


लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, रविंद्र चव्हाणांचे वादग्रस्त वक्तव्य
लातूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. लातुरमध्ये कार्यकर्ता मेळाव्यास संबोधीत करताना रविंद्र चव्हाण यांनी स्व. विलासराव देशमुख यांच्या बाबत वक्तव्य केल्याने मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करताना दिसून येत आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार, आणि आता स्व. विलासराव देशमुख यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. लातुरमध्ये आज क
Jan 51 min read


नील सोमय्याच्या वार्डात अपक्ष उमेदवारास ठाकरे, पवारांचा पाठिंबा !
मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या हे मुलुंडच्या वार्ड क्रमांक 107 मधून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. नील सोमय्या यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकउून उमेदवार देण्यात आलेला नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. वॉर्ड क्रमांक 107 ची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटली होती. मात्र, राष्ट्रवादीचा अर्ज बाद ठरला होता. त्यामुळे नील सोमय्या यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे बालले जात होते. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे दिनेश जाधव यांनी वॉर्ड 107 म
Jan 52 min read


मुंबईत श्रेय चोरणारी टोळी, यात अबोल बालकांचाही समावेश- मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराला आज सुरूवात झाली. वरळीत महायुतीची प्रचार सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर सडकून टीका केली. काही लोक आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत असा आरोप करताना मुख्यमंत्र्यांनी केला आहे. तसेच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचा उल्लेख अबोध बालके असा केला. तसेच इतरही अनेक मुद्यांवरून ठकारेंवर निशाना साधला. प्रचार सभेला संबोधीत करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आज मुंबईत महायुतीच्या प्रचाराचा नारळ आपण फोडला आहे, आज
Jan 42 min read


महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वीच एकनाथ शिंदेंना मुंबईत धक्का
मुंबई: महानगरपालीका निवडणुकीच्या मतदानापूर्वी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. गोरेगावमधील 200 हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. उमेदवारी आणि पदांच्या वाटपावरून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचा हा सामूहिक राजीनामा आहे. मुंबई गोरेगाव आणि दिंडोशी भागात विभागप्रमुखांसह 200 हून अधकि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. या वादाचा मुख्य मुद्दा वार्ड क्रमांक 54 आहे, जो शिंदे गटाकडे होता. परंतु
Jan 41 min read


ठाकरे बंधूंचा संयुक्त वचननामा कायद्याच्या कचाट्यात?
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वचनामा प्रसिद्ध करण्यात आला. स्वत: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यासंनी शिवसेना भवनात एकत्रित येत ‘ मुंबईसाठी शिवशक्तीचा वचननामा’ मांडला. ‘ ठाकरेंचा शब्द ’ अशी टॅगलाईन असलेल्या या वचननाम्यामध्ये अनेक अश्वासने देण्यात आली आहेत. ठाकरे बंधूंनी वचननामा प्रसिद्ध केल्यानंतर काही मिनिटांतच त्यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ‘ आरोपत्रा’ च्या माध्यमातून प्रहार केले. त्यानं
Jan 41 min read


मुंबईकर उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवणार नाहीत- मंत्री बावनकुळे
मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संयुक्त वचननामा प्रकाशित केला. महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील महापौर मराठीच होणार, असा निर्धार त्यांनी केला. ठाकरे बंधूंच्या वचननामावर भाजपने पहिली प्रतिक्रीया दिली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.“ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकासाचे मॉडेल उद्धव ठाकरे कधीच पुढे नेऊ शकत नाहीत. फडणवीस यांनी मुंबईचे 2047 चे व्हिजन तयार के
Jan 41 min read


शिवसेना भवनामध्ये ठाकरे बंधूनी केला संयुक्त ‘वचनामा’ प्रकाशित
मुंबई: मुंबईसह राज्यभरातील महापालिकांच्या निवडणुकीमुळे राजकीय वातवरण तापले असतानाच आज (दि.4) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधू संयुक्त वचननामा प्रकाशित केला. यावेळी दोन्ही नेत्यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेला नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. महापालिका निवडणूकीच्या प्रचारासाठी काही दिवसांचाच अवधी उरला असतानाच ‘ ठाकरे बॅ्रंंड’ प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. आज शिवसेना भवन ये
Jan 42 min read


राज्यात भाजप सरकारमुळेच लोकशाहीला गालबोट; निवडणुकीत गुंडगिरी, धमक्या, ब्लॅकमेलिंगचा असुरी प्रयोग- संजय राऊत
मुंबई : राज्यात भाजप सरकारमुळे लोशाहीला गालबोट लागत आहे, तर राज्यातील महापालिका निवडणुकांत व मुंबईतील निवडणुकांत धमक्या, ब्लॅकमेलिंग दहशतीचे गैरप्रकार सुरूच आहेत. कल्याण- डोंबिवलीत मोठा गोंधळ झाल्याचा गंभीर आरोप करत खासदार संजय राऊत यांनी बिनविरोध मिरवणूकां विषयी त्यांनी सरकावर तीव्र टीका केली आहे. म्हणाले. राज्यातील 29 महापालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना पक्षाचे एकून 66 नगरसेवक बिनविरोध घोषीत झाले आहेत. शिवाय राष्ट्रवादी ( अजित पवार) पक्षाचेही दोन नगरसेवक बिनविरोध घोषीत झाले
Jan 32 min read


विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या अडचणी वाढल्या, संजय राऊतांकडून व्हिडिओ व्हायरल.
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजप- शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेना- मनसेमध्ये थेट लढत होत आहे. त्यासाठी या पक्षांमध्ये नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. खासदार संजय राऊत, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नार्वेकर यांनी उमेदवारांना धमक्या दिल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडिओच सोशल मिडियात पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये नार्वेकर आणि माजी
Jan 31 min read


गुंडगिरीमुळे बिनविरोध 65 नगरसेवक झाले - इम्तियाज जलील
छत्रपती संभाजीनगर : एमआयम नेते इम्तियाज जलील यांनी आमदार संजय शिरसाट यांनी एमआयएमवर केलेल्या “ पैशांची दलाली” च्या आरोपांना जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. जलील यांनी जालन्यात मुख्यमंत्र्यांकडून एका युवतीचा बुरखा काढल्याच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला, याला निंदनीय कृत्य संबोधत कारवाईची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याने केलेल्या टिप्पणीवरही त्यांनी आक्षेप घेतला. शिरसाट यांच्यावर पलटवार करताना जलील यांनी, “ खोक्यामध्ये विकणारे लोक माझ्यावर बोट दाखवणार का?” असा
Jan 31 min read


मंगेश काळोखे हत्या प्रकरण, सुपारी देवूनच घडवली हत्या !
खोपोली : खोपोलीतील शिवसेना नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणात मोठ्या घडामोडी समोर येत आहेत. अशातच आज नवव्या दिवशी त्यांच्या दोन्ही मुली आणि पुतण्या पहिल्यांदाच बोलता झाला असून त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. दिवंगेत काळोखे यांच्या मुलींनीतर त्यांनाही मारण्याचा प्लॅन हल्लेखोरांचा होता असा दावा केला आहे. या दाव्यानंतर रागडमध्ये एकच खळबळ उडाली असतानाच आता रागडच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी मोठी माहिती समोर आणली आहे. त्यांनी या प्रकरणात आतापर्य
Jan 32 min read


बिनविरोध आलेले नगरसेवक आयोगाच्या रडावर! निवडणूक आयुक्तांच्या निवडणूक निर्णय अधिकार्यांना सूचना
मुंबई: राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रक्रियेत संशयास्पद बाबी घडल्याचा आरोप करत विरोधकांनी जोरदार टीका केल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. छाननीनंतर अर्ज वैध ठरल्यापासून राज्यभरातून सत्ताधारी नेत्यांकडून तसेच यंत्रणांकडून अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हाधिकार्यांकडे करण्यात येत आहेत. त्या पार्श्
Jan 32 min read


महापालिकां निवडणुक: बंडखोर कोणाचा खेळ बिघडवणार?
मुंबई: महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. सर्व राजकीय पक्षांमध्ये तिकीट न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी उफाळून आल्याचे दिसून आले. यात भाजपमधल्या नाराजांची संख्या अधिक होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नाराज कार्यकर्त्यांना फोन करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, यातल्या बहुतेकांनी त्यांचे उमेदवारी अर्ज घेतले. पण काही ठिकाणी नाराज मागे हटले नाहीत, त्यामुळे आता निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. मुंबईमध्ये आध
Jan 21 min read
bottom of page