top of page


बारामतीत 6 तर राहुरीतील चार उमेदवारांनी घेतली माघार पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी; पार्थ पवार पाठोपाठ नितेश राणेंचा काँग्रेसवर निशाना
बारामती/ राहुरी: राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. मात्र, काँग्रेसने कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, अशी भूमिका धेतल्याने बारामतीत पोटनिरवडणुक होणार, मतदान होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तरीही उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची दिवशी आणखी काही घडामोडीची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. त्यातच आज बारामतीच्या पोटनिवडणुकीत 6 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील रा
Apr 82 min read


बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांचा मोठ्या शक्तीप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनाने आज सोमवारी (दि.6) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, चंद्रशेखर बावनकुळे, धनंजय मुंडे,चेतन तुपे, अनिल पाटील, सना मलिक आदींसह महायुतीचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज सोमवार (दि.6) शेवटचा दिवस. महाविक
Apr 62 min read


बारामती पोटनिवडणुक बिनविरोधाची आशा धुसरच ! सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार रिंगणात; आतापर्यंत 17 उमेदवारी अर्ज दाखल
बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणुक बिनविरोध होईल असा कयास होता, अजितदादांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाबद्दल प्रचंड सहानुभूतीमुळे जवळपास ही पोटनिवडणुक बिनविरोध होणार तसे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने संकेत दिले होते. मात्र, आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आल्याने बारामती पोटनिवडणुकीची बिनविरोधची अशा मावळली आहे. बारामती विधानसभेची पो
Apr 52 min read


महिनाभरात राज्यभर मोफत विज, गोव्यात अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा
पणजी/ पोंडा: आम आदमी पार्टीने गोव्यातील पोेंडा पोटनिवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली. ‘आप’चे राष्ट्रीय संयोजन अरविंद केजरीवाल यांनी पोंडा येथे पक्षाचे उमेदवार गीतेश यांच्या समर्थनार्थ एका ‘परिवर्तन सभे’ ला संबोधित केले. त्यांनी गोव्याच्या जनतेला थेट आवाहन केले, “ 2027 च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ ला संधी द्या, आणि आमचे सरकार स्थापन होताच, आम्ही एका महिन्यात संपूर्ण गोव्यात विज मोफत करण्याचे अश्वासन अरविंद केजीरीवाल यांनी यावेळी दिले. पोेंडा येथे पक्षाचे उमेदवार गीतेश नाईक यांच्य
Apr 22 min read


निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या दीड तास आधीच, ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या दीड तास आधी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुजारी आणि मुएझिन (प्रार्थनेसाठी अजान देणारे) यांच्या मानधनात 500 रुपये ने वाढ केली. आता त्यांना दरमहा 2000 रुपये मिळतील. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी दुपारी एका पोस्टमध्ये लिहिले की, “ समुदायांचे आध्यात्मिक आणि सामाजिक जीवन राखण्यात पुजारी आणि मुएझिन महत्वाची भूमिका बाजावतात. सरकारने मानधन योजनेअंतर्गत पुजारी आणि मुएझिनसाठी सर्व नवीन अर्जांना मान्यता दिली आहे. ममता बॅनर्
Mar 152 min read


पश्चिम बंगालसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर केंद्रीय निवडणुक अयोगाची घोषणा; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
नवीदिल्ली : महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा गुलाल उधळून झाल्यानंतर आता देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत निवडणुकांची घोषणा केली. देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालसह तामिळनाडू, आसाम, पुद्दुचेरी आणि केरल राज्याच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली, पाच राज्यांच्या निवडणुकांसह महाराष्ट्रातील
Mar 152 min read


मुदत संपलेल्या 14 हजार ग्रामपंचायतीवर सरपंचच प्रशासक; राज्य सरकारचा निर्णय
मुंबई : राज्य सरकारने मुदत संपलेल्या 14 हजार ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. ग्रामविकास विभागाचे अवर सचिव बाबुराव म्हादू आसोले यांनी याबाबतचे आदेश सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत. राज्यातील नगरपालिका नगरपंचायत, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपल्यानंतर ग्रामपंचायतीचा धुराळा उडणार आहे. या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडून महत्वाचा निर्णय घेतला आहे. रा
Feb 211 min read


भिवंडी महापालिकेत सत्तानाट्य उफाळले; भाजपचे नगरसेवक फुटले, महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या
भिवंडी: भिवंडीत महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीला वेगळेच वळण मिळाले आहे. महापौरपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपने आपला उमेदवार बदलला आहे. त्यानंतर भाजपमध्ये दोन गट पडल्याने आता भिवंडी महापालिकेत महापौर कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. भाजपने यापूर्वी नारायण चौधरी यांना भाजपच्या महापौरपदाचे अधिकृत उमेदवार घोषित केले होते. नारायण चौधरी यांना भाजपकउून महापौर पदासाठी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. मात्र, महापौरपदाच्या निवडणुकीला वेगळेच वळण लागले असून भाजपन
Feb 192 min read


तेलंगणात ‘स्थानिक’ निवडणुकीत भाजपचा धुव्वा! ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान, काँग्रेसची मुसंडी; राहुल गांधींच मोठं विधान..
तेलंगणात 123 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात आल्या. त्यामुळे त्या ठिकाणच्या निकालाची उत्सुकता सर्वाना लागून राहिली होती. एकीकडे महाराष्ट्रात ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली जात होती. मतदान प्रक्रियेतील गैरप्रकार दूर करावेत मतचोरिच्या विरोधात महाराष्ट्रातील विरोध पक्षांनी निवडणूक अयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निरवडणुकीत ईव्हीएमवर झालेल्या मतदानात भजापला
Feb 142 min read


जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपची मुसंडी अजितदादांच्या राष्ट्रवादीने गड राखला; शिवसेना (शिंदे) गटाची शंभरी पार
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांचा निकाल नुताच जाहीर झाला आहे. एकूण 7 हजार 438 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. 12 जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी शनिवारी मतदान झालं. महापालिका निवडणुकाप्रमाणेच याही निवडणुकीत भाजप हा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. अजित दादाच्या राष्ट्रवादीने पुणे जिल्हा परिषदेवर निर्वीवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे, तर शिवसेना शिंदे गटाने शंभरी पार केली आहे. राज्यातील जिल्हा परिषदांच्या निकालावर आता मुख्यमंत्री दे
Feb 92 min read


पुण्याच्या नवीन महापौरपदी मंजुषा नागपुरे
पुणे: पुणे महानगरपालिकेत पुण्याच्या नवीन महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. काँंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. उच्चशिक्षित आणि अनुभवी नगरसेवक असलेल्या मंजुषा नागपुुरे पुण्यातील रोड परिसरातील आहेत. आरपीय (आठवले) चे परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. जवळजवळ चार वर्षाच्या कालावधीनंतर पुण्याला नवा महापौर मिळाला आहे. भाजपच्या या विजयाने शहराच्या राजकारणात पक्
Feb 91 min read


झेडपी निवडणुकीत ईव्हिएम मशिन धाब्यावर! सोलापूरच्या मोहोळमधील प्रकार; प्रशासनाचा मशिन ‘राखीव’ असल्याचा खुलासा
सोलापूर : सोलापूरात जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर ईव्हिएम मशिन थेट हॉटेलवर सापडल्या. मतदान झाल्यानंतर चक्क हॉटेलवर ईव्हिएम सापल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातारण निर्माण झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनंतर ज्या ईव्हिएम मशिन स्ट्राँग रुममध्ये असायला हव्या होत्या, त्या हॉटेलबाहेर सापडल्यानं ईव्हिएमध्ये हेराफेरी करण्यासाठी
Feb 81 min read


पश्चिम बंगालाच्या मुख्यमंत्र्यानी पदर खोचून कोर्टात केला युक्तीवाद मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी इतिहास घडवला : सरन्यायाधिशासमोरच निवडणूक आयोगाला दाखवला हिसका !
नवी दिल्ली : बिहारनंतर आता पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी देशाचे राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे. भाजपकडून या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. तर मुख्यमंत्रीपदासह राजकारणाचा तगडा अनुभव असलेल्या ममता बॅनर्जी सहजासहजी हार मानणार्या नसून भाजपचं आव्हान मोडीत काढण्यात त्यांचा हातखंडा मानला जातो. पण आता याच ममता बॅनर्जींनी इतिहास घडवला आहे. मुख्यमंत्र
Feb 43 min read


झेडपीलाही महायुतीचा बिनविरोध पॅटर्न जोमात: जिल्हा परिषदेत 5 आणि पंचायत समितीत 6 उमेदवार बिनविरोध
सिंधुदूर्ग: महापालिका निवडणुकानंतर आता जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजप महायुतीचा बिनविरोध पॅटर्न पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप महायुतीचे तब्बल 11 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यामध्ये भाजपचे 10 आणि शिंदेंच्या शिवसेनेचा 1 उमेदवार बिनविरोध आहे. जिल्हा परिषद गटातून 5 उमेदवार बिनविरोध असून उमेदवार पंचायत समिती गणातून बिनविरोध आहेत. त्यामुळे महायुतीने महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही बिनविरोध पॅटर्न
Jan 242 min read


जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलणार? राज्य निवडणुक अयोगाकडे याचिका दाखल
मुंबई : राज्यात दि.5 फब्रूवारी रोजी होणार्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाबांबत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून, किसान आर्मी व वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे एक महत्वपूर्ण याचिका दाखल केली आहे. धार्मिक कारणांमुळे लाखो मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने काही जिल्ह्यातील निवडणूक तारीख 06 किंवा 08 फेब्रूवारी रोजी घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात असलेल्या च
Jan 192 min read


मतदार याद्यातील घोळावरुन सुप्रीम कोर्टाची आयोगाला ताकीद 1.25 कोटी मतदारांची यादी सार्वजनिक करण्याचे आदेश
नवी दिल्ली: मतदार यादीतून नाव वगळण्यात आलं असल्यास त्याची स्वतंत्र यादी जाहीर करावी, असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन(एसआयआर) प्रक्रियेवर सुनावणी करताना न्यायालयाने निवडणूक अयोगाला मोठा धक्का दिला आहे. सुप्रीम कोर्टाने आयोगाला आदेश दिला की‘ तार्किक गडबड’ असल्याच्या कारणावरून आक्षेप घेण्यात आलेल्या 2.25 कोटी मतदारांची संपूर्ण यादी सार्वजनिक करण्यात यावी. मुख्य न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची
Jan 192 min read


राज्याच्या राजकारणात मोठा भुकंप?: मुंबईत शिवसेनेचं ‘ऑपरेशन टायगर’ , ठाकरे गटाचे दोन अंकी नगरसेवक नॉट रिचेबल; शिंदे गटाच्या संपर्कात!
मुंबई: महानगरपालीकेच्या निकालानंतर महापौरपदाचा संस्पेन्स कायम असताना एकनाथ शिंदे यांनी आपले विजयी नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले आहेत. एकनाथ शिंदेना ‘ऑपरेशन लोटस’ की ‘मातोश्री’ची भीती अशा चर्चा होत असतानाच आता पुन्हा मोठ्या राजकीय उलथापालथची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना शिंदे गट ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात येत असल्याची चर्चा आहे. ठाकरे सेनेचे दोन अंकी नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान विरोधी बाकावर बसण्यास उदासिन असलेले नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात असल्या
Jan 181 min read


महापालिकेतही ‘भाजप’च बाहूबली: मुंबई ठाकरेंच्या हातून निसटली, महापालिकेवर महायुतीची सत्ता
मुुंबई: महापालिका (इचउ) निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव झाला आहे. मागील 25 वर्षे सत्तेत बसलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई मकहापालिका निवडणुकीत भाजप (88) शिवसेना - णइढ (73), शिवसेना शिंदे गट (29) काँग्रेस 18 आणि मनसे (10) जागांवर आघाडीवंर आहे. इचउ चा निकाल हा भाजप-शिवसेना (शिंदे) महायुतीच्या बाजूने लागल्याने उद्धव ठाकरेंना गड राखण्यात अपयश आलं आहे. मुंबईतील ‘ मराठी माणुस’ हा मुद्दा ठकारेंनी उचलून
Jan 164 min read


मतदानापूर्वीच धुळ्यात बोगस मतदान कार्डाचा साठा सापडला रस्त्याच्या बाजूला हजारो बोगस मतदान कार्ड अढळले; राज्यभरात खळबळ
धुळे: महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच धुळे येथे हजारो बोगस मतदान कार्डाचा साठा आढळला आहे. यामुळे उमेदवारामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. हा साठा कोणाच्या मुळावर आणण्यासाठी आणला होता. याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस याप्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. निवडणूक अयोगाच्या आचारसंहिता कक्षाच्या पथकाला प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत. धुळे शहरातील देवपूर भागात हजारो मतदान कार्ड बेवारस अवस्थेत सापडले आहेत. या घटनेची म
Jan 141 min read


ठाकरे बंधूंचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप प्रचारानंतर मतदारांच्या गाठीभेटीवर आक्षेप; तीन प्रश्नांचे कोडे मुळात ही मुभा मिळाली का?, दिली का?, हा कायदा बदलला का?
मुंबई: राज्यात 29 महानगरपालिका निवडणूकीच्या मतदानासाठी अवघे काही तास उरले आहेत. काल सायंकाळी 5:00 जाहिर प्रचार थंडावला असला तरी निवडणूक अयोगाने अटी व शर्थी घालून उमेदवारांना प्रचार संपल्यानंतर मतदारांच्या गाठीभेटीची परवानगी दिली आहे. शिवाय मतदान प्रक्रियेमध्ये आता ईव्हिएम सोबतच ‘पाडू’ यूनिट मशिन कार्यान्वीत केली आहे. निवडणूक अयोगाच्या या निर्णया विरोधात संताप व्यक्त करत आज राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी तातडीच्या पत्रकार परिषदेतून निवडणूक अयोगावार गंभीर आरोपक केले. महापालिका मत
Jan 142 min read
bottom of page