top of page


तेलंगणात ‘स्थानिक’ निवडणुकीत भाजपचा धुव्वा! ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान, काँग्रेसची मुसंडी; राहुल गांधींच मोठं विधान..
तेलंगणात 123 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात आल्या. त्यामुळे त्या ठिकाणच्या निकालाची उत्सुकता सर्वाना लागून राहिली होती. एकीकडे महाराष्ट्रात ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली जात होती. मतदान प्रक्रियेतील गैरप्रकार दूर करावेत मतचोरिच्या विरोधात महाराष्ट्रातील विरोध पक्षांनी निवडणूक अयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निरवडणुकीत ईव्हीएमवर झालेल्या मतदानात भजापला
Feb 142 min read


लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींविरोधात अपात्रतेचा प्रस्ताव सभागृहात सत्ताधार्यांना घाम फोडणार्या राहुल गांधी विरोधात भाजप खासदार निशिकांत दुबेंनी मांडला प्रस्ताव
नवी दिल्ली : यंदाच्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरुवातीपासूनच विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी विविध मुद्यांवरून सत्ताधारी एनडीए ला जेरीस आणून सोडलं आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांमुळे अनेकदा लोकसभाच कामकाज तहकुब करावं लागलं होतं. त्यानंतर कालच्या अपल्या भाषणात त्यांनी मोदी सरकारवर अनेक गंभीर आरोप करत यांनी देश विकायला काढला आहे, अशा शब्दांत सरकारवर घणाघाती टीका केली होती. यापार्श्वभूमीवर राहुल गांधीविरोधात सत्ताधारी एनडीएच्या खासदारांकडून अपात्रतेचा प्रस्ताव आण
Feb 122 min read


पेंग्विन इंडिया खोटं बोलत आहे,..मला लष्करप्रमुख नरवणे यांच्यावर विश्वास - राहुल गांधी
नवी दिल्ली: माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांचे आत्मचरित्र “ फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी” ने देशात अभूतपूर्व राजकीय गोंधळ निर्माण केला आहे. संसदेपासून रस्त्यांपर्यंत या गोंधळाच्या केंद्रस्थानी राहुल गांधी यांनी सभागृहात पुस्तकाची प्रत दाखवून त्याला “ सत्याचा दस्तऐवज ” असे संबोधून स्वत:ला दूर करत असताना, जनरल नरवणे यांच्या जुन्या सोशल मीडिया पोस्टने हा दावा उघड केला आहे. या विषयावर प्रश्न असा आहे की, जर पुस्तक प्रकाशित झालेच नसेल, तर माजी लष्करप्रमुखांनी स्वत:त्याच्या “ उपलब
Feb 102 min read


उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारला: अजिदादांच्या दालनात प्रवेश करताच सुनेत्रा पवारांची कृती बघून सगळेच भावूक ; पार्थ पवारांच्या डोळ्यांत अश्रू तरळले
मुंबई : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी आज दि. 10 फेब्रूवारी 2026 रोजी मंत्रालयात अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पार्थ पवार यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदाची जबाबद
Feb 101 min read


जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपची मुसंडी अजितदादांच्या राष्ट्रवादीने गड राखला; शिवसेना (शिंदे) गटाची शंभरी पार
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांचा निकाल नुताच जाहीर झाला आहे. एकूण 7 हजार 438 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. 12 जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी शनिवारी मतदान झालं. महापालिका निवडणुकाप्रमाणेच याही निवडणुकीत भाजप हा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. अजित दादाच्या राष्ट्रवादीने पुणे जिल्हा परिषदेवर निर्वीवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे, तर शिवसेना शिंदे गटाने शंभरी पार केली आहे. राज्यातील जिल्हा परिषदांच्या निकालावर आता मुख्यमंत्री दे
Feb 92 min read


पुण्याच्या नवीन महापौरपदी मंजुषा नागपुरे
पुणे: पुणे महानगरपालिकेत पुण्याच्या नवीन महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. काँंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. उच्चशिक्षित आणि अनुभवी नगरसेवक असलेल्या मंजुषा नागपुुरे पुण्यातील रोड परिसरातील आहेत. आरपीय (आठवले) चे परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. जवळजवळ चार वर्षाच्या कालावधीनंतर पुण्याला नवा महापौर मिळाला आहे. भाजपच्या या विजयाने शहराच्या राजकारणात पक्
Feb 91 min read


झेडपी निवडणुकीत ईव्हिएम मशिन धाब्यावर! सोलापूरच्या मोहोळमधील प्रकार; प्रशासनाचा मशिन ‘राखीव’ असल्याचा खुलासा
सोलापूर : सोलापूरात जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर ईव्हिएम मशिन थेट हॉटेलवर सापडल्या. मतदान झाल्यानंतर चक्क हॉटेलवर ईव्हिएम सापल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातारण निर्माण झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनंतर ज्या ईव्हिएम मशिन स्ट्राँग रुममध्ये असायला हव्या होत्या, त्या हॉटेलबाहेर सापडल्यानं ईव्हिएमध्ये हेराफेरी करण्यासाठी
Feb 81 min read


एपस्टिन फाइल्सप्रकरणी कल्याणमध्ये काँग्रेसचा चक्का जाम; पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी
कल्याण: सध्या जगभर एपस्टीन फाईल्समुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. भारतातदेखील याचे पडसाद पहायला मिळत आहेत. या प्रकरणावरुन काँग्रेसने भाजपला घेरले आहे. या मुद्यावरुन काँग्रेस आक्रमक भूमिकेत आली असून , कल्याण पश्मिमध्ये युवक काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार आंदोन करण्यात आले. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते एकत्र जमले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्याच्या
Feb 72 min read


तीन किंवा अधिक मुलांचे पालकही निवडणूक लढवू शकतील; राजस्थान सरकारचा ऐतिहासिक निर्णय!
राजस्थानमधील भजनलाल शर्मा सरकार राज्याच्या राजकारणात एक मोठा आणि दूरगामी बदल घडवून आणण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकारने स्पष्टपणे सूचित केले आहे की, पंचायत आणि महानगपालिका निवडणुकांसाठी दोन मुलांची अट रद्द केली जाईल. विधानसभेत सादर केलेल्या सरकारच्या उत्तरानुसार, तीन किंवा त्याहून अधिक मुले असलेल्या व्यक्ती आता नगरपालिका आणि पंचायत निवडणुका लढवू शकतील. जवळजवळ तीन दशकांपासून सुरू असलेला हा नियम रद्द करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. हा निर्णय“ मिशन 2026” चा एका भाग असल्याचे
Feb 62 min read


काँग्रसने जिंकलेला एकमेव गड : लातूरच्या महापौरपदी जयश्री सोनकांबळे, उपमहापौरपदी अॅड. स्नेहल उटगे
लातूर: राज्याचं लक्ष लागलेल्या लातूर महापालिकेचा गड राखण्यात काँग्रेसला यश आलं असून आता महापौर आणि उपमहापौर कोण होणार याची उत्सुकता सर्वांना होती. अखेर बहुमताच्या जोरावर काँग्रेसच महापौर पदासाठी दावेदार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार काँग्रेसकडून लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदी जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौरपदी अॅड. स्नेहल उटगे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. दोन्ही पदांसाठी इतर कोणतेही दावेदार नसल्याने निकाल स्पष्ट झाला असून, लवकरच दोघेही अनुक्रमे महापौर आण
Feb 62 min read


संसदेत विरोधी पक्षाच्या महिला खासदारांनी घातला पंतप्रधानांच्या आसनाला घेराव, भाजपकडून पंतप्रधानांवर हल्ल्याचा आरोप; 22 वर्षात पहिल्यांदाच...
नवी दिल्ली: लोकसभेत आज (बुधवार 4 फेब्रूवारी 2026) संसदेच्या इतिहासातील एक अत्यंत धक्कादायक आणि अभूतपूर्व प्रकार घडला आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात येणार होते. मात्र त्यापूर्वीच विरोधी पक्षाच्या महिला खासदारांनी त्यांच्या आसनाला घेराव घातल्याने मोठी खळबळ उडाली. या गोंधळामुळे अखेर पंतप्रधानांचे भाषण रद्द करावे लागले आणि सभागृहाचे कामकाज तहकुब झाले. या संपूर्ण राड्याची सुरुवात बुधवारी सकाळपासून झाली ह
Feb 52 min read


विरोधीपक्षाचं लोकसभेच्या गेटवर आंदोलन; बघा गद्दार चालले, काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या मंत्र्याला राहुल गांधीनी डिवचले, शाब्दीक चकमकीचा व्हिडीओ व्हायरल
नवी दिल्ली: देशाचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकावरून लोकसभेत दोन दिवसांपासून जोरदार घमासाण सुरू आहे. या पुस्तकाचे अद्याप प्रकाशन झालेले नाही, त्याआधीच मोठा गदारोळ सुरू झाला आहे. यामुळे अनेकवेळा संसदेचे कामकाज अनेकवेळा तहकुबही करण्यात आले. याचमुद्यावरुन संसद परिसरात विरोधकांचे आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय राज्य मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्यात बाचाबाचीचा प्रकार समोर आला आहे. या बाचाबाचीचा व्हिडिओ व्हायरल झाला
Feb 41 min read


जनरल नरवणे यांचे पुस्तक दाखवत राहुल गांधी यांचा मोदींवर घणाघात ! पंपतप्रधानांकडे सभागृहात येण्याचे धाडस नाही- राहुल गांधी
नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज संसदेच्या आवारात माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या पुस्तकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी दावा केला की, जेव्हा चीन रणगाडे भारतीय सीमेवर (कैलास रिज) पोहोचले, तेव्हा पंतप्रधान आणि संपूर्ण सरकारने लष्कराला त्यांच्याच मर्जीनुसार सोडून दिले. संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी जनरल नरवणे यांचे पुस्तक हातात दाखवत म्हटले की, “ पंतप्रधानांकडे आज लोकसभेत येण्याचे धाडस आहे, अ
Feb 42 min read


पश्चिम बंगालाच्या मुख्यमंत्र्यानी पदर खोचून कोर्टात केला युक्तीवाद मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी इतिहास घडवला : सरन्यायाधिशासमोरच निवडणूक आयोगाला दाखवला हिसका !
नवी दिल्ली : बिहारनंतर आता पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी देशाचे राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे. भाजपकडून या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. तर मुख्यमंत्रीपदासह राजकारणाचा तगडा अनुभव असलेल्या ममता बॅनर्जी सहजासहजी हार मानणार्या नसून भाजपचं आव्हान मोडीत काढण्यात त्यांचा हातखंडा मानला जातो. पण आता याच ममता बॅनर्जींनी इतिहास घडवला आहे. मुख्यमंत्र
Feb 43 min read


राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी घेतली मोदी, शाहची भेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिल्लीचं निमंत्रण!
नवी दिल्ली: अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनतर आता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण याबाबत चर्चांना उधान आले आहे. वेगवेगळ्या नेत्यांच्या नावांची चर्चा होत आहे. खासदार प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष असतील असा दावा केला जात होता, मात्र आता पटेल यांनी हे वृत्त खोटे असा दावा केला आहे. आपण राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे पटेल म्हणाले. त्यांनतर आता पटेल यांनी
Feb 32 min read


भाजपने सत्तागणित जुळवले, काँग्रेसच्या हातून महापालिका गेली;प्रकाश आंबेडकरांनाही धक्का!
अकोला: आकोला महापालिकेत काँग्रेस विरोधी पक्षांनासोबत घेऊन सत्ता स्थापन करेल, अशी शक्यता होती. प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलून आपला सत्तेत वाटा नको मात्र भाजपला सत्ता स्थापनेपासून रोखू अशी चर्चा झाली. त्यासाठी आंबेडकर यांच्या निवास्थानी बैठक देखील झाली होती. त्यामुळे भाजप सत्तेपासून दूर रहाणार अशा चर्चा होत्या. मात्र,भाजपने गेम फिरवत मित्र पक्षांना सोबत घेत ‘शहर सुधार आघाडी’ स्थापन करून सत्ता आपल्याकडे राहिल, अशी खेळी केली आहे. अकोला महानगरपालिकेतील सत्तास्थापनेचे गणित जुळले अस
Jan 242 min read


जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगूल वाजले, दोन टप्यात निवडणुकां पहिल्या टप्प्यात 12 जिल्हापरिषदा 125 पंचायतसमित्यांचा समावेश
मुंबई: महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक अयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची घोषणा केली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी येत्या 5 फेब्रूवारी रेाजी मतदान होऊन 7 फेब्रूवारी रोजी निकाल लागणार आहे. गेल्या महिन्यातच (डिसेंबर 2025) महाराष्ट्रात विविध नगरपालिकांसाठी मतदान होऊन निवडणुका झाल्या. आता दोनच दिवसात राज्यातील महानगरपालिकांतील मतदान होत आहे. त्यामुळे या निव
Jan 132 min read


वादावादी करून पक्षाच्या बाहेर पडलो नाही, भाजपला टक्कर कोणी देऊ शकतो तर काँग्रेसच आहे; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
मुंबई: अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काँग्रेससोबत आघाडीला विरोध करत पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप राष्ट्रवदी काँग्रेस (शदरचंद्र पवार) पक्षातून बाहेर पडले. शरद पवारांची साथ सोडल्यानंतर प्रशांत जगताप यांना काही पक्षातून ऑफर आल्या. मात्र, त्यांनी काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्यानंतर जगताप यांनी भूूमिका मांडली. मुंबईतील टिळक भवनामध्ये प्रशांत जगताप यांचा पक्षप्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकार, विजय वडेट्टीवार
Dec 26, 20251 min read


काँग्रेसचे नेते राहुल गांधी शंभर टक्के पंतप्रधान होणार!
नवीदिल्ली: माहाराष्ट्रात सध्या राजकीय धुराळा उडालेला आहे. नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचे विधानसभा निवडणुकीसारखे निकाल लागले आहेत. भाजपचा वरचष्मा आहे तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपची मजबूत पकड, मगरमिठ्ठी विविध राजकीय संस्थांना पडत असल्याचे चित्र आहे. त्यातच नवीन वर्ष आले की भविष्यात काय होणार, याची चर्चा होतेच. अशीच एक चर्चा सध्या देशाचं लक्ष वेधून घेत आहे. काँग्रेसचे नेते आणि सध्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे 100 टक्के पंतप्रधान असा दावा एका ज्योतिषाने केला आहे
Dec 23, 20252 min read


नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीत महायुतीची मुसंडी
राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचयातीच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. विधानसभेनंतर पुन्हा एकदा नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीनं जोरदार मुसंडी मारत बाजी मारली आहे. तर महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी काही ठिकाणी विजय मिळवला आहे. समोर आलेल्या निकालात सध्यातरी महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचाच बोलबाला दिसून येत आहे. एकीकडे या विजयानंतर महायुतीकडून जल्लोष साजरा केला जात असताना माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र हा पक
Dec 21, 20255 min read
bottom of page